शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

परिवर्तन निश्चित होऊ शकते

By admin | Updated: June 29, 2014 00:44 IST

जालना : जनतेने ठरवले तर परिवर्तन निश्चित होऊ शकते हे संपूर्ण देशाने नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत अनुभवले आहे, असे प्रतिपादन जिल्हा संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले.

जालना : जनतेने ठरवले तर परिवर्तन निश्चित होऊ शकते हे संपूर्ण देशाने नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत अनुभवले आहे, असे प्रतिपादन जिल्हा संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले. माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र या अभियानातंर्गत जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते शनिवारी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, उपनेते लक्ष्मण वडले, सहसंपर्क नेते शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, आ. संतोष सांबरे, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, जि.प.अध्यक्षा आशाताई भुतेकर, जगन्नाथ काकडे, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुध्दे, संजय हर्षे, अनिरुध्द खोतकर, सविता किवंडे आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना ते म्हणाले की, जनतेने ठरवले तर परिवर्तन निश्चित होऊ शकते हे संपूर्ण देशाने नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत अनुभवले आहे. राज्यात आता शिवसेनेने माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र हे अभियान हाती घेतले. या अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी मतदार नोंदणी जागृती, शिवसैनिक नोंदणी, शिवबंधन मेळावे, नविन शाखा स्थापना करणे, उद्घाटन, मेळावे, सभा, शिवसेना फलक, सामान्य नागरिकांची प्रलंबित कामे सोडविण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, लोकसभेप्रमाणे जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत क्रांती करण्यासाठी सज्ज व्हावे व त्यादृष्टीने कामाला लागून राज्यात शिवशाहीचे शासन आणावे व हीच खरी शिवसेनाप्रमुखांना श्रध्दांजली ठरेल.उपनेते लक्ष्मण वडले म्हणाले की, प्रत्येकाने त्याला शक्य असेल ते करावे व मनापासून झटावे. या आघाडी सरकारने सर्वच स्तरातील नागरिकांना अतिशय त्रस्त करुन सोडले असून त्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले. या जिल्हास्तरीय मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, माझा महाराष्ट्र -भगवा महाराष्ट्र हे अभियान निवडणुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या गावात व क्षेत्रात जाऊन शासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर ठेवावा. याच मेळाव्यात संपर्कप्रमुख यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा आशाताई भुतेकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, आ. संतोष सांबरे यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख पंडितराव भुतेकर, रावसाहेब राऊत, भगवानराव कदम, माधवराव कदम, सतिषराव घाटगे, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, रवींद्र आर्दड, अंकुश शिंदे, कैलास पुंगळे, परमेश्वर जगताप, हनुमान धांडे, प्रसाद बोराडे, अशोक बरकुले यांच्यासह अ‍ॅड. भास्कर मगरे, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, सविता किवंडे, प्रा. लक्ष्मण गोर्डे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी यांच्यासह जि.प.सदस्य, पं.स. सदस्य, विभागप्रमुुख, उपविभागप्रमुख, नगरसेवक आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)