शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

औरंगाबादेत रेफर रुग्णांचे मृत्यू शतकपार

By | Updated: December 7, 2020 04:00 IST

औरंगाबाद : मराठवाड्यासह लगतच्या भागांतून गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांना औरंगाबादेत रेफर केले जात आहे. परिणामी, अन्य जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांच्या ...

औरंगाबाद : मराठवाड्यासह लगतच्या भागांतून गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांना औरंगाबादेत रेफर केले जात आहे. परिणामी, अन्य जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांच्या मृत्युसंख्येने शतक पार केले. औरंगाबादेत उपचार सुरू असताना आतापर्यंत जालना, बीड, नांदेडसह विविध जिल्ह्यांतील ११७ रुग्णांचा मृत्यू झाला.

औरंगाबादेत उपचार सुरू असताना गेल्या ८ महिन्यांत आतापर्यंत तब्बल १,२७५ रुग्णांचा मृत्यू झाला; परंतु हे सर्व रुग्ण फक्त औरंगाबाद जिल्ह्यातील नाहीत. इतर जिल्ह्यांतून उपचारासाठी औरंगाबादेत दाखल झालेल्या रुग्णांचाही यात समावेश असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. औरंगाबादेत उपचारासाठी इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. अनेक जिल्ह्यांतून गंभीर अवस्थेत रुग्णांना औरंगाबादेत पाठविले जाते. उपचारासाठी डाॅक्टरांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते; परंतु या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

घाटीत ९०० मृत्यू

घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या संख्येने रविवारी ९०० चा आकडा गाठला. यात इतर जिल्ह्यांतील रुग्णांचाही समावेश आहे. घाटीत जालना, बीड, नांदेड, जळगाव, बुलडाणा यासह अन्य जिल्ह्यांतून कोरोनाचे रुग्ण दाखल होतात. अन्य जिल्ह्यांतील रुग्णांच्या उपचाराची जबाबदारीही घाटीच्या खांद्यावर असल्याचे वास्तव समोर आले आहे.

जिल्ह्याचा मृत्यूदर २.६४ टक्के

औरंगाबाद जिल्ह्यातील १,१५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर हा २.६४ टक्के आहे. गेल्या काही दिवसांत मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.