शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

डीसीसीवरून राकाँचे पालकमंत्र्यांना आव्हान

By admin | Updated: June 24, 2014 00:31 IST

उस्मानाबाद : जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळण्यासाठी वारंवार मागणी करूनही शासनाकडून सापत्न वागणूक देण्यात आली आहे़

उस्मानाबाद : जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळण्यासाठी वारंवार मागणी करूनही शासनाकडून सापत्न वागणूक देण्यात आली आहे़ राज्यातील इतर तीन बँकांना शासनाने मदत केली असून, उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत का मिळत नाही? जिल्हा परिषदेचे व्यवहार डीसीसीपासून लांब का ठेवण्यात आले, याचा खुलासा पालकमंत्र्यांनी करावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने एका पत्रकान्वये दिले आहे. राज्य शासनाने नागपूर बँकेला ९२़९४ कोटी, वर्धा बँकेला १०२़५६ कोटी तर बुलडाणा जिल्हा बँकेला १२४़४ कोटी रूपये अशी एकूण ३१९़५४ कोटी रूपयांची शासकीय भागभांडवलाच्या स्वरूपात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे़ तर यापूर्वी नांदेड जिल्हा बँकेला १०० कोटी, धूळे-नंदूरबार बँकेला ६० कोटी तर जालना बँकेला २० कोटी रूपये अनुदान स्वरूपात मदत केली आहे़ उस्मानाबाद जिल्हा बँकेला शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे, यासाठी वारंवार मागणी करूनही सापत्न भावनेने दुर्लक्ष करण्यात आले आहे़ बँकेने स्वबळावर बँकींग परवाना मिळविला आहे़ तरीही बँकेत चलन तुटवडा कायम आहे़ त्यामुळे राज्य शासनाने इतर जिल्हा बँकांप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत करणे अपेक्षित आहे़ वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री बँकेस अर्थसहाय्य करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत असताना जिल्हा बँकेला मदत का मिळत नाही, हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी काढलेल्या पत्रकात केले आहे़ तसेच नागपूर जिल्हा परिषदेची विविध खाती डीसीसी बँकेत चालू आहेत़ असे असताना उस्मानाबाद जि.प.चे व्यवहार डीसीसीपासून दूर का? याचाही खुलासा करावा, असे आवाहन करीत जनतेच्या हितासाठी जिल्हा बँक सक्षम करण्याची गरज असल्याचेही पत्रकात म्हटले आहे़मी सातत्याने पाठपुरावा केला : चव्हाणराष्ट्रवादीच्या आरोपाबाबत पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत मिळावी यासाठी खरीप हंगाम बैठकीसह कॅबिनेटमध्ये वारंवार पाठपुरावा केला आहे़ तेरणा व तुळजा भवानी या दोन साखर कारखान्याकडे बँकेचे जवळपास सव्वादोनशे कोटी रूपये कर्ज आहे़ ते वसूल करण्याबाबत शासनाकडून सांगण्यात आले आहे़ राष्ट्रवादीकडून राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप करण्यात येत असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री त्यांचेच आहेत, त्यामुळे बँकेला निधी का मिळत नाही, हे त्यांनाच विचारावे़ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडेच कर्ज आहे, त्यांनी वसूल करून बँकेला द्यावे, असे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले़