शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

पिके कोमेजली !

By admin | Updated: August 19, 2016 01:03 IST

राजेश खराडे , बीड सरासरीएवढे पर्जन्यमान न होताही खरिपातील पिके अद्यापर्यंत जोमात होती. रिमझिम पावसामुळे का होईना पिके बहरात असताना गेल्या दहा दिवसांपासून पावसाची उघडीप

राजेश खराडे , बीडसरासरीएवढे पर्जन्यमान न होताही खरिपातील पिके अद्यापर्यंत जोमात होती. रिमझिम पावसामुळे का होईना पिके बहरात असताना गेल्या दहा दिवसांपासून पावसाची उघडीप व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमिनीतील ओल उडत आहे. परिणामी खरिपातील पिके सुकू लागली आहेत.मराठवाड्यात सर्वांत कमी पाऊस बीड जिल्ह्यात होऊनदेखील सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला होता. पीक लागवडीपासून वेळोवेळी पाऊस झाल्याने दोन महिन्यांतच दोन महिन्यात पिके बहरात आली होती. या उघडिपीच्या काळात शेतकऱ्यांनी मशागत आणि खत फवारणीची कामे करून घेतली. १० दिवसांचा कालावधी होऊन गेला तरीही पावसाचे पुनरागमन झालेले नाही. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी खोल मशागत केली आहे. सध्याचे ऊन आणि वारा यामुळे शेतजमीन कोरडीठाक पडू लागली आहे. हलक्या मशागतीची आवश्यकता असताना शेतकऱ्यांनी खोल मशागत केल्याचा परिणाम सद्य:स्थितीला जाणवू लागला आहे. त्यातच दिवस उजाडताच कडक ऊन पडत असून, दिवसभर उभे वारे सुटत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. अजून आठ दिवस तरी असे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्राने वर्तविला आहे. त्यामुळे पिकांची अवस्था काय होणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पीक वाढीकरिता पावसाची उघडीप फलदायी असली तरी सद्य:स्थितीला पावसाची नितांत गरज आहे. यातच शेतकऱ्यांनी पिकांना पाणी दिल्यास ओल उडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.