शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

केंद्र शासनाचे पथक आले...कोरोना पाहून परतण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:04 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहराची पाहणी करण्यासाठी सोमवारी केंद्रीय पथक शहरात दाखल झाले. मंगळवारी ...

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहराची पाहणी करण्यासाठी सोमवारी केंद्रीय पथक शहरात दाखल झाले. मंगळवारी पथकातील १२ सदस्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. शहरात दररोज एक हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याचे पथकातील सदस्यांना निदर्शनास आले. त्यामुळे पथकातील सदस्य माघारी परतण्याच्या तयारीत आहेत.

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहरात केंद्रीय पथक सोमवारी दाखल झाले. पथकात बारा सदस्य आहेत. सोमवारी सायंकाळी या बारा सदस्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. बैठकीला पालिकेचे स्वच्छता निरीक्षकदेखील उपस्थित होते. स्वच्छता निरीक्षक व केंद्रीय पथकातील सदस्य यांची सांगड या बैठकीत घालून देण्यात आली. ११५ वॉर्ड बारा सदस्यांनी वाटून घेतले. एका सदस्याच्या वाट्याला नऊ ते दहा वॉर्ड आले.

मंगळवारी सकाळपासून स्वच्छ सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय पथकातील सदस्यांनी घेतला. ‘कचरा मुक्त शहर’ ही यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणाची मध्यवर्ती कल्पना आहे. या मध्यवर्ती कल्पनेप्रमाणे त्यांनी सर्वेक्षणाचे काम सुरू केले. कोणत्या सदस्याने कोणत्या वॉर्डात सर्वेक्षणासाठी जायचे हे त्यांच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते, त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा स्वच्छता निरीक्षकांना पथकातील सदस्य कुठे जाणार आहेत याची पूर्वकल्पना नव्हती.

पथकातील सदस्यांनी दुपारपर्यंत सर्वेक्षणाचे काम केले. पथकातील सदस्य विविध वॉर्डांमध्ये गेले. नागरिकांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांना शहरातील कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाची कल्पना आली. शहरात दररोज एक हजार रुग्ण आढळून येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुपारनंतर त्यांनी काम बंद केले व वरिष्ठांशी संपर्क साधून काम थांबविण्याची विनंती केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर पुन्हा येऊन सर्वेक्षण करू, अशी भूमिका सदस्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांना सर्वेक्षणाचे काम थांबविण्याबद्दल कोणतेही आदेश प्राप्त झाले नव्हते.