शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

देश परदेश-कोरोना लस चाचणीतील दुष्प्रभावाला केंद्र, राज्य सरकारे जबाबदार नाहीत

By | Updated: December 3, 2020 04:08 IST

केंद्र, राज्य सरकारे जबाबदार नाहीत -------------------------------------- केंद्रीय आरोग्य सचिवांचे स्पष्टीकरण : कोविशिल्ड चाचणीत कंपनीने प्रक्रियेचे पूर्ण पालन लोकमत न्यूज ...

केंद्र, राज्य सरकारे जबाबदार नाहीत

--------------------------------------

केंद्रीय आरोग्य सचिवांचे स्पष्टीकरण : कोविशिल्ड चाचणीत कंपनीने प्रक्रियेचे पूर्ण पालन

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोविशिल्ड कोरोना लसीच्या चाचणीवरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्र सरकारने स्पष्टपणे म्हटले की, चाचणीत झालेल्या दुष्प्रभावाला केंद्र आणि राज्य सरकारे जबाबदार नाहीत. यासाठी लस निर्मात्या कंपन्या आणि चाचणीत सहभागी असलेल्या संस्था जबाबदार आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले की, योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी

लसीकरणात सहभागी होणाऱ्या अशासकीय संस्था (एनजीओ) आणि प्रसारमाध्यमांचीही आहे. देशात सगळ्यांना लस दिली जाणार नाही. कोरोनाबाधित, बाधा न झालेले आणि बाधा होऊन बरे झालेल्यांना लस दिली जाईल, यावर वैज्ञानिकांमध्ये मंथन होत आहे.

राजेश भूषण म्हणाले की, मी हे स्पष्ट करतो की, सरकारने कधीही संपूर्ण देशात लस देण्यात येईल, असे म्हटलेले नाही.

आयसीएमआरचे महासंचालक प्रो. बलराम भार्गव म्हणाले की, लसीकरण हे लस किती प्रभावी आहे, यावर अवलंबून आहे. आमचा उद्देश कोरोनाचा फैलाव तोडण्याचा आहे. जर आम्ही धोका असलेल्या लोकांना लस देऊन कोरोनाचा फैलाव थांबवू शकलो, तर आम्हाला संपूर्ण देशात लसीकरण करण्याची गरज पडणारही नाही.

ॲस्ट्रोजेनिकाच्या कोविशिल्ड लस चाचणीवर चेन्नईच्या व्हॉलिंटिअरने पाठवलेल्या नोटिसीवर राजेश भूषण म्हणाले की, जेव्हा क्लिनिकल चाचणी सुरू होते तेव्हा लोकांकडून सहमती संबंधित फॉर्म सही करून घेतला जातो. ही प्रक्रिया जगात आहे. जर कोणी चाचणीत सहभागी होण्याचा निर्णय घेत असेल, तर या फॉर्ममध्ये चाचणीच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल सांगितले जाते. लसीच्या चाचण्या अनेक ठिकाणी होतात. प्रत्येक ठिकाणी एक इन्स्टिट्यूशन एथिक्स समिती असते. ही समिती सरकार किंवा उत्पादकांपासून स्वतंत्र असते. कोणत्याही दुष्परिणामाची ही समिती त्याची माहिती घेते आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला पूर्ण अहवाल पाठवते. डॉ. भार्गव म्हणाले, ही नियामकाची जबाबदारी आहे की, डेटा गोळा करून इव्हेंट आणि इंटरवेंशन यांच्यात काही लिंक आहे का?

राजेश भूषण म्हणाले, कोविशिल्ड चाचणीत कंपनीने चाचणी प्रक्रियेचे पूर्ण पालन केले. आता ते प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही. कोरोनावरील लसीची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. लस तयार होण्यासाठी आठ ते दहा वर्षे लागतात. सगळ्यात लवकर बनणारी लसही चार वर्षे घेते; परंतु कोरोना महामारीचे परिणाम पाहता आम्ही ती कमी वेळेत बनवण्याचे प्रयत्न करीत आहोत. आम्ही कोरोना लस १६ ते १८ महिन्यांत बनवत आहोत, असेही भूषण म्हणाले.

---------------