शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

गारपीट नुकसानीचे होणार चावडी वाचन

By admin | Updated: July 3, 2014 00:15 IST

सतीश जोशी , परभणी गारपिटीमुळे परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान होऊनही ५० टक्के गावांनाच भरपाई मिळाली होती.

सतीश जोशी , परभणीगारपिटीमुळे परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान होऊनही ५० टक्के गावांनाच भरपाई मिळाली होती. नुकसान झालेल्या सर्वांनाच गारपीट आणि अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत द्या, या मागणीसाठी केलेल्या विविध पक्ष, संघटनांच्या आंदोलनाला यश मिळाले असून या नुकसानीचे पुन्हा पंचनामे करुन चावडी वाचन केले जाणार आहे.परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास ४ लाख हेक्टरमध्ये रबीचे पीक घेतले होते. त्यापैकी जवळपास ५० टक्केच म्हणजे दीड लाख हेक्टरमधील पिकाच्या नुकसानीबद्दल शासनाने भरपाई दिली. परभणी तालुक्यामध्ये ७८ हजार हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त असताना जवळपास ४० हजार हेक्टरमधील पिकाच्या नुकसानीबद्दल भरपाई मिळाली. उर्वरित ठिकाणी संपूर्णत: नुकसान झाले असताना त्यांचा समावेश या नुकसानग्रस्त क्षेत्रामध्ये केला गेला नाही. मनमानी आणि जागेवरच पंचनामे करुन या याद्या बनविल्या होत्या. पाथरीतालुक्यातील एका गावामध्ये ७५० एकर एकूण क्षेत्रफळापैकी ६५० एकरमध्ये उसाचे पीक होते. शासन नियमाप्रमाणे नुकसान भरपाई पिकाच्या यादीत उसाचा समावेश नाही. असे असताना देखील महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या गावातील सर्वांनाच नुकसानीचे अनुदान दिले. या उलट शेजारच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही त्यांना एक रुपयाही भरपाई मिळालेली नाही. असे चित्र जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पहावयास मिळाले. परभणी तालुक्यामध्ये एका शिवेवर असलेल्या पोखर्णीला नुकसान भरपाई मिळाली. परंतु, आजुबाजूच्या बोरवंड बु., सुरपिंपरी आदी गावांचा त्यात समावेश नाही. परभणी तालुक्यात ११६ गावांपैकी केवळ ३१ गावांचा गारपीट नुकसानग्रस्त यादीमध्ये आहे. उर्वरित ८२ गावे वगळली, अशी अनेक उदाहरणे जिल्ह्यामध्ये देता येतील. या सर्व महसूल प्रशासनाच्या अनागोंदीबद्दल विविध पक्ष, संघटनांनी आंदोलने, रस्ता रोको केला. या आंदोलनाची दखल घेत जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये नुकसानीचा आढावा घेऊन पाच पंचासमक्ष चावडी वाचन केले जाणार आहे. आठ दिवसात अहवाल मागवून शासनाकडे पाठविला जाईल. (जिल्हा प्रतिनिधी)निवेदन देऊनही दुर्लक्ष-विलास बाबरजिल्ह्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांना अनेक वेळा निवेदने दिली. परंतु, प्रशासनाने दखल घेतली नाही. मनमानी करुन घरी बसूनच अनेक गावांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याचा आरोप कॉ. विलास बाबर यांनी लोकमतशी बोलताना केला.