शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

ध्येयवेडातूनच परिवर्तन शक्य- दराडे

By admin | Updated: January 17, 2016 23:56 IST

औरंगाबाद : एखादा शंभर टक्के ध्येयवेडा माणूस समाजात परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मोठे ध्येय समोर ठेवून काम केले, तर खूप चांगले काम सहज उभे राहू शकते,

औरंगाबाद : एखादा शंभर टक्के ध्येयवेडा माणूस समाजात परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मोठे ध्येय समोर ठेवून काम केले, तर खूप चांगले काम सहज उभे राहू शकते, असे प्रतिपादन ख्यातनाम शास्त्रज्ञ व समाजसेवक बाळासाहेब दराडे यांनी रविवारी येथे केले.टेंडर केअर होम आणि इन्स्टिट्यूट आॅफ सायकॉलॉजिकल हेल्थ यांच्यातर्फे सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात झालेल्या ‘वेध’ या व्यवसाय प्रबोधन परिषदेत ते बोलत होते. ‘गरज की चैन’ हे सूत्र असलेल्या परिषदेत दराडे यांच्यासह मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, उद्योजक सुनील रायठठ्ठा, पारधी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत शिक्षक मतीन भोसले, पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या मानसी करंदीकर आणि केतकी घाटे या मान्यवरांनी अनुभव कथनातून आपला जीवनपट उलगडला. मनोविकार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी या मान्यवरांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. आपले शिक्षण, अमेरिकेतील करिअर, नासाबरोबर केलेले कार्य, अमेरिकेतून परतल्यानंतर ग्रामविकासाच्या कार्यात झोकून देऊन केलेले काम, याबाबत दराडे यांनी मनमोकळा संवाद साधला. ‘देशासाठी काही करायचे असल्यास त्यासाठी मोठ्या बुद्धिमत्तेची नव्हे, तर शुद्ध हृदयाची गरज आहे,’ असेही दराडे यांनी स्पष्ट केले. निसर्ग, पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही करिअर व कामाचा भाग म्हणून स्वीकारली आहे. त्यातूनच आम्हाला जीवनाचा खरा अर्थ आणि आनंदही प्राप्त झाल्याचे मानसी करंदीकर, केतकी घाटे यांनी सांगितले. फासेपारधी समाजाने मुख्य प्रवाहात यावे या हेतूने त्यांच्या पाल्यांसाठी विशेष शाळा सुरूकरणाऱ्या भोसले यांनीही आपला जीवनप्रवास उलगडला. कुटुंबियांसोबत छान गप्पा मारणे, हे मला आॅस्करपेक्षाही जास्त महत्त्वाचे वाटते, अशा शब्दांत मृण्मयीने आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्योगाचे यश व कीर्ती हा सामाजिक ठेवाच असून, त्यामुळेच कामगार-कर्मचाऱ्यांना नफ्यामध्ये वाटा देण्याची पद्धत सुरू केल्याचे रायठठ्ठा यांनी नमूद केले.