शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बीआरजीएफच्या ६५ कामांमध्ये बदल

By admin | Updated: July 17, 2014 00:28 IST

हिंगोली : मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत यापुर्वी निवडण्यात आलेल्या ६५ विविध कामांमध्ये बदल करण्यात येणार

हिंगोली : मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत यापुर्वी निवडण्यात आलेल्या ६५ विविध कामांमध्ये बदल करण्यात येणार असून यासाठी यापुर्वी निवडलेल्या कामांची पुनर्रपडताळणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत करण्यात येणारी कामे सुचविण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी विविध कामे सुचविली होती. त्यातील अनेक कामे मार्गी लागली; परंतु काही कामांमध्ये अडचणी येत असल्याने ती कामे बदलण्याचा निर्णय ग्रामपंचायतींनी घेतला होता; परंतु तसा ठराव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे आलेला नव्हता. विशेष म्हणजे यापुर्वी जी कामे निवडण्यात आली होती. त्या कामांसाठी यापुर्वीच ग्रामपंचायतच्या खात्यावर निधी जमा करण्यात आला होता. जवळपास २००९-१० पासून काम बदलाचे हे प्रकरण प्रलंबित होते. या संदर्भात काही दिवसांपुर्वी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांनी पाचही गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये हे प्रकरण समोर आले. त्यामुळे बनसोडे यांनी काम बंद संदर्भातील ग्रामसभेचा प्रस्ताव ग्रामसेवकांमार्फत मागवून घेण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ६५ कामांचे प्रस्ताव जानेवारी ते मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या ग्रामसभेतून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे दाखल झाले होते. या कामबदलास जिल्हा नियोजन मंडळाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार १३ जुलै रोजी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला. त्यामध्ये सदरील कामांमध्ये बदल करण्यापुर्वी ती कामे बदलणे आवश्यक आहे का? या बाबतची तपासणी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. अधिकारी यांनी पाचही गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. या अहवालानंतर सदरील कामे बदलण्यावर शिक्का मोर्तब होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)नियोजन समितीत झाली होती चर्चामागासक्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत २००९-१० पासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता विकास कामांचा निधी.निवडण्यात आलेली काही कामे बदलण्याचा निर्णय ग्रामसभेद्वारे घेतला होता ग्रामपंचायतींनी.काम बदलाच्या मंजुरीबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर पुर्नतपासणी करण्याचा झाला होता निर्णय.आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश