शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

कोरोनाच्या सावटात रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कडक उन्हाळ्यात तीस दिवस उपवास ठेवल्यानंतर मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी अत्यंत साधेपणाने ईद-उल्‌-फित्र साजरी केली. ईदची विशेष नमाज ...

औरंगाबाद : कडक उन्हाळ्यात तीस दिवस उपवास ठेवल्यानंतर मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी अत्यंत साधेपणाने ईद-उल्‌-फित्र साजरी केली. ईदची विशेष नमाज घरातच अदा करण्यात आली. प्रशासनाने कोरोनासंदर्भात ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. शहरातील पाच प्रमुख ईदगाहमध्ये दुसऱ्यावर्षीही ईदची नमाज झाली नाही.

मागीलवर्षी केंद्र शासनाने लावलेल्या कडक लॉकडाऊनमुळे मुस्लिम बांधवांना घराबाहेर पडता येत नव्हते. ३० देवास घरातच नमाज, इबादत करून ईद साजरी केली होती. यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रमजान महिन्याचे आगमन झाले. मागीलवर्षीच्या तुलनेत सकाळी आणि सायंकाळी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रशासनाने मुभा दिली होती. गुरुवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केली. शहरातील मशिदीमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिकांना परवानगी देण्यात आली नाही. ईदच्या नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी कब्रस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांच्या कबरीवर पुष्प अर्पण केले. कोरोना नियमांचे पालन करीत हस्तांदोलन आणि गळाभेट टाळण्यात आली. नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

ईदची खरेदी नाही

रमजान ईदला गरीब आणि श्रीमंत प्रत्येकजण सर्वच नवीन कपडे खरेदी करतात. मागीलवर्षी नागरिकांनी जुन्या कपड्यांवरच ईद साजरी केली. यंदाही ९० टक्के नागरिकांनी जुन्या कपड्यांवरच ईद साजरी केली. केवळ लहान मुलांच्या हट्टापायी, जिथे मिळतील तेथून त्यांना कपडे विकत आणण्यात आले.

कोरोनात मरण पावलेल्या कुटुंबांमध्ये ईद...

कोरोनामुळे ज्या कुटुंबातील सदस्य मरण पावला, त्या कुटुंबावर अगोदरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरातील फारुकी कुटुंबीयांमध्ये चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण फारुकी कुटुंबामध्ये आज ईद साजरी झाली नाही, असे त्यांच्या कुटुंबातील सदस्य खालेद फारुकी यांनी सांगितले. शहरात अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्या घरातील एक तरी कर्ता पुरुष मरण पावला. त्या कुटुंबांमध्ये आज ईद साजरी झाली नाही.

शिरखुर्म्याची फक्त औपचारिकता

रमजान ईदचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरात शिरखुर्मा तयार करण्यात येतो. पण यावेळी कोरोनामुळे नागरिकांनी अत्यंत औपचारिक स्वरूपात शिरखुर्मा तयार करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्केच दूध नागरिकांनी खरेदी केले. रात्री आठनंतर पोलिसांनी दूध विक्रीवर बंदी आणली. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराकडील किमान पाचशे ते सहाशे लिटर दूध खराब झाले.