शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी धोरण बदला

By admin | Updated: May 30, 2017 00:31 IST

लातूर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने धोरणात बदल केला पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने धोरणात बदल केला पाहिजे. शेतीमालाला जोपर्यंत चांगला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे आर्थिक दारिद्र्य संपणार नाही. ज्या दिवशी शेतकऱ्यांचे हे दारिद्र्य संपेल, त्या दिवशी शेतकरी आत्महत्या थांबतील, असा सूर संत साहित्य संमेलनातील ‘शेतकरी आत्महत्या रोखणे’ या विषयावरील परिसंवादातून निघाला. परिसंवादात अमर हबीब, माजी आ. पाशा पटेल, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांचा सहभाग होता. ‘शेतकरी आत्महत्ये’वर विस्तृत मांडणी सहभागी वक्त्यांनी केली. शेतकरी म्हणजे कोण, याबाबतची व्याख्या स्पष्ट झाली पाहिजे. ज्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे त्यांनाच शेतकरी असे म्हणावे. बहुतांश नोकरधारकांकडे शेती आहे, अशा नोकरधारकांना शासकीय मदतीतून वगळले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आणि उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, अशाच शेतकऱ्यांना शासकीय अनुदान आणि कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. सरकार कुठलेही असो, ते शेतकऱ्यांच्या विरोधातच आहे. पूर्वीचे काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार शेतकऱ्यांबाबत क्रूर होते. आताचे सरकारही त्याच पायवाटेने आपला राज्य कारभार करीत आहे, अशी टीकाही यावेळी झाली. राज्यात दररोज नऊ शेतकरी मरणाला कवटाळत आहेत. राज्य सरकारमध्ये असलेली नोकरीशाही आणि त्यांच्याकडून मिळणारी सहानुभूती यातून आमच्या शेतकऱ्यांचे कल्याण होणार नाही. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसंदर्भातील धोरण बदलले पाहिजे, असा सूर निघाला.