शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सीजीओ’मुळे सामान्यांच्या अपेक्षा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी औरंगाबादेत शहराच्या विकासासाठी ‘सीजीओ’ अर्थात को-गव्हर्नमेंट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी औरंगाबादेत शहराच्या विकासासाठी ‘सीजीओ’ अर्थात को-गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन स्थापन करण्याची घोषणा केली. या घोषणेला बळ देण्याचे काम महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी केले. लवकरात लवकर सीजीओ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मागील काही वर्षांपासून थांबलेल्या विकासचक्राला पुन्हा गती मिळण्याची शक्यता सर्वसामान्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.

निव्वळ घोषणा करून चालणार नाही

शिवसेना आणि मित्रपक्षांच्या सरकारकडून वारंवार घोषणा होत आहेत. मात्र, अंमलबजावणी काहीच होत नाही. शहरातील नवीन पाणीपुरवठा योजना, जंगल सफारी पार्क अशा कितीतरी योजना रखडल्या आहेत. शहर विकासासाठी सीजीओ स्थापन करण्याचा निर्णय चांगला आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी झाली पाहिजे.

अमेय दिवाकर देशमुख, भाजप कार्यकर्ता

एकानंतर एक चांगले निर्णय

महाविकास आघाडी सरकारने मागील एक वर्षात दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली आहे. शहरातील पाणीप्रश्न क्षणार्धात सोडविण्यात आला. रस्त्यांसाठी १५२ कोटी रुपये दिले. सीजीओ स्थापन करून सरकार नागरिकांच्या स्वप्नातले शहर उभारण्याचा प्रयत्न करत आहे, ही चांगली व अभिमानास्पद बाब आहे.

सागर संजय नागरे, काँग्रेस कार्यकर्ता.

दिलेला शब्द शिवसेनाच पाळते

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे शहरात लवकरच सीजीओ मंडळ स्थापन होईल. या मंडळाकडून प्राप्त होणाऱ्या सूचना महापालिकेमार्फत शासनाकडे जातील. एक सुंदर आयडियल शहर यातून निर्माण होईल, अशी अपेक्षा करायला अजिबात हरकत नाही.

संजय सांडू हरणे, कार्यकर्ता, शिवसेना.

पुढील चार वर्षात शहराचा विकास नक्की होणार

मागील वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने मोठे प्रश्न मार्गी लावले. शहरातील इतर विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सीजीओ मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. तसेच आगामी चार वर्षांत शहरात विकासाची अनेक कामे मार्गी लागतील.

वैशाली साबळे पाटील, कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस.

सरकारने जुन्या शहराकडेही लक्ष द्यावे

महाविकास आघाडी सरकारकडून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. ही कामे करताना जुन्या औरंगाबाद शहराला विचारात घेतले पाहिजे. १५२ कोटी रुपये निधीतून रस्ते करताना जुन्या शहराला खूप काही मिळाले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. भविष्यात तरी सीजीओ स्थापन झाल्यावर असे होऊ नये, हीच रास्त अपेक्षा आहे.

सलीम पटेल बोरगावकर, कार्यकर्ता, एमआयएम.