शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

चौपदरीकरण कामाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे

By admin | Updated: August 19, 2016 00:58 IST

जालना : जिल्ह्यात जालना-भोकरदन आणि जालना-वडीगोद्री रस्त्यांची दुरवस्था झाली होती. अनेक वर्षांनंतर भोकरदन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला

जालना : जिल्ह्यात जालना-भोकरदन आणि जालना-वडीगोद्री रस्त्यांची दुरवस्था झाली होती. अनेक वर्षांनंतर भोकरदन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, वडीगोद्री रस्त्याचा प्रश्न कायम असून, याकडे मुख्यमंत्र्यांनीच लक्ष द्यावे, अशी अपेक्षा वाहनधारकांसह नागरिकांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील सर्वच भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. या पार्श्वभूमीवर जालना-भोकरदन मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय राखीव निधी आणला. या मार्गाचे कामही सुरू झाले आहे. राजूर येथे जाताना भाविकांची गैरसोय होत असे. अनेकवर्षे मागणी करुनही हा प्रश्न सुटू शकलेला नव्हता. मात्र, खा. दानवे यांनी प्रतिष्ठा पणाला लावून निधी खेचून आणला आणि या मार्गाचे कामही सुरू झाले आहे. या रस्त्याला न्याय मिळाला तसाच तो जालना-वडीगोद्री मार्गासही मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेकवर्षांपासून या मार्गावरुन ये जा करणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यातच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वी सहकार व शिक्षण महर्षी माजी खा. स्व. अंकुशराव टोपे यांचे निधी झाल्याने टोपे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री याच मार्गाने पाथरवाला येथे गेले होते. तेव्हा या रस्त्याची अवस्था त्यांनी अनुभवली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच या रस्त्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिने लक्ष घालावे आणि याचे चौपदरीकरणासाठी राज्याच्या तिजोरीतून आकस्मित निधी उपलब्ध करुन द्यावा, जेणेकरुन आर्थिक तरतूद झाली तर या मार्गाचे काम तात्त्काळ सुरू होऊ शकेल. अन्यथा अपघातांची मालिका सुरुच राहील आणि बळींची संख्या वाढतच राहील. जिल्ह्यातील एकमेव रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे पक्षीय मतभेद विसरुन लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)