शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

परिवर्तन निश्चित होऊ शकते

By admin | Updated: June 29, 2014 00:44 IST

जालना : जनतेने ठरवले तर परिवर्तन निश्चित होऊ शकते हे संपूर्ण देशाने नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत अनुभवले आहे, असे प्रतिपादन जिल्हा संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले.

जालना : जनतेने ठरवले तर परिवर्तन निश्चित होऊ शकते हे संपूर्ण देशाने नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत अनुभवले आहे, असे प्रतिपादन जिल्हा संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले. माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र या अभियानातंर्गत जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते शनिवारी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, उपनेते लक्ष्मण वडले, सहसंपर्क नेते शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, आ. संतोष सांबरे, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, जि.प.अध्यक्षा आशाताई भुतेकर, जगन्नाथ काकडे, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुध्दे, संजय हर्षे, अनिरुध्द खोतकर, सविता किवंडे आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना ते म्हणाले की, जनतेने ठरवले तर परिवर्तन निश्चित होऊ शकते हे संपूर्ण देशाने नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत अनुभवले आहे. राज्यात आता शिवसेनेने माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र हे अभियान हाती घेतले. या अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी मतदार नोंदणी जागृती, शिवसैनिक नोंदणी, शिवबंधन मेळावे, नविन शाखा स्थापना करणे, उद्घाटन, मेळावे, सभा, शिवसेना फलक, सामान्य नागरिकांची प्रलंबित कामे सोडविण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, लोकसभेप्रमाणे जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत क्रांती करण्यासाठी सज्ज व्हावे व त्यादृष्टीने कामाला लागून राज्यात शिवशाहीचे शासन आणावे व हीच खरी शिवसेनाप्रमुखांना श्रध्दांजली ठरेल.उपनेते लक्ष्मण वडले म्हणाले की, प्रत्येकाने त्याला शक्य असेल ते करावे व मनापासून झटावे. या आघाडी सरकारने सर्वच स्तरातील नागरिकांना अतिशय त्रस्त करुन सोडले असून त्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले. या जिल्हास्तरीय मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, माझा महाराष्ट्र -भगवा महाराष्ट्र हे अभियान निवडणुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या गावात व क्षेत्रात जाऊन शासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर ठेवावा. याच मेळाव्यात संपर्कप्रमुख यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा आशाताई भुतेकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, आ. संतोष सांबरे यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख पंडितराव भुतेकर, रावसाहेब राऊत, भगवानराव कदम, माधवराव कदम, सतिषराव घाटगे, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, रवींद्र आर्दड, अंकुश शिंदे, कैलास पुंगळे, परमेश्वर जगताप, हनुमान धांडे, प्रसाद बोराडे, अशोक बरकुले यांच्यासह अ‍ॅड. भास्कर मगरे, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, सविता किवंडे, प्रा. लक्ष्मण गोर्डे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी यांच्यासह जि.प.सदस्य, पं.स. सदस्य, विभागप्रमुुख, उपविभागप्रमुख, नगरसेवक आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)