शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्रीय टीम पुढील आठवड्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छता सर्वेक्षण २०२१ उपक्रमात केंद्र शासनाचे पथक पुढील आठवड्यात शहरात दाखल होणार आहे. तत्पूर्वी ...

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छता सर्वेक्षण २०२१ उपक्रमात केंद्र शासनाचे पथक पुढील आठवड्यात शहरात दाखल होणार आहे. तत्पूर्वी २५ फेब्रुवारीपासून मनपा प्रशासन ११५ वॉर्डमध्ये सखोल अंतर्गत मूल्यांकन मोहीम राबविणार आहे.

मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहर भारत सरकारच्या गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये देशातील १० स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळविण्यासाठी काम करीत आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची पाहणी, मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पथक सर्वेक्षण करण्यासाठी पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे.

घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे म्हणाले की, तज्ज्ञांच्या भेटीपूर्वी मनपा नागरिकांकडून कचरा वेगळा करणे, घंटागाड्यांद्वारे संकलन यांचा आढावा घेण्यासाठी अंतर्गत सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. केवळ स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मधील सहभागाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणार नाही, तर स्वच्छता मोहिमेसाठी शहराची उत्तम तयारीही या माध्यमातून होईल, असे भोंबे यांनी सांगितले. अंतर्गत सर्वेक्षणात मनपाचे स्वच्छता निरीक्षक, स्मार्ट सिटीअंतर्गत काम करणारे इंटर्नस्‌ आणि सीआरटीचे सदस्य शहरातील ११५ वॉर्डांपैकी प्रत्येक वॉर्डात सर्वेक्षण करतील. स्वच्छ सर्वेक्षण संस्थेच्या निकषानुसार मनपातील स्वच्छता कामगारांची कामगिरी, तेथील रहिवाशांच्या सर्व्हेचे प्रमाण, पडताळणी हे तेथील स्त्रोत व कचरा वेगळा करण्याच्यादृष्टीने करणार आहेत.