शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

नावालाच पर्यटनाची राजधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:08 IST

जिल्ह्यातील आंतरराष्टÑीय पर्यटन स्थळांमुळे दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक येथे येतात. मात्र, पर्यटन उद्योग म्हणून जिल्ह्यात कुठेच विकास झालेला नाही, हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने ऐतिहासिक औरंगाबाद शहराला काही वर्षांपूर्वी पर्यटनाची राजधानी असा दर्जा दिला. पर्यटनाच्या राजधानीचे दु:ख आजपर्यंत शासन दरबारी पोहोचले नाही. पर्यटकांना मूलभूत सोयी-सुविधा प्राप्त करून देण्यासाठी शासनाकडून एक रुपयाचीही आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील आंतरराष्टÑीय पर्यटन स्थळांमुळे दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक येथे येतात. मात्र, पर्यटन उद्योग म्हणून जिल्ह्यात कुठेच विकास झालेला नाही, हे विशेष.जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ, बीबी का मकबरा, पाणचक्की, दौलताबाद किल्ला या मोजक्याच पर्यटन स्थळांकडे पर्यटक आकर्षित होतात. शहरात आलेले पर्यटक एकच दिवस थांबतात, त्यानंतर ते अन्य शहरांतील पर्यटन स्थळांकडे निघून जातात. जास्तीत जास्त पर्यटक शहरात थांबावेत, पर्यटन रोजगार वाढावा यासाठी शासनाकडून ठोस प्रयत्न आजपर्यंत झालेले नाहीत.ऐतिहासिक औरंगाबादनगरीत पर्यटक दाखल झाल्यानंतर त्यांना ज्या मूलभूत सोयी-सुविधा मिळायला हव्यात त्याच मिळत नाहीत. शासकीय यंत्रणेसोबत राजकीय मंडळींची अनास्था याला कारणीभूत ठरत आहे. दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक शहरात दाखल होतात. यातून पर्यटन विकास महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा महसूलही प्राप्त झाला.