शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गुरूंमुळेच घडले जीवनात परिवर्तन

By admin | Updated: July 12, 2014 00:45 IST

हिंगोली : आषाढी शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.

हिंगोली : आषाढी शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे, असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे, तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे. असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांना राजा म्हणून ज्याला मानतात. त्या ज्ञानदेवांनीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरूवात केली.अशा या गुरूपौर्णिमेनिमित्त विविध मान्यवरांच्या त्यांच्या गुरूविषयी प्रतिक्रिया...माझे बाबाच माझे खरे गुरू - रामभाऊ कोळपेपहिली, दुसरीला असताना मला शिकवायला माझे बाबाच होते. त्यांनी माझा पाया पक्का केला. खरे तर माझे वडीलच माझे खरे गुरू आहेत. त्यांच्यामुळेच मी घडलो असल्याचे कळमनुरी येथील शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ कोळपे यांनी सांगितले. स्वयंशासनदिनी इंग्रजीचा पाठ घेतलो अन् पहिला आलो. तेव्हापासूनच इंग्रजीबद्दल प्रेम निर्माण झाले व आज मी इंग्रजी शिकवितो. हे गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले. श्रमाचे महत्त्व गुरूकडूनच शिकलो- डॉ. धांडेकितीही थकले तरी काम करत राहण्याचे श्रम केल्याने जीवनात यशाची शिखरे गाठता येतात. श्रमामुळेच माणूस मोठा होतो, हे मी माझ्या गुरूकडूनच शिकल्याची प्रतिक्रिया कळमनुरी येथील डॉ. आर. एस. धांडे यांनी दिली. माझ्या जीवनात वैद्यकीय व्यवसायात डॉ. विनायक देशमुख व डॉ. नानासाहेब चौधरी या दोन व्यक्ती आल्या. हे दोघे अहोरात्र मेहनत करीत असत. रुग्णांशी कसे बोलायचे? असे वागायचे? हे मी त्यांच्याकडून शिकलो. त्यांची कला आत्मसात केल्यामुळे आज या क्षेत्रात यश मिळविता आले. माणसाचे शरीर हे १७ ते १८ तास काम करते. मनावर घेतले तर कोणतेही काम अशक्य नाही. जीवनात जे-जे चांगले मिळाले ते घेत राहिलो. सहनशक्ती, बोलण्याची पद्धत हे गुरूमुळेच मी शिकलो.गुरूंमुळेच घडलो- अ‍ॅड. मुंजाभाऊ मगरवकील क्षेत्रामध्ये असलेले सामाजिक कार्य करण्यासाठी कुटुंबातील आजोबा व आईवडिलांनी प्रोत्साहन दिले. त्यानंतर वकील व्यवसायात काम करण्याची संधी अ‍ॅड. वसंत साळुंके व अ‍ॅड. अशोक सोनी यांनी दिली. तेच माझे गुरू आहेत. त्यांनीच मला या क्षेत्रात दाखविलेल्या मार्गामुळे यशस्वी होता आले असल्याची प्रतिक्रिया औंढा वकील संघाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. मुंजाभाऊ मगर यांनी दिली. शिक्षक च माझे गुरू- अब्दुल मन्नान शिक्षणाची आवड होती. आई-वडिलांची देखील शिक्षण घेईपर्यंत शिकविण्याची इच्छा होती; परंतु परिस्थिती बिकट होती. अशा या कठीण परिस्थितीमध्ये माध्यमिक शिक्षण काळामधील शिक्षक एम.ए. हबीब यांनी धीर दिला. शिक्षण घेण्यासाठी परिपूर्ण मदत केली. त्यांचाच आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात नोकरी करण्याचे ठरविले. त्यांच्या आशीर्वादाने आज औंढा येथील इंदिरा गांधी उर्दू विद्यालयात मुख्याध्यापक आहे.