शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

जूनअखेरपर्यंत केंद्राकडून मदत

By admin | Updated: June 3, 2016 23:44 IST

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी राज्य सरकारने केंद्र शासनाकडे मागणी केलेला २ हजार २५१ कोटींचा निधी जूनअखेरपर्यंत राज्याला मिळणार

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी राज्य सरकारने केंद्र शासनाकडे मागणी केलेला २ हजार २५१ कोटींचा निधी जूनअखेरपर्यंत राज्याला मिळणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांनी दिली. मराठवाड्यासह राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने रबीच्या मदतीसह जनावरांच्या चारा छावण्या आणि पाणीटंचाई निवारण्यासाठी केंद्र शासनाकडे २ हजार २५१ कोटींची मागणी केली. सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती, जनावरांच्या चारा छावण्या, पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावात टँकरने होणारा पाणीपुरवठा, जलयुक्त शिवार अभियानातील कामांची पाहणी केंद्र शासनाच्या पथकाने तीन दिवसांत केली. दुष्काळ निवारणासाठी व रबी हंगामाकरिता केंद्र शासनाकडे २ हजार २५१ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. केंद्रीय पथकाने पाहणी करून अतिरिक्त माहिती घेतली आहे. खरीप हंगामात मराठवाड्यातील ८ हजार ५२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आल्यामुळे केंद्राने मदत दिली आहे. रबी हंगाम एप्रिल आणि मेअखेरला संपत असल्यामुळे केंद्रीय पथक मेअखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात आले आहे. पथकाकडून केंद्राकडे अहवाल सादर केला जाणार असल्यामुळे जूनअखेरपर्यंत राज्याला २ हजार २५१ कोटींचा निधी मिळणार असल्याचे गोविंदराज यांनी सांगितले.