शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

क्षमता चार प्रवाशांची, बसवितात दहा ते बारा

By admin | Updated: August 1, 2014 00:28 IST

परंडा : शहर व परिसरात अवैध प्रवासी वाहूक जोरात सुरु असून उत्पन्न वाढविण्यासाठी चालकांकडून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरु आहे.

परंडा : शहर व परिसरात अवैध प्रवासी वाहूक जोरात सुरु असून उत्पन्न वाढविण्यासाठी चालकांकडून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. अवैध वाहतुकीमुळे एसटीला फटका बसत आहे. अ‍ॅपे रिक्षाची चार प्रवाशांची क्षमता असताना दहा ते बारा प्रवाशी कोंबले जातात. काळीपिवळी जीप आणि खाजगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते. या व्यतिरीक्त टमटमद्वारेही मोठया प्रमाणात अवैधरित्या वाहतूक होत आहे. या वाहनांची संख्या इतर वाहनाच्या बरोबरीने आहे. अ‍ॅपे रिक्षा शहरापासून १३ कि. मी वरील वारदवाडी पर्यत प्रवाशी वाहतूक करतात. त्यात सोनगिरी, खासगाव, ढगपिंपरी फाटा, बाम्हणगाव, चांदणी या गावांचा समावेश प्रामुख्याने होते. प्रत्येक वाहनांना प्रवासी वाहतूक क्षमता ठरवून देण्यात आली आहे. मात्र, संबंधितांकडून हा नियम कधीही पाळला जात नाही. अ‍ॅपे रिक्षाची प्रवासी क्षमता चार इतकी असते. परंतु, या वाहनातून सर्रास १२ ते १३ प्रवासी घेऊन जातात. जीपच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. सात प्रवासी बसविण्याची परवानगी असताना प्रत्येक्ष चौदा ते सोळा प्रवासी बसवून वाहने सुसाट दामटली जातात. हे चित्र विशेषत: बार्शी, सोनारी, आनाळा, खासापुरी, राजुरी, जवळा या आवांना जोडणाऱ्या मार्गावर पहावयास मिळते. गाडीमध्ये जागा नसल्यास अशा वेळी समोरील बाजूस चालकासह चार, चालकाच्या पाठीमागील आसनावर सहा, सर्वात शेवटी आठ, टपावर सहा असे २४ प्रवासीही बसविले जातात. अशावेळी प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते. अवैध प्रवासी वाहतूक खुलेआम सुरू असतानाही संबंधित यंत्रणा मात्र, याकडे दुर्लक्ष करीत आहे. पोलिसांचे या वाहनधारकांशी लागेबांधे असल्याचेही बोलले जाते. (वार्ताहर) एसटीला फटका परंडा आगाराच्या बसद्वारे परंडा-बार्शी या मार्गावर सध्या सोळा फेऱ्या केल्या जातात. परंतु, याही बसफेऱ्यांना अवैैध वाहतुकीचा फटका बसत आहे. सर्वाधिक फटका हा सोनारी, आनाळा अंभी, प्राथ्रुड, साकत, पांचपिपंळा, कुभेफळ,जवळा मार्गावरील खासापुरी, राजुरी, करमाळा राज्यमार्गावरील डोमगांव, आवाटी मार्गे करमाळ्याकडे जाणाऱ्या बसेसला बसत आहे. उत्पन्नावर जवळपास ६० टक्के फरक पडत असल्याचे सांगण्यात आले. कुर्डवार्डीकडे जाणाऱ्या मार्गावर सर्वाधिक अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याने परंडा आगाराची एकही बस सुरू नाही. या सर्व बाबींमुळे हे आगार तोट्यात सुरू असल्याने भूम आगाराला जोडण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.