शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

औरंगाबाद येथील कार्गो टर्मिनल पूर्णत्वाकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:03 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलचे काम पूर्णत्वाकडे आले असून, महिनाभरात सुरक्षेसंदर्भात परवानगी मिळताच ही सेवा सुरूहोईल,असे विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देमहिनाभराची प्रतीक्षा : मंजुरी मिळताच होणार कार्गो सेवेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलचे काम पूर्णत्वाकडे आले असून, महिनाभरात सुरक्षेसंदर्भात परवानगी मिळताच ही सेवा सुरूहोईल,असे विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.विमानतळावरून उद्योग, शेती व्यवसायातील माल आयात-निर्यात करण्यासाठी कार्गो सेवा महत्त्वाची ठरते. चिकलठाणा विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतर करून १ जून २०१६ पासून या ठिकाणाहून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली. या सेवेला प्रतिसाद मिळत असून, दररोज या ठिकाणाहून औद्योगिक मालाची वाहतूक होत आहे. ही सेवा सुरू करताना पुढील तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलमधील संगणकीय यंत्रणेसाठी निधी मंजूर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले; परंतु काही कारणांमुळे त्यास विलंब झाला; परंतु काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलच्या कामाला गती देण्यात आली. देशांतर्गत कार्गो टर्मिनल सुरूझालेल्या जुन्या टर्मिनल इमारतीत आवश्यक ते बदल आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणी काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही किरकोळ कामे शिल्लक असल्याचे समजते. विमानतळावरून सध्या आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा उपलब्ध नसली तरी मुंबईमार्गे दरवर्षी दीड हजार टन माल निर्यात केला जातो. विमानतळावर आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू झाल्यावर दरवर्षी जवळपास तीन हजार टन माल निर्यात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कमी वेळेत मालाची निर्यातया सेवेमुळे शहरातून कमीत कमी वेळेत मालाची निर्यात होण्यास हातभार लागेल आणि मुंबईमार्गे निर्यात करताना होणाºया त्रासातून कायमची सुटका होईल. त्यामुळे या सेवेसाठी उद्योजक, व्यावसायिक उत्सुक असून, ही सेवा लवकरात लवकर सुरूकरण्यासाठी प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरूआहेत. सुरक्षेसंदर्भात मंजुरी मिळताच ही सेवा सुरूहोईल. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे विमानतळाच्या अधिकाºयांनी सांगितले.