शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी धोरण बदला

By admin | Updated: May 30, 2017 00:31 IST

लातूर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने धोरणात बदल केला पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने धोरणात बदल केला पाहिजे. शेतीमालाला जोपर्यंत चांगला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे आर्थिक दारिद्र्य संपणार नाही. ज्या दिवशी शेतकऱ्यांचे हे दारिद्र्य संपेल, त्या दिवशी शेतकरी आत्महत्या थांबतील, असा सूर संत साहित्य संमेलनातील ‘शेतकरी आत्महत्या रोखणे’ या विषयावरील परिसंवादातून निघाला. परिसंवादात अमर हबीब, माजी आ. पाशा पटेल, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांचा सहभाग होता. ‘शेतकरी आत्महत्ये’वर विस्तृत मांडणी सहभागी वक्त्यांनी केली. शेतकरी म्हणजे कोण, याबाबतची व्याख्या स्पष्ट झाली पाहिजे. ज्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे त्यांनाच शेतकरी असे म्हणावे. बहुतांश नोकरधारकांकडे शेती आहे, अशा नोकरधारकांना शासकीय मदतीतून वगळले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आणि उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, अशाच शेतकऱ्यांना शासकीय अनुदान आणि कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. सरकार कुठलेही असो, ते शेतकऱ्यांच्या विरोधातच आहे. पूर्वीचे काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार शेतकऱ्यांबाबत क्रूर होते. आताचे सरकारही त्याच पायवाटेने आपला राज्य कारभार करीत आहे, अशी टीकाही यावेळी झाली. राज्यात दररोज नऊ शेतकरी मरणाला कवटाळत आहेत. राज्य सरकारमध्ये असलेली नोकरीशाही आणि त्यांच्याकडून मिळणारी सहानुभूती यातून आमच्या शेतकऱ्यांचे कल्याण होणार नाही. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसंदर्भातील धोरण बदलले पाहिजे, असा सूर निघाला.