शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला केले नाराज

By admin | Updated: July 13, 2016 00:38 IST

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याला नाराज केल्याचा आरोप मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी केला आहे.

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याला नाराज केल्याचा आरोप मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी केला आहे. अ‍ॅड.देशमुख यांनी मंत्रिमंडळ विस्ताराप्रकरणी मराठवाड्याला कसे डावलण्यात आले, याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. प्रसिद्धीपत्रकात ते म्हणतात, नागपुरी मुख्यमंत्र्यांना नागपूर कराराचा विसर पडला आहे. मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ९० लाखांच्या आसपास गेली आहे. विभागातील ४ लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळात आहेत. याउलट विदर्भाची लोकसंख्या २ कोटी ३ लाख आहे. तेथील ८ लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर २० लाख लोकसंख्येमागे १ मंत्री असे प्रमाण येत आहे. विदर्भातील ३० लाख लोकसंख्येमागे १ मंत्री तर मराठवाड्यात ४५ लाख लोकसंख्येमागे १ मंत्री असे प्रमाण आले आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून आलेल्या काही संस्था विदर्भात पळविल्या आहेत. हे करीत असताना त्यांच्याकडून नागपूर कराराचा भंग झाला आहे. ही एक प्रकारची सापत्न वागणूक आहे. येथील लोकप्रतिनिधी याप्रकरणी बोलण्यास तयार नाहीत. मराठवाड्यातील ११ आमदारांमागे १ मंत्री असे प्रमाण आहे. तेच विदर्भात ७ आमदारांमागे १ मंत्री असे येते. मराठवाडा जनता विकास परिषद मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराज आहे. मराठवाड्याला जास्तीचा वाटा मिळणे, अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. विभागातील लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी एकजूट करून आवाज उठविला पाहिजे. असे मत अ‍ॅड.देशमुख यांनी व्यक्त केले.