परतूर : तालुक्यातही @‘केबीसी’ने अनेकांना गंडा घातला. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील गुंतवणूक करणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गुंतवलेले पैसे अल्पावधीत दुप्पट तिप्पट करून मिळणार असल्याच्या अमिषापोटी या तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातील जनतेनेही या कंपनीत पैसे गुंतवले आहेत. आता या कंपनीने गाशा गुंडाळल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे. सुरूवातीस १७ हजारांची गुंतवणूक करून सहा महिन्यांनतर १० हजार व तीन महिन्यांनतर १७ हजार रुपये असे अल्पावधीत पैसे वाढवीत गेल्यास चार महिन्यांत ४ लाख ३६ हजार म्हणजे चार महिन्यात चौपट पैसे मिळणार असल्याचे सदरील कंपनीचे एजंट पटवून देत होते. एजंटाने दाखविलेल्या आमिषाला अनेक जण बळी पडले. या एजंटांनी कमी कालावधीत टोलेजंग इमारती उभारून तसेच अलिशान गाड्या आणल्याने गुंतवणकदारांचे आकषर्ण वाढले. (वार्ताहर)लकी ड्रॉ अडचणीतपरतूर तालूक्यात विविध योजनेखाली लकी ड्रॉ सुरू आहेत. यामध्ये प्लॉटिंग, मोबाईल, पैसे भरून सोने, विविध चारचाकी, दुचाकी गाड्या आदी ड्रॉ चालकही या अनेक कंपन्या बुडाल्यांनतर अडचणीत आले आहेत. तर यातील सदस्यही धास्तावले आहेतव्यापारी श्याम सोमाणी म्हणाले केबीसी कंपनीने अनेकांना फसविले आहे. संचालकांवर कडक कारवाईची गरज आहे.
परतूर तालुक्यातही केबीसीकडून फसवणूक
By admin | Updated: July 24, 2014 00:14 IST