शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

ध्येयवेडातूनच परिवर्तन शक्य- दराडे

By admin | Updated: January 17, 2016 23:56 IST

औरंगाबाद : एखादा शंभर टक्के ध्येयवेडा माणूस समाजात परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मोठे ध्येय समोर ठेवून काम केले, तर खूप चांगले काम सहज उभे राहू शकते,

औरंगाबाद : एखादा शंभर टक्के ध्येयवेडा माणूस समाजात परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मोठे ध्येय समोर ठेवून काम केले, तर खूप चांगले काम सहज उभे राहू शकते, असे प्रतिपादन ख्यातनाम शास्त्रज्ञ व समाजसेवक बाळासाहेब दराडे यांनी रविवारी येथे केले.टेंडर केअर होम आणि इन्स्टिट्यूट आॅफ सायकॉलॉजिकल हेल्थ यांच्यातर्फे सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात झालेल्या ‘वेध’ या व्यवसाय प्रबोधन परिषदेत ते बोलत होते. ‘गरज की चैन’ हे सूत्र असलेल्या परिषदेत दराडे यांच्यासह मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, उद्योजक सुनील रायठठ्ठा, पारधी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत शिक्षक मतीन भोसले, पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या मानसी करंदीकर आणि केतकी घाटे या मान्यवरांनी अनुभव कथनातून आपला जीवनपट उलगडला. मनोविकार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी या मान्यवरांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. आपले शिक्षण, अमेरिकेतील करिअर, नासाबरोबर केलेले कार्य, अमेरिकेतून परतल्यानंतर ग्रामविकासाच्या कार्यात झोकून देऊन केलेले काम, याबाबत दराडे यांनी मनमोकळा संवाद साधला. ‘देशासाठी काही करायचे असल्यास त्यासाठी मोठ्या बुद्धिमत्तेची नव्हे, तर शुद्ध हृदयाची गरज आहे,’ असेही दराडे यांनी स्पष्ट केले. निसर्ग, पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही करिअर व कामाचा भाग म्हणून स्वीकारली आहे. त्यातूनच आम्हाला जीवनाचा खरा अर्थ आणि आनंदही प्राप्त झाल्याचे मानसी करंदीकर, केतकी घाटे यांनी सांगितले. फासेपारधी समाजाने मुख्य प्रवाहात यावे या हेतूने त्यांच्या पाल्यांसाठी विशेष शाळा सुरूकरणाऱ्या भोसले यांनीही आपला जीवनप्रवास उलगडला. कुटुंबियांसोबत छान गप्पा मारणे, हे मला आॅस्करपेक्षाही जास्त महत्त्वाचे वाटते, अशा शब्दांत मृण्मयीने आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्योगाचे यश व कीर्ती हा सामाजिक ठेवाच असून, त्यामुळेच कामगार-कर्मचाऱ्यांना नफ्यामध्ये वाटा देण्याची पद्धत सुरू केल्याचे रायठठ्ठा यांनी नमूद केले.