शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

चारित्र्य संशयावरून खून

By admin | Updated: November 17, 2015 00:32 IST

कडा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिला दांड्याने मारहाण करीत चाकूने शरीरावर सपासप वार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील अंभोराजवळील गायकवाड

कडा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिला दांड्याने मारहाण करीत चाकूने शरीरावर सपासप वार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील अंभोराजवळील गायकवाड वस्तीवर रविवारी मध्यरात्री घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राणी विश्वास गायकवाड असे त्या मयत महिलेचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील गायकवाड वस्तीवर राहत असलेले विश्वास मुरलीधर गायकवाड यांचा विवाह दोन वर्षापूर्वी कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील राणी हिच्याशी झाला होता. त्यांना तीन महिन्यांचे बाळ आहे. ती काही कारणास्तव सासरी राहत नव्हती. दिवाळीच्या सणासाठी राणीला सासरी आणले पण तिच्या हातावर मेहंदी काढली होती. ही मेहंदी कोणी काढली ? असा प्रश्न पतीने विचारताच, तिने दाजीनी काढली असे सांगितल्याने कुरबूर सुरू झाली. ही कुरबूर टोकाला जाऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने रविवारच्या मध्यरात्री तिला लाकडी दांड्याने मारहाण करून घायाळ केले व धारदार शस्त्राने वार करून खून केला. आरोपीला अंभोरा पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. आरोपी विश्वास मुरलीधर गायकवाड हा शेतीचा व्यवसाय करतो. दरम्यान, मयत राणी हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहमदनगर येथे पाठविले आहे. (वार्ताहर)आष्टी तालुक्यातील अंभोरा ठाणे हे अहमदनगरच्या हद्दीजवळ आहे. अंभोराजवळ असणाऱ्या गायकवाड वस्तीवर हा थरार रविवारी मध्यरात्री घडला.४मात्र, याची माहिती अधीक्षक कार्यालयाला सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मिळाली नव्हती. एवढी मोठी घटना घडूनही याची माहिती अंभोरा पोलिसांनी वरिष्ठांना का कळविली नाही ? यावर संभ्रम निर्माण झाला आहे.४अंभोरा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर याची माहिती मुख्य कार्यालयास कळविण्यात येणार होती. मात्र, कोणतीही गंभीर घटना घडल्यास त्याची तात्काळ माहिती अधीक्षक कार्यालयास कळविणे आवश्यक आहे.४अंभोरा पोलिसांनी सकाळी आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र, याची माहितीही अधीक्षक कार्यालयाला नव्हती. याचे कारण गुलदस्त्यात आहे.