शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

सिमेंट बंधाऱ्याला पंधरा दिवसात तडे !

By admin | Updated: August 19, 2016 00:59 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) शिवारातील नाल्यावर पावसाच्या पाण्याची साठवणूक व्हावी, विहिरींचा पाणीसाठा वाढावा यासाठी मे महिन्यात भूमिगत सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता़

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) शिवारातील नाल्यावर पावसाच्या पाण्याची साठवणूक व्हावी, विहिरींचा पाणीसाठा वाढावा यासाठी मे महिन्यात भूमिगत सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता़ पाटबंधारे विभागाच्या वतीने हा बंधारा बांधल्यानंतर १५ दिवसात पाऊस झाला. मात्र, काम निकृष्ठ झाल्याने पाणीसाठा झाल्यानंतर बंधाऱ्याला १५ दिवसातच तडे गेले आहेत. ठेकेदाराने तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी बंधाऱ्यातील गाळ काढला नसल्याने पाणीसाठा होऊ शकला नाही.वडगाव (काटी) परिसरातील शेतकऱ्यांना नेहमीच अवर्षणाची समस्या भेडसावते़ दुष्काळावर मात करण्यासाठी शिवारात पडणारे पावसाचे पाणी शिवारात अडवून ते जिरविले पाहिजे, अशी मागणी होवू लागली़ यातूनच गावच्या शिवारातील नाल्यावर मे महिन्यात पाटबंधारे विभागाच्या वतीने ठेकेदारामार्फत २० लाख रुपये खर्चाच्या भूमिगत सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेतले. काम सुरू असताना त्याचा दर्जा कुणीही पाहिला नाही. मृगाचा पाऊस पडला अन् पंधरा दिवसातच बंधाऱ्याला तडे गेले. ठेकेदाराने त्यावर मलमपट्टी केली. मात्र, त्याचा उपयोग होताना दिसत नाही़ निकृष्ट कामाचा नमुना समोर आला. मात्र, बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यानंतर पाणीसाठा होणाऱ्या नाल्यातील गाळ काढला नाही. उलट खोदाई कामात निघालेली माती तशीच सिमेंट भिंतीजवळ पसरल्याने गाळाने भरलेल्या बंधाऱ्यात काय पाणीसाठा होणार ? अखेर नाल्यातून पाणी बंधाऱ्याद्वारे वाया गेले आणि पाणी जमिनीत मुरविण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न अधुरे राहिले़ या कामाची चौकशीही पाटबंधारे विभागाकडून केली जात नाही़ बंधाऱ्याचे काम सुरू असताना एकही अधिकारी फिरकला नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत़