शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जागा बळकावण्यासाठी चौक नामकरणाचा फंडा

By admin | Updated: June 17, 2014 01:10 IST

वाळूज महानगर : वाळूज महानगरमध्ये कोणाचीही परवानगी न घेता चौकाचे नामकरण करण्याचे प्रमाण वाढले

वाळूज महानगर : वाळूज महानगरमध्ये कोणाचीही परवानगी न घेता चौकाचे नामकरण करण्याचे प्रमाण वाढले असून, या गंभीर अतिक्रमणांकडे स्थानिक ग्रामपंचायत, एमआयडीसी, सिडको व पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. जागा बळकावण्यासाठी व अतिक्रमण करण्यासाठी रात्रीतून नवनवीन चौकांची भर पडत आहे.वाळूज महानगरातील बजाजनगर, सिडको, साऊथ सिटी परिसर, पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, रांजणगाव शेणपुंजी, जोगेश्वरी, कमळापूर, वाळूज, बकवालनगर आदी परिसरात मोक्याच्या भूखंडांवर तसेच रहदारीच्या ठिकाणी फलक लावून चौकाचे नामकरण होत आहे. कारवाई टाळण्यासाठी या चौकांना महापुरुषांचे, राजकीय पक्षाच्या नेत्याचे नाव दिले जात आहे. वास्तविक चौकाचे नामकरण करण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव संमत करावा लागतो. नंतर एमआयडीसी, सिडको व पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. या परिसरातील मुख्य बाजारपेठ, रस्ते व चौकांत असे अनधिकृतपणे नामकरणाचे फलक लावले जात आहेत. या प्रकरणी कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमणधारकांचे फावत आहे. याविषयी सरपंच छाया कारले, कांताबाई जाधव, योगेश दळवी, रंजना भोंड, लक्ष्मीबाई कोरडकर आदींशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये चौकाचे नामकरण विनापरवाना होत असल्याचे मान्य केले.हा परिसर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रात्रीतून चौकाचे नामकरण होते व चौकाची मोडतोड झाल्यास जातीय तेढ निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता असते. ग्रामपंचायतीकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे विनापरवाना चौकाचे नामकरण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे शक्य होत नसल्याची हतबलता परिसरातील सरपंच मंडळींनी व्यक्त केली.कारवाई करण्यास टाळाटाळविनापरवाना व नियमबाह्यपणे होत असलेल्या चौकांच्या नामकरणाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एमआयडीसी, ग्रामपंचायती, सिडको व पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे चौकांचे नियमबाह्य व विनापरवाना नामकरण वाढले आहे. ४याविषयी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंग बहुरे व वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चौकाचे विनापरवाना नामकरण करून झालेले अतिक्रमण स्थानिक ग्रामपंचायत, सिडको व एमआयडीसी प्रशासन हटविण्याची गरज आहे. विनापरवाना चौकाचे नामकरण होत असल्याची तक्रार आल्यास आम्ही पोलीस बंदोबस्त देऊन स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण हटवू शकतो. परंतु तक्रारच येत नसल्यामुळे आम्ही कोणावर कारवाई करावी, असा प्रश्नही त्यांनी विचारला.