शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

‘सीजीओ’तून मिळणार शहराच्या विकासाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:03 IST

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या विकासाला गती मिळावी, या उद्देशाने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (दि. १६) ‘सीजीओ' अर्थात ...

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या विकासाला गती मिळावी, या उद्देशाने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (दि. १६) ‘सीजीओ' अर्थात को- गव्हर्न्मेंटल ऑर्गनायझेशन स्थापन करण्याचे सूतोवाच केले. सामाजिक संघटनांच्या सहकार्याने चालणारे शासकीय कामकाज म्हणजेच ‘सीजीओ' होय. राज्यात किंवा देशात अशा पद्धतीचा उपक्रम कोठेच राबविण्यात आलेला नाही. आदित्य ठाकरे यांनी ‘सीजीओ’वर भविष्यात काम केल्यास त्याचा शहराच्या विकासासाठी मोठा फायदा होईल, असे मत वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

एकेकाळी आशिया खंडामध्ये वेगाने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादचा नावलौकिक होता. मागील सहा-सात वर्षांमध्ये मात्र शहरात येणारे नवनवीन प्रकल्प पळविण्यात आले. महापालिकेचा कारभारही शहराच्या विकासाला पूरक ठरला नाही. शहराच्या विकासाची दिशाच भरकटून गेल्याचे चित्र दिसत आहे. पाण्यासारख्या मूलभूत समस्येसाठीही लोक त्रस्त आहेत. या परिस्थितीत आदित्य ठाकरे यांनी शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी शनिवारी शहरातील मान्यवरांशी चर्चा करताना ‘सीजीओ’चा विचार मांडला. या संदर्भात शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. मान्यवरांनी मांडलेल्या विचारांचा हा आढावा.

छोटे-छोटे प्रश्न मार्गी लागले तरी खूप

राज्य शासन आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना मिळून एकत्रितरीत्या काम केल्यास त्याचा खूप फायदा होईल. दोन महिन्यांतून एकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वेगवेगळ्या छोट्या-छोट्या प्रश्नांवर बैठका झाल्यास ते मार्गी लागतील. पालकमंत्री सुभाष देसाई शहराच्या विकासासाठी खूप सकारात्मक आहेत. त्यांचाही या उपक्रमाला फायदा होईल.

- मुकुंद कुलकर्णी, उद्योजक