शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

सोमवारपासून तपासणी

By admin | Updated: May 16, 2014 00:40 IST

औरंगाबाद : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाने अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित, अशा वेगवेगळ्या तत्त्वांवर महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे.

 औरंगाबाद : विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्या गाव, शहरातच मिळावे यासाठी शासनाने अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित, अशा वेगवेगळ्या तत्त्वांवर महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. परवानगी घेताना संस्थाचालकांनी भौतिक आणि अकॅडमिक सुविधा उपलब्ध असल्याची लेखी हमी दिलेली आहे. या सोयी-सुविधांची तपासणी करण्यात येणार असून, त्यासाठी शिक्षण विभागाने २० पथके तयार केली आहेत. १९ मेपासून ही पथके महाविद्यालयांमध्ये धडकतील. औरंगाबाद शिक्षण सहसंचालक कार्यालयांतर्गत शासन अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित तत्त्वावरील सुमारे ३५० महाविद्यालये आहेत. यात कला, वाणिज्य, विज्ञान, विधि, शिक्षणशास्त्र, बीबीए, बीसीए, बीसीएस महाविद्यालयांचा समावेश आहे. आणखी १६ नवीन महाविद्यालये मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. उच्चशिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता टिकली पाहिजे, यासाठी शासनाने महाविद्यालय सुरू करण्यासाठी निकष आणि नियम लागू केलेले आहेत. काही संस्थाचालकांनी कागदोपत्री सुविधा दर्शवून महाविद्यालयांना मान्यता मिळवून घेतलेली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही सोयी-सुविधा दिलेल्या नाहीत. यासंदर्भात विधि मंडळात प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी सर्व महाविद्यालयांच्या भौतिक सुविधांचा आढावा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. उच्चशिक्षण विभागाने राज्यातील सर्व महाविद्यालयांची तपासणी सुरू केली आहे. औरंगाबाद विभागांतर्गत ३५० महाविद्यालयांची तपासणी करण्यात येणार असल्याचे शिक्षण सहसंचालक डॉ. मोहंमद फय्याज यांनी सांगितले. ते म्हणाले की, १९ ते २४ मेदरम्यान ही तपासणी केली जाणार आहे. तपासणी करण्यासाठी केवळ शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांची २० पथके तैनात करण्यात येणार आहेत. तपासणी सुरू करण्यापूर्वी आम्ही सर्व महाविद्यालयांना ई-मेलद्वारे २० पानांचा प्रोफॉर्मा (नमुना फॉर्म) पाठविला आहे. त्यानुसार त्यांनी माहिती तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी दिलेली माहिती किती खरी आहे, याची खातरजमा पथकातील अधिकारी करतील. महाविद्यालयांना आवश्यक असणारी इमारत, मैदान, प्रयोगशाळा, लायब्ररी, वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, वसतिगृह आदी भौतिक सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची शहानिशा केली जाईल. अकॅडमिक सुविधांमध्ये पात्र प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल यूजीसीच्या नियमानुसार आहेत का याची तपासणी होणार आहे.