शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

देश परदेश-कोरोना लस चाचणीतील दुष्प्रभावाला केंद्र, राज्य सरकारे जबाबदार नाहीत

By | Updated: December 3, 2020 04:08 IST

केंद्र, राज्य सरकारे जबाबदार नाहीत -------------------------------------- केंद्रीय आरोग्य सचिवांचे स्पष्टीकरण : कोविशिल्ड चाचणीत कंपनीने प्रक्रियेचे पूर्ण पालन लोकमत न्यूज ...

केंद्र, राज्य सरकारे जबाबदार नाहीत

--------------------------------------

केंद्रीय आरोग्य सचिवांचे स्पष्टीकरण : कोविशिल्ड चाचणीत कंपनीने प्रक्रियेचे पूर्ण पालन

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोविशिल्ड कोरोना लसीच्या चाचणीवरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्र सरकारने स्पष्टपणे म्हटले की, चाचणीत झालेल्या दुष्प्रभावाला केंद्र आणि राज्य सरकारे जबाबदार नाहीत. यासाठी लस निर्मात्या कंपन्या आणि चाचणीत सहभागी असलेल्या संस्था जबाबदार आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले की, योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी

लसीकरणात सहभागी होणाऱ्या अशासकीय संस्था (एनजीओ) आणि प्रसारमाध्यमांचीही आहे. देशात सगळ्यांना लस दिली जाणार नाही. कोरोनाबाधित, बाधा न झालेले आणि बाधा होऊन बरे झालेल्यांना लस दिली जाईल, यावर वैज्ञानिकांमध्ये मंथन होत आहे.

राजेश भूषण म्हणाले की, मी हे स्पष्ट करतो की, सरकारने कधीही संपूर्ण देशात लस देण्यात येईल, असे म्हटलेले नाही.

आयसीएमआरचे महासंचालक प्रो. बलराम भार्गव म्हणाले की, लसीकरण हे लस किती प्रभावी आहे, यावर अवलंबून आहे. आमचा उद्देश कोरोनाचा फैलाव तोडण्याचा आहे. जर आम्ही धोका असलेल्या लोकांना लस देऊन कोरोनाचा फैलाव थांबवू शकलो, तर आम्हाला संपूर्ण देशात लसीकरण करण्याची गरज पडणारही नाही.

ॲस्ट्रोजेनिकाच्या कोविशिल्ड लस चाचणीवर चेन्नईच्या व्हॉलिंटिअरने पाठवलेल्या नोटिसीवर राजेश भूषण म्हणाले की, जेव्हा क्लिनिकल चाचणी सुरू होते तेव्हा लोकांकडून सहमती संबंधित फॉर्म सही करून घेतला जातो. ही प्रक्रिया जगात आहे. जर कोणी चाचणीत सहभागी होण्याचा निर्णय घेत असेल, तर या फॉर्ममध्ये चाचणीच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल सांगितले जाते. लसीच्या चाचण्या अनेक ठिकाणी होतात. प्रत्येक ठिकाणी एक इन्स्टिट्यूशन एथिक्स समिती असते. ही समिती सरकार किंवा उत्पादकांपासून स्वतंत्र असते. कोणत्याही दुष्परिणामाची ही समिती त्याची माहिती घेते आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला पूर्ण अहवाल पाठवते. डॉ. भार्गव म्हणाले, ही नियामकाची जबाबदारी आहे की, डेटा गोळा करून इव्हेंट आणि इंटरवेंशन यांच्यात काही लिंक आहे का?

राजेश भूषण म्हणाले, कोविशिल्ड चाचणीत कंपनीने चाचणी प्रक्रियेचे पूर्ण पालन केले. आता ते प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही. कोरोनावरील लसीची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. लस तयार होण्यासाठी आठ ते दहा वर्षे लागतात. सगळ्यात लवकर बनणारी लसही चार वर्षे घेते; परंतु कोरोना महामारीचे परिणाम पाहता आम्ही ती कमी वेळेत बनवण्याचे प्रयत्न करीत आहोत. आम्ही कोरोना लस १६ ते १८ महिन्यांत बनवत आहोत, असेही भूषण म्हणाले.

---------------