शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

थकबाकी वसुलीसाठी छावणीचे पाणी कापले

By admin | Updated: December 1, 2015 00:29 IST

औरंगाबाद : महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी साडेचार कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी छावणी परिषदेचा पाणीपुरवठा बंद केला.

औरंगाबाद : महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी साडेचार कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी छावणी परिषदेचा पाणीपुरवठा बंद केला. त्यानंतर छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मनपात धाव घेऊन महिनाभरात थकबाकीची रक्कम भरण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी छावणीचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी महानगरपालिकेने जायकवाडीपासून शहरापर्यंत जलवाहिनी टाकलेली आहे. याच जलवाहिनीतून मनपाने छावणीसाठी स्वतंत्र कनेक्शन दिलेले आहे. त्याद्वारे छावणी परिषद त्यांच्या हद्दीतील सुमारे २० हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करते. मनपाकडून छावणी परिषदेला हे पाणी विकत दिले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून छावणी परिषदेने मनपाकडे पैशांचा भरणा केलेला नाही. त्यामुळे छावणी परिषदेकडे ४ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. तिच्या वसुलीसाठी मनपाने दोन महिन्यांत छावणी परिषदेला दोन नोटिसा दिल्या; परंतु छावणी परिषदेने थकबाकीची रक्कम भरली नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने सोमवारी सकाळीच मुख्य जलवाहिनीद्वारे छावणी परिषदेला होणारा पुरवठा बंद केला. या कारवाईनंतर छावणी परिषदेच्या मुख्याधिकारी पूजा पालेचा आणि लष्कराचे एक अधिकारी तातडीने मनपात दाखल झाले. त्यांनी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. महिनाभरात थकबाकी भरण्याचे आश्वासन परिषदेच्या वतीने यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर दुपारी पुन्हा छावणीचा पुरवठा सुरू करण्यात आला.