शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

शिराळशेठ यांचा उत्सव उत्साहात

By admin | Updated: August 3, 2014 01:11 IST

संजय जाधव, पैठण साडेतीन घटकेचा बादशहा म्हणून इतिहासात आपल्या दातृत्वाने अजरामर झालेल्या पैठण येथील शिराळशेठ यांचा महोत्सव श्रीयाळ षष्ठीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संजय जाधव, पैठणसाडेतीन घटकेचा बादशहा म्हणून इतिहासात आपल्या दातृत्वाने अजरामर झालेल्या पैठण येथील शिराळशेठ यांचा महोत्सव श्रीयाळ षष्ठीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात पुणे व पैठण येथे हा लोकोत्सव साजरा करण्यात येतो. पैठण येथे या उत्साहास ६८ वर्षांची परंपरा असल्याचे या कार्यक्रमाचे संयोजक जयभवानी क्रीडा मंडळाच्या सदस्यांनीसांगितले.नागपंचमी व त्याला जोडून श्रीयाळ षष्ठी पैठण येथे मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. नागपूजेचा महिमा पैठण परिसरात अनादि काळापासून आहे. शककर्ता शालिवाहन सम्राट हे नागवंशीय होते, तेव्हापासून त्यांच्या राजवाड्याच्या बाजूलाच गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागघाटावर नागपंचमी व पिठुंबरा परिसरात दुसऱ्या दिवशी श्रीयाळ षष्ठी साजरी करण्यात येत आहे. नागघाटावरील नाग देवता पुत्रदायिनी असल्याची धारणा असल्याने मोठ्या संख्येने महिलांनी नागदेवतेचे दर्शन घेऊन गोदावरी नदीत नौकाविहाराचा आनंद लुटला. शिराळशेठ महोत्सवात मोठ्या संख्येने महिला व पुरुषांनी शिराळशेठ यांच्या पुतळ्याचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली. शहरात शिराळशेठ यांचा मातीचा पुतळा उभारण्यात आला होता. रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू होता.कोण होते शिराळशेठ? पैठण येथे इतिहास प्रसिद्ध अनेक गर्भश्रीमंत सावकार होते. त्यातील शिराळशेठ हे एक होते. सन १८३२ मध्ये दक्षिण भारतात तीव्र दुष्काळ पडला होता. अन्न व पाणी यासाठी जीव गमावण्याची वेळ जनतेवर आली होती. व्यवसायाने सावकार; परंतु मनाने उदार असलेल्या शिराळशेठ यांनी स्वत:जवळ असलेल्या धान्यांची कोठारे गोरगरिबांना देण्याचा निर्णय घेऊन तो दक्षिण भारतात स्वखर्चाने वितरित केला व लाखो लोकांचा जीव वाचविला.तत्कालीन राजाने शिराळशेठ यांचे दातृत्व ओळखून त्यांना सत्काराचे निमंत्रण दिले व शिराळशेठ यांनी काहीही मागावे असे त्यांना सूचित केले. यावर धनदौलत न मागता शिराळशेठ यांनी साडेतीन घटकेसाठी मला राजा करा, अशी विनंती राजाकडे केली व ती मान्य करण्यात आली. साडेतीन घटकेचा राजा होताच शिराळशेठ यांनी गोरगरिबांच्या जमिनी त्यांना परत देण्याचा निर्णय घेतला. नाण्याचा शिक्का चामड्यावर मारून त्याचा पैशाच्या रूपात वापर करण्याचा निर्णय घेतला. शिराळशेठ यांच्या उपकाराचे विस्मरण होऊ नये म्हणून व दानशूर लोकांना प्रेरणा मिळावी, त्यांचा मानसन्मान व्हावा या हेतूने गेल्या ६८ वर्षांपासून पैठण-पुणे येथे हा लोकोत्सव साजरा होत आहे.श्रीयाळ षष्ठीनिमित्त हा उत्सव महाराष्ट्रात विविध ठिकाणी साजरा व्हायचा. औरंगाबादच्या गुलमंडी, खोकडपुरा, फकीरवाडी भागांत हा उत्सव साजरा होत होता. कालांतराने तो बंद पडला. पैठणमध्ये शिराळशेठ यांच्या मातीच्या प्रतिमा तयार करून हा उत्सव साजरा व्हायचा, आता फक्त पिठुंबरा गल्लीत हा उत्सव साजरा होतो.