शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘सीजीओ’मुळे सामान्यांच्या अपेक्षा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी औरंगाबादेत शहराच्या विकासासाठी ‘सीजीओ’ अर्थात को-गव्हर्नमेंट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी औरंगाबादेत शहराच्या विकासासाठी ‘सीजीओ’ अर्थात को-गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन स्थापन करण्याची घोषणा केली. या घोषणेला बळ देण्याचे काम महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी केले. लवकरात लवकर सीजीओ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मागील काही वर्षांपासून थांबलेल्या विकासचक्राला पुन्हा गती मिळण्याची शक्यता सर्वसामान्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.

निव्वळ घोषणा करून चालणार नाही

शिवसेना आणि मित्रपक्षांच्या सरकारकडून वारंवार घोषणा होत आहेत. मात्र, अंमलबजावणी काहीच होत नाही. शहरातील नवीन पाणीपुरवठा योजना, जंगल सफारी पार्क अशा कितीतरी योजना रखडल्या आहेत. शहर विकासासाठी सीजीओ स्थापन करण्याचा निर्णय चांगला आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी झाली पाहिजे.

अमेय दिवाकर देशमुख, भाजप कार्यकर्ता

एकानंतर एक चांगले निर्णय

महाविकास आघाडी सरकारने मागील एक वर्षात दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली आहे. शहरातील पाणीप्रश्न क्षणार्धात सोडविण्यात आला. रस्त्यांसाठी १५२ कोटी रुपये दिले. सीजीओ स्थापन करून सरकार नागरिकांच्या स्वप्नातले शहर उभारण्याचा प्रयत्न करत आहे, ही चांगली व अभिमानास्पद बाब आहे.

सागर संजय नागरे, काँग्रेस कार्यकर्ता.

दिलेला शब्द शिवसेनाच पाळते

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे शहरात लवकरच सीजीओ मंडळ स्थापन होईल. या मंडळाकडून प्राप्त होणाऱ्या सूचना महापालिकेमार्फत शासनाकडे जातील. एक सुंदर आयडियल शहर यातून निर्माण होईल, अशी अपेक्षा करायला अजिबात हरकत नाही.

संजय सांडू हरणे, कार्यकर्ता, शिवसेना.

पुढील चार वर्षात शहराचा विकास नक्की होणार

मागील वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने मोठे प्रश्न मार्गी लावले. शहरातील इतर विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सीजीओ मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. तसेच आगामी चार वर्षांत शहरात विकासाची अनेक कामे मार्गी लागतील.

वैशाली साबळे पाटील, कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस.

सरकारने जुन्या शहराकडेही लक्ष द्यावे

महाविकास आघाडी सरकारकडून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. ही कामे करताना जुन्या औरंगाबाद शहराला विचारात घेतले पाहिजे. १५२ कोटी रुपये निधीतून रस्ते करताना जुन्या शहराला खूप काही मिळाले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. भविष्यात तरी सीजीओ स्थापन झाल्यावर असे होऊ नये, हीच रास्त अपेक्षा आहे.

सलीम पटेल बोरगावकर, कार्यकर्ता, एमआयएम.