शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

रेल्वेमार्गासाठी केंद्राकडे भरीव निधी मागणार

By admin | Updated: February 10, 2015 00:32 IST

बीड : अहमदनगर- बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम दोन दशकांपासून रेंगाळलेले आहे. केंद्रात अन् राज्यात भाजपाचे सरकार आहे. यावेळी भरीव निधीची तरतूद व्हावी,

बीड : अहमदनगर- बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम दोन दशकांपासून रेंगाळलेले आहे. केंद्रात अन् राज्यात भाजपाचे सरकार आहे. यावेळी भरीव निधीची तरतूद व्हावी, यासाठी बुधवारी खा. प्रीतम मुंडे यांच्यासह शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती आ. विनायक मेटे यांनी सोमवारी येथे पत्रकारपरिषदेत दिली.माजी आ. जनार्दन तूपे, साहेबराव दरेकर, रेल्वे कृती समितीचे नामदेवराव क्षीरसागर, राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, गणेश वरेकर, विजयकुमार पालसिंगणकर उपस्थित होते. आ. मेटे म्हणाले, १९९५ मध्ये रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली होती. तेंव्हाचा रेल्वेमार्ग ३५३ कोटींचा होता; पण आता २०१९ कोटी इतक्या रुपयांची आवश्यकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ ३१० कोटी रुपये मिळाले आहेत. केंद्राने यावेळच्या रेल्वेअर्थसंकल्पात बीडच्या रेल्वेमार्गासाठी जास्तीजास्त तरतूद करणे आवश्यक आहे.यासाठी रेल्वमेंत्री सुरेश प्रभू यांना खा. प्रीतम मुंडे, रेल्वेकृती समितीचे पदाधिकारी, रेल्वेआंदोलनात सहभागी कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे.प्रभू यांनी बुधवारी दुपारची वेळ दिली असल्याचेही मेटे म्हणाले. ते महाराष्ट्रातील आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आ. विनायक मेटे यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत बैठक घेऊन रेल्वेकामाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी रेल्वेअधिकारी, भूसंपादन अधिकारी उपस्थित होते. रेल्वेच्या कामासाठी कालावधी निश्चित करुन स्वतंत्र कार्यालय उघडावे अशी मागणी यावेळी मेटे यांनी केली.