शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

चौपदरीकरण कामाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे

By admin | Updated: August 19, 2016 00:58 IST

जालना : जिल्ह्यात जालना-भोकरदन आणि जालना-वडीगोद्री रस्त्यांची दुरवस्था झाली होती. अनेक वर्षांनंतर भोकरदन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला

जालना : जिल्ह्यात जालना-भोकरदन आणि जालना-वडीगोद्री रस्त्यांची दुरवस्था झाली होती. अनेक वर्षांनंतर भोकरदन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, वडीगोद्री रस्त्याचा प्रश्न कायम असून, याकडे मुख्यमंत्र्यांनीच लक्ष द्यावे, अशी अपेक्षा वाहनधारकांसह नागरिकांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील सर्वच भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. या पार्श्वभूमीवर जालना-भोकरदन मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय राखीव निधी आणला. या मार्गाचे कामही सुरू झाले आहे. राजूर येथे जाताना भाविकांची गैरसोय होत असे. अनेकवर्षे मागणी करुनही हा प्रश्न सुटू शकलेला नव्हता. मात्र, खा. दानवे यांनी प्रतिष्ठा पणाला लावून निधी खेचून आणला आणि या मार्गाचे कामही सुरू झाले आहे. या रस्त्याला न्याय मिळाला तसाच तो जालना-वडीगोद्री मार्गासही मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेकवर्षांपासून या मार्गावरुन ये जा करणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यातच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वी सहकार व शिक्षण महर्षी माजी खा. स्व. अंकुशराव टोपे यांचे निधी झाल्याने टोपे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री याच मार्गाने पाथरवाला येथे गेले होते. तेव्हा या रस्त्याची अवस्था त्यांनी अनुभवली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच या रस्त्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिने लक्ष घालावे आणि याचे चौपदरीकरणासाठी राज्याच्या तिजोरीतून आकस्मित निधी उपलब्ध करुन द्यावा, जेणेकरुन आर्थिक तरतूद झाली तर या मार्गाचे काम तात्त्काळ सुरू होऊ शकेल. अन्यथा अपघातांची मालिका सुरुच राहील आणि बळींची संख्या वाढतच राहील. जिल्ह्यातील एकमेव रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे पक्षीय मतभेद विसरुन लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)