शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

सिमेंट बंधाऱ्याला पंधरा दिवसात तडे !

By admin | Updated: August 19, 2016 00:59 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) शिवारातील नाल्यावर पावसाच्या पाण्याची साठवणूक व्हावी, विहिरींचा पाणीसाठा वाढावा यासाठी मे महिन्यात भूमिगत सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता़

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) शिवारातील नाल्यावर पावसाच्या पाण्याची साठवणूक व्हावी, विहिरींचा पाणीसाठा वाढावा यासाठी मे महिन्यात भूमिगत सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता़ पाटबंधारे विभागाच्या वतीने हा बंधारा बांधल्यानंतर १५ दिवसात पाऊस झाला. मात्र, काम निकृष्ठ झाल्याने पाणीसाठा झाल्यानंतर बंधाऱ्याला १५ दिवसातच तडे गेले आहेत. ठेकेदाराने तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी बंधाऱ्यातील गाळ काढला नसल्याने पाणीसाठा होऊ शकला नाही.वडगाव (काटी) परिसरातील शेतकऱ्यांना नेहमीच अवर्षणाची समस्या भेडसावते़ दुष्काळावर मात करण्यासाठी शिवारात पडणारे पावसाचे पाणी शिवारात अडवून ते जिरविले पाहिजे, अशी मागणी होवू लागली़ यातूनच गावच्या शिवारातील नाल्यावर मे महिन्यात पाटबंधारे विभागाच्या वतीने ठेकेदारामार्फत २० लाख रुपये खर्चाच्या भूमिगत सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेतले. काम सुरू असताना त्याचा दर्जा कुणीही पाहिला नाही. मृगाचा पाऊस पडला अन् पंधरा दिवसातच बंधाऱ्याला तडे गेले. ठेकेदाराने त्यावर मलमपट्टी केली. मात्र, त्याचा उपयोग होताना दिसत नाही़ निकृष्ट कामाचा नमुना समोर आला. मात्र, बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यानंतर पाणीसाठा होणाऱ्या नाल्यातील गाळ काढला नाही. उलट खोदाई कामात निघालेली माती तशीच सिमेंट भिंतीजवळ पसरल्याने गाळाने भरलेल्या बंधाऱ्यात काय पाणीसाठा होणार ? अखेर नाल्यातून पाणी बंधाऱ्याद्वारे वाया गेले आणि पाणी जमिनीत मुरविण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न अधुरे राहिले़ या कामाची चौकशीही पाटबंधारे विभागाकडून केली जात नाही़ बंधाऱ्याचे काम सुरू असताना एकही अधिकारी फिरकला नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत़