शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

सिमेंट बंधाऱ्याला पंधरा दिवसात तडे !

By admin | Updated: August 19, 2016 00:59 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) शिवारातील नाल्यावर पावसाच्या पाण्याची साठवणूक व्हावी, विहिरींचा पाणीसाठा वाढावा यासाठी मे महिन्यात भूमिगत सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता़

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) शिवारातील नाल्यावर पावसाच्या पाण्याची साठवणूक व्हावी, विहिरींचा पाणीसाठा वाढावा यासाठी मे महिन्यात भूमिगत सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता़ पाटबंधारे विभागाच्या वतीने हा बंधारा बांधल्यानंतर १५ दिवसात पाऊस झाला. मात्र, काम निकृष्ठ झाल्याने पाणीसाठा झाल्यानंतर बंधाऱ्याला १५ दिवसातच तडे गेले आहेत. ठेकेदाराने तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी बंधाऱ्यातील गाळ काढला नसल्याने पाणीसाठा होऊ शकला नाही.वडगाव (काटी) परिसरातील शेतकऱ्यांना नेहमीच अवर्षणाची समस्या भेडसावते़ दुष्काळावर मात करण्यासाठी शिवारात पडणारे पावसाचे पाणी शिवारात अडवून ते जिरविले पाहिजे, अशी मागणी होवू लागली़ यातूनच गावच्या शिवारातील नाल्यावर मे महिन्यात पाटबंधारे विभागाच्या वतीने ठेकेदारामार्फत २० लाख रुपये खर्चाच्या भूमिगत सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेतले. काम सुरू असताना त्याचा दर्जा कुणीही पाहिला नाही. मृगाचा पाऊस पडला अन् पंधरा दिवसातच बंधाऱ्याला तडे गेले. ठेकेदाराने त्यावर मलमपट्टी केली. मात्र, त्याचा उपयोग होताना दिसत नाही़ निकृष्ट कामाचा नमुना समोर आला. मात्र, बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यानंतर पाणीसाठा होणाऱ्या नाल्यातील गाळ काढला नाही. उलट खोदाई कामात निघालेली माती तशीच सिमेंट भिंतीजवळ पसरल्याने गाळाने भरलेल्या बंधाऱ्यात काय पाणीसाठा होणार ? अखेर नाल्यातून पाणी बंधाऱ्याद्वारे वाया गेले आणि पाणी जमिनीत मुरविण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न अधुरे राहिले़ या कामाची चौकशीही पाटबंधारे विभागाकडून केली जात नाही़ बंधाऱ्याचे काम सुरू असताना एकही अधिकारी फिरकला नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत़