शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘सीजीओ’मुळे सामान्यांच्या अपेक्षा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी औरंगाबादेत शहराच्या विकासासाठी ‘सीजीओ’ अर्थात को-गव्हर्नमेंट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी औरंगाबादेत शहराच्या विकासासाठी ‘सीजीओ’ अर्थात को-गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन स्थापन करण्याची घोषणा केली. या घोषणेला बळ देण्याचे काम महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी केले. लवकरात लवकर सीजीओ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मागील काही वर्षांपासून थांबलेल्या विकासचक्राला पुन्हा गती मिळण्याची शक्यता सर्वसामान्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.

निव्वळ घोषणा करून चालणार नाही

शिवसेना आणि मित्रपक्षांच्या सरकारकडून वारंवार घोषणा होत आहेत. मात्र, अंमलबजावणी काहीच होत नाही. शहरातील नवीन पाणीपुरवठा योजना, जंगल सफारी पार्क अशा कितीतरी योजना रखडल्या आहेत. शहर विकासासाठी सीजीओ स्थापन करण्याचा निर्णय चांगला आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी झाली पाहिजे.

अमेय दिवाकर देशमुख, भाजप कार्यकर्ता

एकानंतर एक चांगले निर्णय

महाविकास आघाडी सरकारने मागील एक वर्षात दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली आहे. शहरातील पाणीप्रश्न क्षणार्धात सोडविण्यात आला. रस्त्यांसाठी १५२ कोटी रुपये दिले. सीजीओ स्थापन करून सरकार नागरिकांच्या स्वप्नातले शहर उभारण्याचा प्रयत्न करत आहे, ही चांगली व अभिमानास्पद बाब आहे.

सागर संजय नागरे, काँग्रेस कार्यकर्ता.

दिलेला शब्द शिवसेनाच पाळते

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे शहरात लवकरच सीजीओ मंडळ स्थापन होईल. या मंडळाकडून प्राप्त होणाऱ्या सूचना महापालिकेमार्फत शासनाकडे जातील. एक सुंदर आयडियल शहर यातून निर्माण होईल, अशी अपेक्षा करायला अजिबात हरकत नाही.

संजय सांडू हरणे, कार्यकर्ता, शिवसेना.

पुढील चार वर्षात शहराचा विकास नक्की होणार

मागील वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने मोठे प्रश्न मार्गी लावले. शहरातील इतर विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सीजीओ मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. तसेच आगामी चार वर्षांत शहरात विकासाची अनेक कामे मार्गी लागतील.

वैशाली साबळे पाटील, कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस.

सरकारने जुन्या शहराकडेही लक्ष द्यावे

महाविकास आघाडी सरकारकडून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. ही कामे करताना जुन्या औरंगाबाद शहराला विचारात घेतले पाहिजे. १५२ कोटी रुपये निधीतून रस्ते करताना जुन्या शहराला खूप काही मिळाले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. भविष्यात तरी सीजीओ स्थापन झाल्यावर असे होऊ नये, हीच रास्त अपेक्षा आहे.

सलीम पटेल बोरगावकर, कार्यकर्ता, एमआयएम.