शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जूनअखेरपर्यंत केंद्राकडून मदत

By admin | Updated: June 3, 2016 23:44 IST

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी राज्य सरकारने केंद्र शासनाकडे मागणी केलेला २ हजार २५१ कोटींचा निधी जूनअखेरपर्यंत राज्याला मिळणार

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी राज्य सरकारने केंद्र शासनाकडे मागणी केलेला २ हजार २५१ कोटींचा निधी जूनअखेरपर्यंत राज्याला मिळणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांनी दिली. मराठवाड्यासह राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने रबीच्या मदतीसह जनावरांच्या चारा छावण्या आणि पाणीटंचाई निवारण्यासाठी केंद्र शासनाकडे २ हजार २५१ कोटींची मागणी केली. सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती, जनावरांच्या चारा छावण्या, पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावात टँकरने होणारा पाणीपुरवठा, जलयुक्त शिवार अभियानातील कामांची पाहणी केंद्र शासनाच्या पथकाने तीन दिवसांत केली. दुष्काळ निवारणासाठी व रबी हंगामाकरिता केंद्र शासनाकडे २ हजार २५१ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. केंद्रीय पथकाने पाहणी करून अतिरिक्त माहिती घेतली आहे. खरीप हंगामात मराठवाड्यातील ८ हजार ५२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आल्यामुळे केंद्राने मदत दिली आहे. रबी हंगाम एप्रिल आणि मेअखेरला संपत असल्यामुळे केंद्रीय पथक मेअखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात आले आहे. पथकाकडून केंद्राकडे अहवाल सादर केला जाणार असल्यामुळे जूनअखेरपर्यंत राज्याला २ हजार २५१ कोटींचा निधी मिळणार असल्याचे गोविंदराज यांनी सांगितले.