शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

सीबीएसईच्या निर्णयाचे तज्ज्ञांकडून स्वागत, पालक-विद्यार्थ्यांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:05 IST

--- औरंगाबाद : सीबीएसईच्या दहावीपाठोपाठ आता बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्याचे शाळा, शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांतून स्वागत ...

---

औरंगाबाद : सीबीएसईच्या दहावीपाठोपाठ आता बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्याचे शाळा, शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांतून स्वागत होत असताना विद्यार्थी, पालकांत ‘थोडी खुशी, थोडा गम’ची स्थिती आहे. याच धर्तीवर राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचाही निर्णय व्हावा. मात्र, केवळ बारावीचे अंतर्गत मूल्यांकन न होता दहावी आणि अकरावीच्या गुणांचाही विचार व्हावा असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी खूप मेहनत केलेल्या विद्यार्थ्यांतून काहीसा नाराजीचा सूर असताना राज्य मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय निर्णय होतो याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

--

मुलांच्या आरोग्याचा विचार करता सीबीएसईच्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे. मुलांचे अंतर्गत मूल्यमापन होईल. ५ सराव परीक्षा, गृहपाठ, प्रकल्प सादरीकरण यावरून गुणदान केले जाणार आहे. मात्र, यात पालक, विद्यार्थ्यांत दुजाभाव होऊ नये अशी अपेक्षा आहे. गुणदान निष्पक्षपणे झाले पाहिजे. राज्य मंडळाच्याही परीक्षा रद्द होऊन दहावी आणि अकरावीच्या गुणांचा आधार, तसेच यावर्षीचे अंतर्गत मूल्यमापन त्यात व्हावे. कारण सीबीएसईच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण पोहोचलेले नाही, तसेच आपत्कालीन परिस्थितीमुळे शून्य शैक्षणिक वर्षाचाही विचार झाला पाहिजे.

-एस. पी. जवळकर, शिक्षणतज्ज्ञ

--

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे. मुलांच्या जिवापेक्षा मोठे काही नाही. शिक्षण नंतरही घेता येईल. सीबीएसई शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार केले होते. अंतर्गत परीक्षा घेतलेल्या आहेत. विद्यार्थी शाळेत येऊनही शिकले. त्यामुळे प्रामाणिक गुणांकन करून सीबीएसईला देता येणे शक्य आहे. खूप जीव तोडून मेहनत केलेल्या, अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनाही मिळालेले शिक्षण परीक्षा झाली नसली तरी ते जीवनात उपयोगी पडेल. ते वाया जाणार नाही याबद्दल समजावणेही तितकेच गरजेचे आहे.

-समृद्धी भुसेकर, प्रशासकीय अधिकारी, पीएसबीए शाळा

---

बारावीसाठी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून तयारी करीत आहे. सुरुवातीला प्रत्यक्ष वर्ग, नंतर ऑनलाइन, त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग, पुन्हा ऑनलाइन शिकले. सर्व तयारी केली, आता परीक्षा होणार नसल्याने वाईट वाटते. दहावीत, अकरावीत मार्क कमी होते; पण यावर्षी जास्त अभ्यास करून चांगले गुण मिळवायचा प्रयत्न होता; पण आता पुढे काय होईल याबद्दल चिंता वाटते.

-प्रज्ञा शिंदे, बारावी- विद्यार्थिनी

---

मुलांची काळजी आहे; पण परीक्षा रद्द व्हायला नको होती. उच्च शिक्षणात या विद्यार्थ्यांना अडचणी येतील याची चिंता वाटते. कोरोनाचे सावट दूर झाल्यावर परीक्षा घेता आल्या असत्या; पण आता पुढच्या सीईटी, नीट या परीक्षा लवकर व्हायला पाहिजे.

-शिवराम खेडकर, पालक

---

६३,२१५

जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी

---

जिल्ह्यातील बोर्डनिहाय बारावीचे विद्यार्थी

---

बोर्ड : शाळा/महाविद्यालय : विद्यार्थी

--

सीबीएसई ः २१ ः ४७१

आयसीएसई ः १ ः ००

इंटरनॅशनल ः १ ः १२

राज्य मंडळ ः ५५१ ः ६२,७३२

----