शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट नुकसानीचे होणार चावडी वाचन

By admin | Updated: July 3, 2014 00:15 IST

सतीश जोशी , परभणी गारपिटीमुळे परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान होऊनही ५० टक्के गावांनाच भरपाई मिळाली होती.

सतीश जोशी , परभणीगारपिटीमुळे परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान होऊनही ५० टक्के गावांनाच भरपाई मिळाली होती. नुकसान झालेल्या सर्वांनाच गारपीट आणि अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत द्या, या मागणीसाठी केलेल्या विविध पक्ष, संघटनांच्या आंदोलनाला यश मिळाले असून या नुकसानीचे पुन्हा पंचनामे करुन चावडी वाचन केले जाणार आहे.परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास ४ लाख हेक्टरमध्ये रबीचे पीक घेतले होते. त्यापैकी जवळपास ५० टक्केच म्हणजे दीड लाख हेक्टरमधील पिकाच्या नुकसानीबद्दल शासनाने भरपाई दिली. परभणी तालुक्यामध्ये ७८ हजार हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त असताना जवळपास ४० हजार हेक्टरमधील पिकाच्या नुकसानीबद्दल भरपाई मिळाली. उर्वरित ठिकाणी संपूर्णत: नुकसान झाले असताना त्यांचा समावेश या नुकसानग्रस्त क्षेत्रामध्ये केला गेला नाही. मनमानी आणि जागेवरच पंचनामे करुन या याद्या बनविल्या होत्या. पाथरीतालुक्यातील एका गावामध्ये ७५० एकर एकूण क्षेत्रफळापैकी ६५० एकरमध्ये उसाचे पीक होते. शासन नियमाप्रमाणे नुकसान भरपाई पिकाच्या यादीत उसाचा समावेश नाही. असे असताना देखील महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या गावातील सर्वांनाच नुकसानीचे अनुदान दिले. या उलट शेजारच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही त्यांना एक रुपयाही भरपाई मिळालेली नाही. असे चित्र जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पहावयास मिळाले. परभणी तालुक्यामध्ये एका शिवेवर असलेल्या पोखर्णीला नुकसान भरपाई मिळाली. परंतु, आजुबाजूच्या बोरवंड बु., सुरपिंपरी आदी गावांचा त्यात समावेश नाही. परभणी तालुक्यात ११६ गावांपैकी केवळ ३१ गावांचा गारपीट नुकसानग्रस्त यादीमध्ये आहे. उर्वरित ८२ गावे वगळली, अशी अनेक उदाहरणे जिल्ह्यामध्ये देता येतील. या सर्व महसूल प्रशासनाच्या अनागोंदीबद्दल विविध पक्ष, संघटनांनी आंदोलने, रस्ता रोको केला. या आंदोलनाची दखल घेत जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये नुकसानीचा आढावा घेऊन पाच पंचासमक्ष चावडी वाचन केले जाणार आहे. आठ दिवसात अहवाल मागवून शासनाकडे पाठविला जाईल. (जिल्हा प्रतिनिधी)निवेदन देऊनही दुर्लक्ष-विलास बाबरजिल्ह्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांना अनेक वेळा निवेदने दिली. परंतु, प्रशासनाने दखल घेतली नाही. मनमानी करुन घरी बसूनच अनेक गावांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याचा आरोप कॉ. विलास बाबर यांनी लोकमतशी बोलताना केला.