शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

कारभारीनबाई जोरात !

By admin | Updated: April 4, 2015 00:35 IST

संजय तिपाले / व्यंकटेश वैष्णव, बीड नापिकी, दुष्काळामुळे एकीकडे शेतकरी मृत्यूला कवटाळून स्वत:ची कायमची सुटका करुन घेत आहेत.

संजय तिपाले / व्यंकटेश वैष्णव, बीडनापिकी, दुष्काळामुळे एकीकडे शेतकरी मृत्यूला कवटाळून स्वत:ची कायमची सुटका करुन घेत आहेत. महिला शेतकरी मात्र, मोठ्या हिंमतीने संकटाशी दोन हात करत घामाचे मोती पिकवत आहेत. जिल्ह्यात तब्बल ७० टक्के महिलांकडे शेतीव्यवसायाची जबाबदारी आहे. फवारणीपासून ते नांगर हाकण्यापर्यंतची पुरुषांची कामेही काही जणी करतात. नियोजनाच्या जोडीला कठोर श्रमाची तयारी ठेवल्याने कारभाऱ्यांना कारभारनी भारी ठरत आहेत. शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला.‘शेतीव्यवस्थापनात महिलांचे योगदान’ हा विषय घेऊन ‘लोकमत’ने महिला शेतकऱ्यांना प्रश्नावलीच्या माध्यमातून बोलते केले. विविध क्षेत्रांत महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने भरारी घेतली आहे. शेतीव्यवसायातही महिला मागे नाहीत. काही महिलांनी तर आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रीय शेती, शेतीपुरक व्यवसाय सुरु करुन छाप सोडली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी तर आभाळाएवढे दु:ख बाजूला सारुन संसारासोबतच शेतीचा गाढा ओढत असतात. उल्लेखनीय म्हणजे महिलांनी पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देत नाविन्यपूर्ण पिके घेत शेतीला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.तिच्या नशिबी फक्त राबणेच!शेतीमालातून मिळणाऱ्या पैशांचा व्यवहार कोणाकडे असतो? असा प्रश्न महिलांना विचारला तेंव्हा ५० टक्के महिलांनी पतीकडे असे उत्तर दिले. ३० टक्के महिलांनी मुलगा असे उत्तर नोंदविले. केवळ २० टक्के महिला अशा आहेत, ज्या स्वत: राबतात अन् व्यवहारही पाहतात. त्यामुळे बहुतांश महिलांच्या नशिबी केवळ काबाडकष्ट उपसणेच आहे. व्यवहारातील एखाद्या निर्णयात महिलांना सामावून घेतले जात नाही. त्यामुळे उत्पन्न, खर्च, कर्ज...? या साऱ्या बाबींपासून महिला अनभिज्ञ असतात. फक्त मीठ, मिरची अन् दवाखान्यापुरतेच पैसे कारभारनींच्या हातावर टेकवतात.कर्ज नको रे बाबा..! ‘कृषीव्यवसायाचे व्यवस्थापन सांभाळताना काय केले पाहिजे?, उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशांचे नियोजन कसे हवे?’ असा खुला प्रश्न होता. यामध्ये मते नोंदविताना महिलांनी शेतीवर होणारा अवास्तव खर्च रोखण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. उत्पन्नातून मिळणारा पैसा बचत केला पाहिजे, असेही महिलांना वाटते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यवसायात भरभराट करण्यासाठी महिला उत्सूक आहेत. कर्ज नकोच ... असे म्हणत उसणे पैसे उपलब्ध करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.कृषी व्यवसायाचा कारभार पाहताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होते का? या प्रश्नावर ५० टक्के महिलांनी ‘हो’ असे उत्तर दिले. थोड्याप्रमाणात दुर्लक्ष होते, असे ५० टक्के महिलांना वाटते. एकूणच महिलांनी शेती अन् नाती या दोन वेगवेगळ्या बाबी बरोबरीत साधल्या आहेत. शेतीत कष्ट उपसताना संसाराकडे दुर्लक्ष होऊ न देताना महिलांची कसोटी लागते. शेतीसाठी ६० टक्के महिला दिवसाकाठी चार तासांचा वेळ देतात. ३० टक्के महिला दोन तास राबतात तर १० टक्के महिला दिवसभर कष्ट उपसत असतात.