शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

सीईओ म्हणाले, पोलिस बोलावणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:02 IST

परिस्थिती येईल तेव्हाही पोलीस बोलावणारच, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेत जेव्हा केव्हा वित्त किंवा जीवित हानी होण्याची शक्यता असते, अशा वेळी पोलीस बोलावण्याची सतर्कता बाळगावीच लागते. मी त्या दिवशी पोलीस बोलावले होते व यापुढे अशी परिस्थिती येईल तेव्हाही पोलीस बोलावणारच, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांना दिला.जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी दुपारी स्थायी समितीची बैठक सुरू झाली. सुरुवातीलाच अविनाश पाटील गलांडे, किशोर बलांडे, रमेश गायकवाड यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला की, दलित वस्ती सुधार योजनेच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यतेसाठी आम्हाला आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, यासंदर्भात आम्ही १ सप्टेंबर रोजी लोकशाही मार्गाने मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनासमोर आंदोलन केले. नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी दालनाबाहेर येऊन आंदोलनकर्त्या सदस्यांसोबत संवाद साधला. त्यानंतर आम्ही निघालो तेव्हा पोलिसांनी तुम्हाला अटक करीत आहोत, गाडीत बसा, असा दम दिला. आम्ही अतिरेकी आहोत का, जिल्हा परिषदेत पोलिसांना बोलावून मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी काय साध्य केले?यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी सभागृहासमोर सविस्तर निवेदन केले. ते म्हणाले की, तुम्ही माझ्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करणार आहात याची पूर्वकल्पना दिलेली नव्हती. अचानकपणे माझ्या दालनासमोर तुम्ही आंदोलन सुरू करून ज्या पद्धतीच्या असंविधानिक घोषणा दिल्या, त्या न पटणाºया होत्या. त्यामुळे वातावरण बिघडू शकते, अशी माझी धारणा झाल्यामुळे मी पोलिसांना बोलावले. जेव्हा केव्हा जिल्हा परिषदेत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते तेव्हा पोलिसांना बोलवावेच लागते. मी ‘आयएएस’ अधिकारी आहे. यापूर्वी मी दंडाधिकारीय कामगिरी व्यवस्थितपणे सांभाळलेली आहे. त्यामुळे मला कायदा व सुव्यवस्था कशी हाताळावी लागते, याचे ज्ञान आहे. यापुढेही जिल्हा परिषदेत अशा प्रकारची घटना घडली, तर पोलिसांना नक्कीच बोलावले जाईल.त्यानंतर किशोर बलांडे म्हणाले की, आम्ही आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांना जिल्हा परिषदेत बोलावले होते. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड म्हणाले की, जेव्हा घोषणाबाजी सुरू झाली, त्याचवेळी मी पोलिसांना बोलावले होते. उपाध्यक्ष केशव तायडे म्हणाले की, जिल्हा परिषदेत पोलिसांना बोलावले, ही निंदनीय घटना आहे. आंदोलनाच्या वेळी अध्यक्ष आणि मी त्यांच्या दालनात बसलेलो होतो. सर्व प्रकरण मिटल्यानंतरही पोलीस त्यांच्या गाडीत बसवून जि.प. सदस्यांना ठाण्यात घेऊन जातात.पोलिसांना बोलावण्यापूर्वी तुम्ही आम्हाला सांगायला हवे होते. सर्वांचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर म्हणाल्या की, यापुढे जिल्हा परिषदेत असे काही होणार नाही. यासाठी दोन्ही बाजंूनी हे प्रकरण येथेच मिटवा. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे प्रशासनाच्या रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके सोबत चालली, तर प्रशासनाचा गाडा सुरळीत चालेल. त्यामुळे हा वाद आता येथेच मिटलेला बरा.