शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

कोरोनाच्या सावटात रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कडक उन्हाळ्यात तीस दिवस उपवास ठेवल्यानंतर मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी अत्यंत साधेपणाने ईद-उल्‌-फित्र साजरी केली. ईदची विशेष नमाज ...

औरंगाबाद : कडक उन्हाळ्यात तीस दिवस उपवास ठेवल्यानंतर मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी अत्यंत साधेपणाने ईद-उल्‌-फित्र साजरी केली. ईदची विशेष नमाज घरातच अदा करण्यात आली. प्रशासनाने कोरोनासंदर्भात ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. शहरातील पाच प्रमुख ईदगाहमध्ये दुसऱ्यावर्षीही ईदची नमाज झाली नाही.

मागीलवर्षी केंद्र शासनाने लावलेल्या कडक लॉकडाऊनमुळे मुस्लिम बांधवांना घराबाहेर पडता येत नव्हते. ३० देवास घरातच नमाज, इबादत करून ईद साजरी केली होती. यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रमजान महिन्याचे आगमन झाले. मागीलवर्षीच्या तुलनेत सकाळी आणि सायंकाळी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रशासनाने मुभा दिली होती. गुरुवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केली. शहरातील मशिदीमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिकांना परवानगी देण्यात आली नाही. ईदच्या नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी कब्रस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांच्या कबरीवर पुष्प अर्पण केले. कोरोना नियमांचे पालन करीत हस्तांदोलन आणि गळाभेट टाळण्यात आली. नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

ईदची खरेदी नाही

रमजान ईदला गरीब आणि श्रीमंत प्रत्येकजण सर्वच नवीन कपडे खरेदी करतात. मागीलवर्षी नागरिकांनी जुन्या कपड्यांवरच ईद साजरी केली. यंदाही ९० टक्के नागरिकांनी जुन्या कपड्यांवरच ईद साजरी केली. केवळ लहान मुलांच्या हट्टापायी, जिथे मिळतील तेथून त्यांना कपडे विकत आणण्यात आले.

कोरोनात मरण पावलेल्या कुटुंबांमध्ये ईद...

कोरोनामुळे ज्या कुटुंबातील सदस्य मरण पावला, त्या कुटुंबावर अगोदरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरातील फारुकी कुटुंबीयांमध्ये चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण फारुकी कुटुंबामध्ये आज ईद साजरी झाली नाही, असे त्यांच्या कुटुंबातील सदस्य खालेद फारुकी यांनी सांगितले. शहरात अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्या घरातील एक तरी कर्ता पुरुष मरण पावला. त्या कुटुंबांमध्ये आज ईद साजरी झाली नाही.

शिरखुर्म्याची फक्त औपचारिकता

रमजान ईदचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरात शिरखुर्मा तयार करण्यात येतो. पण यावेळी कोरोनामुळे नागरिकांनी अत्यंत औपचारिक स्वरूपात शिरखुर्मा तयार करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्केच दूध नागरिकांनी खरेदी केले. रात्री आठनंतर पोलिसांनी दूध विक्रीवर बंदी आणली. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराकडील किमान पाचशे ते सहाशे लिटर दूध खराब झाले.