शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

औरंगाबादला आयआयएम नाकारल्याने मुख्यमंत्र्यांचा निषेध

By admin | Updated: December 26, 2014 00:15 IST

औरंगाबाद : उत्तम प्रशासन दिनीच महाराष्ट्र शासनाने अपारदर्शी निर्णय घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूर येथे उभारण्याचा निर्णय जाहीर केला.

औरंगाबाद : उत्तम प्रशासन दिनीच महाराष्ट्र शासनाने अपारदर्शी निर्णय घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूर येथे उभारण्याचा निर्णय जाहीर केला. औरंगाबाद आणि नागपूर या शहरांचा तुलनात्मक अभ्यास करून निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. केवळ विकासाचे केंद्रीकरण करण्याच्या उद्देशाने औरंगाबादला आयआयएम नाकारल्याने आयआयएम मराठवाडा कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला असून, त्याबाबतचे खुले पत्रच त्यांना पाठविण्यात आल्याचे कृती समितीतर्फे मुनीष शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.शर्मा म्हणाले की, औरंगाबाद शहर हे औद्योगिक विकासात खूप अग्रेसर आहे. डीएमआयसी प्रकल्पामुळे औरंगाबादच्या औद्योगिक विश्वात खूप मोठी भरभराट होणार आहे. त्यामुळे येथेच आयआयएमची गरज आहे. आयआयएम मराठवाडा कृती समितीकडून सहा महिन्यांपासून सतत पाठपुरावा केला जात होता. त्यासाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची १६ आणि १७ डिसेंबर रोजी भेट घेऊन त्यांना आयआयएमवर औरंगाबादचाच दावा असल्याचे सांगितले होते. यावेळी उच्च शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. परंतु तरीही २४ डिसेंबर रोजीच आयआयएम नागपूर येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ विदर्भकेंद्रित निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना खुले पत्र पाठवून त्यांचा निषेध करीत आहोत. तसेच मराठवाड्याच्या विकासाची आपली भूमिका, योजना आणि कृती आराखडा काय आहे हे आठ दिवसांत जाहीर करावा, अन्यथा मोठ्या जनक्षोभाला आणि आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी उद्योजक सुनील किर्दक यांनी दिला. या पत्रकार परिषदेला कृती समितीचे हितेश गुप्ता, नितीन सोमाणी, सुनील किर्दक, अजय शहा उपस्थित होते.