शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

औरंगाबाद येथील कार्गो टर्मिनल पूर्णत्वाकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:03 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलचे काम पूर्णत्वाकडे आले असून, महिनाभरात सुरक्षेसंदर्भात परवानगी मिळताच ही सेवा सुरूहोईल,असे विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देमहिनाभराची प्रतीक्षा : मंजुरी मिळताच होणार कार्गो सेवेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलचे काम पूर्णत्वाकडे आले असून, महिनाभरात सुरक्षेसंदर्भात परवानगी मिळताच ही सेवा सुरूहोईल,असे विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.विमानतळावरून उद्योग, शेती व्यवसायातील माल आयात-निर्यात करण्यासाठी कार्गो सेवा महत्त्वाची ठरते. चिकलठाणा विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतर करून १ जून २०१६ पासून या ठिकाणाहून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली. या सेवेला प्रतिसाद मिळत असून, दररोज या ठिकाणाहून औद्योगिक मालाची वाहतूक होत आहे. ही सेवा सुरू करताना पुढील तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलमधील संगणकीय यंत्रणेसाठी निधी मंजूर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले; परंतु काही कारणांमुळे त्यास विलंब झाला; परंतु काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलच्या कामाला गती देण्यात आली. देशांतर्गत कार्गो टर्मिनल सुरूझालेल्या जुन्या टर्मिनल इमारतीत आवश्यक ते बदल आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणी काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही किरकोळ कामे शिल्लक असल्याचे समजते. विमानतळावरून सध्या आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा उपलब्ध नसली तरी मुंबईमार्गे दरवर्षी दीड हजार टन माल निर्यात केला जातो. विमानतळावर आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू झाल्यावर दरवर्षी जवळपास तीन हजार टन माल निर्यात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कमी वेळेत मालाची निर्यातया सेवेमुळे शहरातून कमीत कमी वेळेत मालाची निर्यात होण्यास हातभार लागेल आणि मुंबईमार्गे निर्यात करताना होणाºया त्रासातून कायमची सुटका होईल. त्यामुळे या सेवेसाठी उद्योजक, व्यावसायिक उत्सुक असून, ही सेवा लवकरात लवकर सुरूकरण्यासाठी प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरूआहेत. सुरक्षेसंदर्भात मंजुरी मिळताच ही सेवा सुरूहोईल. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे विमानतळाच्या अधिकाºयांनी सांगितले.