शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

‘सीजीओ’तून मिळणार शहराच्या विकासाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:03 IST

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या विकासाला गती मिळावी, या उद्देशाने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (दि. १६) ‘सीजीओ' अर्थात ...

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या विकासाला गती मिळावी, या उद्देशाने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (दि. १६) ‘सीजीओ' अर्थात को- गव्हर्न्मेंटल ऑर्गनायझेशन स्थापन करण्याचे सूतोवाच केले. सामाजिक संघटनांच्या सहकार्याने चालणारे शासकीय कामकाज म्हणजेच ‘सीजीओ' होय. राज्यात किंवा देशात अशा पद्धतीचा उपक्रम कोठेच राबविण्यात आलेला नाही. आदित्य ठाकरे यांनी ‘सीजीओ’वर भविष्यात काम केल्यास त्याचा शहराच्या विकासासाठी मोठा फायदा होईल, असे मत वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

एकेकाळी आशिया खंडामध्ये वेगाने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादचा नावलौकिक होता. मागील सहा-सात वर्षांमध्ये मात्र शहरात येणारे नवनवीन प्रकल्प पळविण्यात आले. महापालिकेचा कारभारही शहराच्या विकासाला पूरक ठरला नाही. शहराच्या विकासाची दिशाच भरकटून गेल्याचे चित्र दिसत आहे. पाण्यासारख्या मूलभूत समस्येसाठीही लोक त्रस्त आहेत. या परिस्थितीत आदित्य ठाकरे यांनी शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी शनिवारी शहरातील मान्यवरांशी चर्चा करताना ‘सीजीओ’चा विचार मांडला. या संदर्भात शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. मान्यवरांनी मांडलेल्या विचारांचा हा आढावा.

छोटे-छोटे प्रश्न मार्गी लागले तरी खूप

राज्य शासन आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना मिळून एकत्रितरीत्या काम केल्यास त्याचा खूप फायदा होईल. दोन महिन्यांतून एकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वेगवेगळ्या छोट्या-छोट्या प्रश्नांवर बैठका झाल्यास ते मार्गी लागतील. पालकमंत्री सुभाष देसाई शहराच्या विकासासाठी खूप सकारात्मक आहेत. त्यांचाही या उपक्रमाला फायदा होईल.

- मुकुंद कुलकर्णी, उद्योजक