शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

टंचाई निवारणाचे प्रशासनापुढे आव्हान

By admin | Updated: July 3, 2014 00:16 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड गत तीन वर्षापासून बीड जिल्हयात अल्प पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात १११ विहीरी तर २५७ बोअर अधिग्रहीत केले आहेत.

व्यंकटेश वैष्णव, बीडगत तीन वर्षापासून बीड जिल्हयात अल्प पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात १११ विहीरी तर २५७ बोअर अधिग्रहीत केले आहेत. शिरूर कासार, धारूर, बीड तालुक्यातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यातच २ जुलै चा दिवस उजडला तरी देखील पाऊस पडत नसल्याने पाणी टंचाई च्या गावांमध्ये वाढ होत असून टँकर मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज स्थितीत जिल्हयात १८० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून पंधरा दिवस पाऊस पडला नाही तर टँकरची संख्या ४०० पर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.जिल्हयातील केज व शिरूर कासार तालुक्यात पाण्याच्या टंचाईची तीव्रता जास्त आहे. आज नाही तर उद्या पाऊस पडेल या आशेवर जिल्हयातील ग्रामस्थ जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी करत नव्हते. मात्र ३ जुलै उजडला तरी पावसाचा पत्ता नसल्याने आता जमीनीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खलावत असून सुरू असलेले बोअर, हातपंप अचानक बंद पडत आहेत. वडवणी, अंबाजोगाई व माजलगाव हे तालुके वगळता इतर आठ तालुक्यात पाणी टंचाई जाणवत आहे. मंगळवारी दोन तालुक्यातील चार ते पाच गावांना टँकर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये केज तालुक्यात दोन ते तीन तर शिरूर कासार तालुक्याती दोन गावांमध्ये मंगळवारी टँकर वाढविण्यात आले आहे. पाऊस लांबणीवर पडत असल्याने पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण होत आहे. १४६ गावे तर २११ वाड्यांवर टंचाईचे सावटजिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात १११ विहीरी व २५७ बोअर अधिग्रहित केलेले असून जिल्ह्यात १४६ गावे तर २११ वाड्यावर १८० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात समाधानकारक पाऊस न पडल्यास जिल्हयात बहुतांश गावांमध्ये अजूनही पाणी टंचाई तीव्र होऊ शकते. पाणी टंचाईची जास्त तीव्रता आष्टी, शिरूर कासार, धारूर व केज तालुक्यांमध्ये जाणवत आहे. यामुळे आता नागरिक पावसाची आतुरतेने वाट पहात असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.सर्व स्त्रोत घेतले ताब्यातजिल्हयातील ज्या-ज्या लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी साठा शिल्लक आहे. ते सर्व तलाव पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत केलेले आहेत. भविष्यात पाऊस पडला नाही तर प्रशासन पाणी टंचाईशी सामना करण्यासाठी तयार आहे. असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.