शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कलाकाराला दररोज परीक्षेचे आव्हान - वंदना गुप्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:14 IST

प्रत्येक कलाकाराला दररोज परीक्षेला सामोरे जावे लागते. या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागते. यात नापास होऊन चालत नाही. कारण दुसऱ्याच दिवशी प्रयोगाच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा द्यावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन सुप्रसिद्ध सिनेकलावंत वंदना गुप्ते यांनी केले.

ठळक मुद्देऔरंगाबाद : नाट्य महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रत्येक कलाकाराला दररोज परीक्षेला सामोरे जावे लागते. या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागते. यात नापास होऊन चालत नाही. कारण दुसऱ्याच दिवशी प्रयोगाच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा द्यावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन सुप्रसिद्ध सिनेकलावंत वंदना गुप्ते यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित ४१ व्या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर होते. यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. साधना पांडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी, विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर उपस्थित होते. यावेळी वंदना गुप्ते यांनी नाट्य क्षेत्रातील चढ-उतार मांडले. रंगमंचावर पहिली उडी धोकादायक असते. ती एकदा घेतली की, सगळ्या गोष्टी होत राहतात. पहिल्या नाटकाच्या प्रयोगावेळी दडपणात होते. तरीही मागील ४६ वर्षांच्या काळात तब्बल १२ हजार ६२९ प्रयोग रंगभूमीवर केव्हा केले, याचे कोडे उलगडत नसल्याचे गुप्ते म्हणाल्या. कलाकार हा आयुष्यभर विद्यार्थीच असला पाहिजे. त्याला प्रत्येक प्रयोगातून काहीतरी नवीन शिकायला मिळते. नाट्य क्षेत्रात आपण एकेक पायरी वर चढत असतो. ती कायम चढतच राहावी लागते. जेव्हा आपण पायरी चढण्याचे थांबतो अन् मला सगळे येते म्हणून खाली वाकून पाहतो, तेव्हा आपण संपलेलो असतो, हे प्रत्येक कलाकाराने लक्षात ठेवले पाहिजे, असेही वंदना गुप्ते यांनी स्पष्ट केले. शेवटी ‘झुंज’ नाटकातील प्रसिद्ध डायलॉग सादर करीत भाषणाचा शेवट केला. अध्यक्षीय समारोप प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. यात त्यांनी नाट्यप्रेमींसाठी लागणाºया सर्व सोयी-सुविधा विद्यापीठ प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. जयंत शेवतेकर यांनी केले. यात त्यांनी महोत्सवाच्या ऐतिहासिकतेचा आढावा घेतला.पाहुण्यांचा परिचय प्रा. स्मिता साबळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. राखी सलगर यांनी केले. आभार प्रा. सुनील टाक यांनी मानले.