शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

चौपदरीकरण कामाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे

By admin | Updated: August 19, 2016 00:58 IST

जालना : जिल्ह्यात जालना-भोकरदन आणि जालना-वडीगोद्री रस्त्यांची दुरवस्था झाली होती. अनेक वर्षांनंतर भोकरदन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला

जालना : जिल्ह्यात जालना-भोकरदन आणि जालना-वडीगोद्री रस्त्यांची दुरवस्था झाली होती. अनेक वर्षांनंतर भोकरदन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, वडीगोद्री रस्त्याचा प्रश्न कायम असून, याकडे मुख्यमंत्र्यांनीच लक्ष द्यावे, अशी अपेक्षा वाहनधारकांसह नागरिकांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील सर्वच भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. या पार्श्वभूमीवर जालना-भोकरदन मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय राखीव निधी आणला. या मार्गाचे कामही सुरू झाले आहे. राजूर येथे जाताना भाविकांची गैरसोय होत असे. अनेकवर्षे मागणी करुनही हा प्रश्न सुटू शकलेला नव्हता. मात्र, खा. दानवे यांनी प्रतिष्ठा पणाला लावून निधी खेचून आणला आणि या मार्गाचे कामही सुरू झाले आहे. या रस्त्याला न्याय मिळाला तसाच तो जालना-वडीगोद्री मार्गासही मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेकवर्षांपासून या मार्गावरुन ये जा करणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यातच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वी सहकार व शिक्षण महर्षी माजी खा. स्व. अंकुशराव टोपे यांचे निधी झाल्याने टोपे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री याच मार्गाने पाथरवाला येथे गेले होते. तेव्हा या रस्त्याची अवस्था त्यांनी अनुभवली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच या रस्त्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिने लक्ष घालावे आणि याचे चौपदरीकरणासाठी राज्याच्या तिजोरीतून आकस्मित निधी उपलब्ध करुन द्यावा, जेणेकरुन आर्थिक तरतूद झाली तर या मार्गाचे काम तात्त्काळ सुरू होऊ शकेल. अन्यथा अपघातांची मालिका सुरुच राहील आणि बळींची संख्या वाढतच राहील. जिल्ह्यातील एकमेव रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे पक्षीय मतभेद विसरुन लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)