शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अपंगांना वाटलेल्या गिरण्यांची तपासणी !

By admin | Updated: February 4, 2015 00:41 IST

हणमंत गायकवाड , लातूर अपंग अपंग पुनर्वसन योजनेतून वाटप करण्यात आलेल्या मिनी पिठाच्या गिरण्यांची तपासणी करण्यात येणार असून, समाजकल्याण अधिकाऱ्यांना तसे

हणमंत गायकवाड , लातूरअपंग अपंग पुनर्वसन योजनेतून वाटप करण्यात आलेल्या मिनी पिठाच्या गिरण्यांची तपासणी करण्यात येणार असून, समाजकल्याण अधिकाऱ्यांना तसे निर्देश अतिरिक्त सीईओंनी दिले आहेत़ दरम्यान, ज्या कंपनीकडून या गिरण्या खरेदी केल्या आहेत, त्या कंपनीलाही ‘समाजकल्याण’ने पत्र पाठविले असून, बनावट गिरणी बदलून द्यावी अथवा सदोष करुन द्यावी, असे या पत्रात म्हटले आहे़ ‘समाजकल्याण’ने दिलेली गिरणीच अपंग या मतळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून, वाटप करण्यात आलेल्या सर्वच पिठाच्या गिरण्यांची तपासणी करण्याचा निर्णय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघमाळे यांनी घेतला आहे़ समाजकल्याण अधिकाऱ्यांना तसे लेखी निर्देशही त्यांनी दिले आहेत़ लातूर जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये समाजकल्याण विभागाने १३३ मिनी पिठाच्या गिरण्यांचे वाटप केले आहे़ औसा तालुक्यातील नागरसोगा येथील अनिता नारायण माळी या अपंग महिलेला वाटप करण्यात आलेली पिठाची गिरणी चालत नाही़ पंधरा मिनिटातच ती बंद पडते़ शिवाय, दळणही दळले जात नाही़ त्यामुळे या महिलेने मशिन बदलून मिळावी म्हणून समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची दारे ठोठावली होती़ मात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या महिलेला दाद दिली नाही़ त्यामुळे तिने लोकशाही दिनात तक्रार दिली़ या तक्रारीमुळे ‘समाजकल्याण’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गिरणीची तपासणी केली़ परंतु गिरणी बदलून मिळाली नाही़ ‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर घेताच प्रशासन खडबडून जागे झाले असून, वाटप करण्यात आलेल्या सर्व गिरण्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्याअनुषंगाने समाजकल्याण अधिकारी श्रीमती एस़एनग़ाडेकर यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तपासणीचे निर्देशही दिले आहेत़जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने अपंगांना पिठाची गिरण्या वाटप केल्या आहेत़ त्या मध्ये लातूर तालुक्यातील २०, औसा तालुक्यात २०, निलंगा तालुक्यात २०, देवणी तालुक्यात ८, शिरुर अनंतपाळ तालुक्यात ८, उदगीर तालुक्यात १३, जळकोट तालुक्यात ८, अहमदपूर तालुक्यात १३, चाकूर तालुक्यात १३, रेणापूर तालुक्यात १० अशा एकूण १३३ अपंगांचा समावेश आहे़ वाटप झालेल्या गिरण्या चालू आहेत की, बंद पडल्या आहेत, याची तपासणी जिल्हा परिषदेच्या मार्फत आता होणार आहे़