शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कलाकाराला दररोज परीक्षेचे आव्हान - वंदना गुप्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:14 IST

प्रत्येक कलाकाराला दररोज परीक्षेला सामोरे जावे लागते. या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागते. यात नापास होऊन चालत नाही. कारण दुसऱ्याच दिवशी प्रयोगाच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा द्यावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन सुप्रसिद्ध सिनेकलावंत वंदना गुप्ते यांनी केले.

ठळक मुद्देऔरंगाबाद : नाट्य महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रत्येक कलाकाराला दररोज परीक्षेला सामोरे जावे लागते. या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागते. यात नापास होऊन चालत नाही. कारण दुसऱ्याच दिवशी प्रयोगाच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा द्यावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन सुप्रसिद्ध सिनेकलावंत वंदना गुप्ते यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित ४१ व्या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर होते. यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. साधना पांडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी, विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर उपस्थित होते. यावेळी वंदना गुप्ते यांनी नाट्य क्षेत्रातील चढ-उतार मांडले. रंगमंचावर पहिली उडी धोकादायक असते. ती एकदा घेतली की, सगळ्या गोष्टी होत राहतात. पहिल्या नाटकाच्या प्रयोगावेळी दडपणात होते. तरीही मागील ४६ वर्षांच्या काळात तब्बल १२ हजार ६२९ प्रयोग रंगभूमीवर केव्हा केले, याचे कोडे उलगडत नसल्याचे गुप्ते म्हणाल्या. कलाकार हा आयुष्यभर विद्यार्थीच असला पाहिजे. त्याला प्रत्येक प्रयोगातून काहीतरी नवीन शिकायला मिळते. नाट्य क्षेत्रात आपण एकेक पायरी वर चढत असतो. ती कायम चढतच राहावी लागते. जेव्हा आपण पायरी चढण्याचे थांबतो अन् मला सगळे येते म्हणून खाली वाकून पाहतो, तेव्हा आपण संपलेलो असतो, हे प्रत्येक कलाकाराने लक्षात ठेवले पाहिजे, असेही वंदना गुप्ते यांनी स्पष्ट केले. शेवटी ‘झुंज’ नाटकातील प्रसिद्ध डायलॉग सादर करीत भाषणाचा शेवट केला. अध्यक्षीय समारोप प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. यात त्यांनी नाट्यप्रेमींसाठी लागणाºया सर्व सोयी-सुविधा विद्यापीठ प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. जयंत शेवतेकर यांनी केले. यात त्यांनी महोत्सवाच्या ऐतिहासिकतेचा आढावा घेतला.पाहुण्यांचा परिचय प्रा. स्मिता साबळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. राखी सलगर यांनी केले. आभार प्रा. सुनील टाक यांनी मानले.