शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

डीसीसीवरून राकाँचे पालकमंत्र्यांना आव्हान

By admin | Updated: June 24, 2014 00:31 IST

उस्मानाबाद : जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळण्यासाठी वारंवार मागणी करूनही शासनाकडून सापत्न वागणूक देण्यात आली आहे़

उस्मानाबाद : जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळण्यासाठी वारंवार मागणी करूनही शासनाकडून सापत्न वागणूक देण्यात आली आहे़ राज्यातील इतर तीन बँकांना शासनाने मदत केली असून, उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत का मिळत नाही? जिल्हा परिषदेचे व्यवहार डीसीसीपासून लांब का ठेवण्यात आले, याचा खुलासा पालकमंत्र्यांनी करावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने एका पत्रकान्वये दिले आहे. राज्य शासनाने नागपूर बँकेला ९२़९४ कोटी, वर्धा बँकेला १०२़५६ कोटी तर बुलडाणा जिल्हा बँकेला १२४़४ कोटी रूपये अशी एकूण ३१९़५४ कोटी रूपयांची शासकीय भागभांडवलाच्या स्वरूपात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे़ तर यापूर्वी नांदेड जिल्हा बँकेला १०० कोटी, धूळे-नंदूरबार बँकेला ६० कोटी तर जालना बँकेला २० कोटी रूपये अनुदान स्वरूपात मदत केली आहे़ उस्मानाबाद जिल्हा बँकेला शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे, यासाठी वारंवार मागणी करूनही सापत्न भावनेने दुर्लक्ष करण्यात आले आहे़ बँकेने स्वबळावर बँकींग परवाना मिळविला आहे़ तरीही बँकेत चलन तुटवडा कायम आहे़ त्यामुळे राज्य शासनाने इतर जिल्हा बँकांप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत करणे अपेक्षित आहे़ वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री बँकेस अर्थसहाय्य करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत असताना जिल्हा बँकेला मदत का मिळत नाही, हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी काढलेल्या पत्रकात केले आहे़ तसेच नागपूर जिल्हा परिषदेची विविध खाती डीसीसी बँकेत चालू आहेत़ असे असताना उस्मानाबाद जि.प.चे व्यवहार डीसीसीपासून दूर का? याचाही खुलासा करावा, असे आवाहन करीत जनतेच्या हितासाठी जिल्हा बँक सक्षम करण्याची गरज असल्याचेही पत्रकात म्हटले आहे़मी सातत्याने पाठपुरावा केला : चव्हाणराष्ट्रवादीच्या आरोपाबाबत पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत मिळावी यासाठी खरीप हंगाम बैठकीसह कॅबिनेटमध्ये वारंवार पाठपुरावा केला आहे़ तेरणा व तुळजा भवानी या दोन साखर कारखान्याकडे बँकेचे जवळपास सव्वादोनशे कोटी रूपये कर्ज आहे़ ते वसूल करण्याबाबत शासनाकडून सांगण्यात आले आहे़ राष्ट्रवादीकडून राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप करण्यात येत असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री त्यांचेच आहेत, त्यामुळे बँकेला निधी का मिळत नाही, हे त्यांनाच विचारावे़ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडेच कर्ज आहे, त्यांनी वसूल करून बँकेला द्यावे, असे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले़