शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सीजीओ ः प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:07 IST

-- सीजीओची संकल्पना चांगली आहे. मात्र, यापूर्वीही पाणी, इतिहास, उद्योग, स्वच्छता, मूलभूत सुविधांतील तज्ज्ञांनी वेळोवेळी सूचना मनपा प्रशासनाकडे केल्या. ...

--

सीजीओची संकल्पना चांगली आहे. मात्र, यापूर्वीही पाणी, इतिहास, उद्योग, स्वच्छता, मूलभूत सुविधांतील तज्ज्ञांनी वेळोवेळी सूचना मनपा प्रशासनाकडे केल्या. अर्ज, निवेदने, आंदोलने करून मनपा, पर्यटन, पुरातत्व, उद्योग, बांधकाम विभागाचे ध्यान आकर्षिले मात्र, त्या सूचनांचा विचार झाला नाही. केवळ स्मार्ट सिटी योजनेपुरता विकास अभिप्रेत नाही. शाश्वत विकासाचा विचार जो तज्ज्ञ सांगतात त्याकडे प्रत्येकवळी कॉर्पोरेट नजरेतून पाहून चालणार नाही. त्यामुळे खऱ्या तज्ज्ञ, प्रत्यक्ष काम करणाऱ्या सामाजिक संस्था सीजीओत जातील की राजकारण्यांची वर्णी लागेल याबद्दल शंका वाटते.

-वर्षा बैनाडे, शहर अधिकारी, युवतीसेना-युवासेना

----

युवक राजकारणापेक्षा विकास संशोधनाकडे वळतील

--

शासन आणि सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन काम केल्यास ते विकासासाठी योग्य ठरेल. म्हणून सीजीओ सकल्पना चांगली आहे. केवळ राजकीय लोकांचीच मते विचारात घेतली जात असताना असे पाऊल कल्पक, अभ्यासू आणि तज्ज्ञ युवकांच्या विचारांचाही या संकल्पनेत उपयोग करता येईल. केवळ सामजिक संघटन, संवर्धन कार्य करणाऱ्या युवकांना विकासात मत मांडता येईल. विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होता येईल. यातून नवयुवक राजकारणापेक्षा विकास संशोधनाकडे अधिक वळतील. सीजीओची स्थापना आणि अंमलबजावणी हे शहर विकासासाठी आदर्शवत पाऊल ठरेल.

-संतोष जाटवे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ

---

निवडणुकीनंतर अशा घोषणा हवेत विरून जातात

---

मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयश आल्याने नवीन नामधारी योजना राबविणार असल्याचे दिसते आहे. मनपात शिवसेना भाजपची सत्ता मागील २० वर्षांपेक्षा अधिक काळ आहे. आमदार खासदार स्थानिक स्वराज संस्थेत सत्ता असताना आजही रस्ते, पाणी, वीज, मलनिस्सारण व्यवस्था कोलमडलेली आहे. नागरिकांचा पैसा जाहिरातबाजी, इव्हेंटवर खर्च केला जातो. स्मार्ट सिटी योजना, सीजीओसारखे खूळ धूळफेक आहे. प्रत्यक्षात मात्र नागरी समस्या ‘जैसे थे’ आहेत. सीजीओ योजना सीएसआर योजनेसारखीच असून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेल्या घोषणा हवेत विरून जातात.

-सचिन निकम, मराठवाडा अध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना

---