शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

बीआरजीएफच्या ६५ कामांमध्ये बदल

By admin | Updated: July 17, 2014 00:28 IST

हिंगोली : मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत यापुर्वी निवडण्यात आलेल्या ६५ विविध कामांमध्ये बदल करण्यात येणार

हिंगोली : मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत यापुर्वी निवडण्यात आलेल्या ६५ विविध कामांमध्ये बदल करण्यात येणार असून यासाठी यापुर्वी निवडलेल्या कामांची पुनर्रपडताळणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत करण्यात येणारी कामे सुचविण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी विविध कामे सुचविली होती. त्यातील अनेक कामे मार्गी लागली; परंतु काही कामांमध्ये अडचणी येत असल्याने ती कामे बदलण्याचा निर्णय ग्रामपंचायतींनी घेतला होता; परंतु तसा ठराव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे आलेला नव्हता. विशेष म्हणजे यापुर्वी जी कामे निवडण्यात आली होती. त्या कामांसाठी यापुर्वीच ग्रामपंचायतच्या खात्यावर निधी जमा करण्यात आला होता. जवळपास २००९-१० पासून काम बदलाचे हे प्रकरण प्रलंबित होते. या संदर्भात काही दिवसांपुर्वी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांनी पाचही गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये हे प्रकरण समोर आले. त्यामुळे बनसोडे यांनी काम बंद संदर्भातील ग्रामसभेचा प्रस्ताव ग्रामसेवकांमार्फत मागवून घेण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ६५ कामांचे प्रस्ताव जानेवारी ते मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या ग्रामसभेतून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे दाखल झाले होते. या कामबदलास जिल्हा नियोजन मंडळाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार १३ जुलै रोजी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला. त्यामध्ये सदरील कामांमध्ये बदल करण्यापुर्वी ती कामे बदलणे आवश्यक आहे का? या बाबतची तपासणी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. अधिकारी यांनी पाचही गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. या अहवालानंतर सदरील कामे बदलण्यावर शिक्का मोर्तब होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)नियोजन समितीत झाली होती चर्चामागासक्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत २००९-१० पासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता विकास कामांचा निधी.निवडण्यात आलेली काही कामे बदलण्याचा निर्णय ग्रामसभेद्वारे घेतला होता ग्रामपंचायतींनी.काम बदलाच्या मंजुरीबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर पुर्नतपासणी करण्याचा झाला होता निर्णय.आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश