शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्त्यावर आमदार निधी...

By admin | Updated: July 25, 2014 00:29 IST

हणमंत गायकवाड , लातूर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता आॅगस्ट महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

हणमंत गायकवाड , लातूरविधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता आॅगस्ट महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांनी आपल्या विकास निधीतील कामांच्या उद्घाटनाचा सपाटाच लावला आहे. यापूर्वीचा निधी बहुतांश आमदारांनी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या कामावर वापरल्याचे दिसत आहे. गावातील व शहरांतील रस्त्यांवर आमदार निधी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. त्याचबरोबर समाज मंदिर, व्यायामशाळा, स्मशानभूमी, नाल्यांच्या बांधकामावरही हा निधी खर्च झाल्याचा दिसतो आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ४ कोटी ९१ लाख ८ हजार रुपयांचा तर लातूर ग्रामीणमध्ये २ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर खर्च झाला आहे.लातूर शहर विधानसभा, लातूर ग्रामीण, उदगीर, निलंगा या चार विधानसभा मतदारसंघांत सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर चांगला खर्च झाला आहे. सिमेंट व डांबरीकरणाच्या रस्त्याखालोखाल समाज मंदिर, व्यायामशाळा, सभागृह, चावडी बांधकाम, मिनी हायमास्ट बसविणे, स्मशानभूमीची संरक्षण भिंत आदी कामांसाठीही आमदार निधी वापरण्यात आला आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील आमदार तथा राज्यमंत्री अमित देशमुख यांचा सर्वाधिक निधी सिमेंट रस्त्यासाठी खर्च करण्यात आला आहे. २००९-१० मध्ये २१ लाख रुपये सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. तर २०१०-११ मध्ये १ कोटी २४ लाख, २०११-१२ मध्ये १ कोटी ८ हजार, २०१२-१३ मध्ये १ कोटी ३३ लाख आणि २०१३-१४ मध्ये १ कोटी १३ लाख असा एकूण ४ कोटी ९१ लाख रुपये सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांसाठी खर्च करण्यात आले आहेत.लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आमदार वैजनाथ शिंदे यांनीही सिमेंट काँक्रिट रस्ते व डांबरीकरण रस्त्यावर आमदार निधी खर्च केला आहे. २००९-१० मध्ये १३ लाख, २०१०-११ मध्ये १ कोटी १६ लाख, २०११-१२ मध्ये ८८ लाख, २०१२-१३ मध्ये ५६ लाख ७६ हजार आणि २०१३-१४ मध्ये १ कोटी १ लाख ५१ हजार रुपयांचा निधी रस्ते कामावर खर्च केला आहे. उर्वरित निधी सार्वजनिक सभागृह, चावडी बांधकाम, दलित वस्तीतील रस्ते, स्मशानभूमीची दुरुस्ती, महाराष्ट्र राज्य शुटिंग बॉल अजिंक्य स्पर्धा आदी कामांसाठी वापरण्यात आला आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातील माजी मुख्यमंत्री आ. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही बराचसा निधी सिमेंट काँक्रिट व डांबरीकरण रस्त्याच्या कामावर खर्च केला आहे. त्याच प्रमाणात सामाजिक सभागृहाचेही बांधकाम आमदार निधीतून केले आहे. दलित वस्तीस जोडणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. सिमेंट काँक्रिट व डांबरीकरण रस्त्यासाठी निलंगा विधानसभा मतदारसंघात २००९-१० मध्ये १९.७२, २०१०-११ मध्ये ६२.२८, २०११-१२ मध्ये ८६.६४, २०१२-१३ मध्ये ८९.७५, २०१३-१४ मध्ये ६७.०६ लाख रुपयांचा खर्च रस्ते कामासाठी करण्यात आला आहे. औसा विधानसभा मतदारसंघातील आमदार बसवराज पाटील यांनी सिमेंट काँक्रिट व डांबरीकरण रस्त्याच्या कामासाठी २००९-१० मध्ये १८.७९, २०१०-११ मध्ये १६.८२, २०११-१२ मध्ये ६०.४२, २०१२-१३ मध्ये ३९.१३ आणि २०१३-१४ मध्ये २५.८९ लाख रुपये आमदार निधी खर्च केला आहे. त्याचबरोबर टँकरने पाणीपुरवठा, विंधन विहिरी घेणे, विहिरीवर विद्युतपंप बसविणे, सामाजिक सभागृह, विंधन विहीरी खोदणे यावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे.उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधाकर भालेराव यांनीही रस्ते विकासासाठी आमदार निधी खर्च केला आहे. २००९-१० मध्ये २३.२४ लाख, २०१०-११ मध्ये ७७.२७ लाख, २०११-१२ मध्ये ८४ लाख, २०१२-१३ मध्ये १ कोटी ३० लाख ३३ हजार, २०१३-१४ मध्ये १ कोटी ५३ लाख ५६ हजार, सिमेंट काँक्रिट व डांबरीकरणाच्या रस्त्यासाठी त्यांनी निधी खर्च केला आहे. त्याचबरोबर दलित वस्ती सुधारणा, सार्वजनिक चावडी बांधकाम, स्मशानभूमी, सामाजिक सभागृहास संरक्षण भिंत आदी कामांसाठीही निधी खर्च करण्यात आला आहे. प्राधान्याने रस्ते कामासाठी बहुतांश जणांचा निधी खर्च झाला आहे.अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार बाबासाहेब पाटील यांनी रस्ते कामाबरोबरच सामाजिक सभागृह, विंधन विहिरी, इलेक्ट्रीकल मोटार बसविणे, पाण्याची टाकी, विंधन विहिरी खोदणे, चावडी बांधकाम, स्मशानभूमीस संरक्षण भिंत आदी कामांवर खर्च केला आहे. २००९-१० मध्ये २८.४९ लाख, २०१०-११ मध्ये एकूण २ कोटी १२ लाख ४९ हजार, २०११-१२ मध्ये १ कोटी ७९ लाख ७४ हजार, २०१२-१३ मध्ये २ कोटी १२ लाख १९ हजार, २०१३-१४ मध्ये १ कोटी ५९ लाख २६ हजार रुपयांचा आमदार निधी मिळाला. या निधीतून १ कोटी रुपये रस्ते कामासाठी खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित निधी प्रयोगशाळा साहित्य, सभागृह बांधकाम, विंधन विहिरी, स्मशानभूमीच्या कामावर खर्च करण्यात आला आहे.आमदारांनी सुचविलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे काम नियोजन विभागाचे आहे. पूर्वीचा आणि आताचा त्यांचा निधी किती खर्च झाला, ही माहिती कामानुसार संबंधित विभागाकडे असते. निधी नियोजन विभागाकडूनच तिकडे वर्ग होतो. मागील चार वर्षांतील सुचविलेली सर्व कामे पूर्ण झाल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी एस.एस. रेड्डी यांनी सांगितले.