शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

औरंगाबादेत रेफर रुग्णांचे मृत्यू शतकपार

By | Updated: December 7, 2020 04:00 IST

औरंगाबाद : मराठवाड्यासह लगतच्या भागांतून गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांना औरंगाबादेत रेफर केले जात आहे. परिणामी, अन्य जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांच्या ...

औरंगाबाद : मराठवाड्यासह लगतच्या भागांतून गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांना औरंगाबादेत रेफर केले जात आहे. परिणामी, अन्य जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांच्या मृत्युसंख्येने शतक पार केले. औरंगाबादेत उपचार सुरू असताना आतापर्यंत जालना, बीड, नांदेडसह विविध जिल्ह्यांतील ११७ रुग्णांचा मृत्यू झाला.

औरंगाबादेत उपचार सुरू असताना गेल्या ८ महिन्यांत आतापर्यंत तब्बल १,२७५ रुग्णांचा मृत्यू झाला; परंतु हे सर्व रुग्ण फक्त औरंगाबाद जिल्ह्यातील नाहीत. इतर जिल्ह्यांतून उपचारासाठी औरंगाबादेत दाखल झालेल्या रुग्णांचाही यात समावेश असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. औरंगाबादेत उपचारासाठी इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. अनेक जिल्ह्यांतून गंभीर अवस्थेत रुग्णांना औरंगाबादेत पाठविले जाते. उपचारासाठी डाॅक्टरांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते; परंतु या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

घाटीत ९०० मृत्यू

घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या संख्येने रविवारी ९०० चा आकडा गाठला. यात इतर जिल्ह्यांतील रुग्णांचाही समावेश आहे. घाटीत जालना, बीड, नांदेड, जळगाव, बुलडाणा यासह अन्य जिल्ह्यांतून कोरोनाचे रुग्ण दाखल होतात. अन्य जिल्ह्यांतील रुग्णांच्या उपचाराची जबाबदारीही घाटीच्या खांद्यावर असल्याचे वास्तव समोर आले आहे.

जिल्ह्याचा मृत्यूदर २.६४ टक्के

औरंगाबाद जिल्ह्यातील १,१५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर हा २.६४ टक्के आहे. गेल्या काही दिवसांत मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.