शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

कावळ्यांनी केले रक्तबंबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 00:39 IST

औरंगाबाद : प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या निष्काळजीणामुळे सांबरांची अवस्था मगरी आणि बगळ्यांपेक्षाही अतिशय वाईट झाली आहे.

औरंगाबाद : प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या निष्काळजीणामुळे सांबरांची अवस्था मगरी आणि बगळ्यांपेक्षाही अतिशय वाईट झाली आहे. कावळ्यांच्या सततच्या टोचण्यांमुळे येथील जवळपास सर्वच सांबर अक्षरश: रक्तबंबाळ झाली आहेत. गेल्या किती तरी महिन्यांपासून रोज शेकडो कावळे टोचण्या मारून सांबरांना जखमी करीत असताना प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी मात्र, त्याकडे पुरते दुर्लक्ष करीत आहेत. मनपाच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात बिबट्यांच्या तीन बछड्यांचा नुकताच मृत्यू झाला. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी गरोदर रेणूची योग्य काळजी न घेतल्यामुळेच तिची मुदतपूर्व प्रसूती झाली. परिणामी अशक्त जन्मलेली तिन्ही पिल्ले जन्मानंतर ३६ तासांतच दगावली. सध्या वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाकडून त्याची चौकशी सुरू आहे. परंतु केवळ बिबट्यांनाच नव्हे तर इतर प्राण्यांनाही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मगरी आणि बगळ्यांचे हौद रिकामे झाले आहेत. त्यात तळाला अगदीच थोडे पाणी असल्यामुळे या प्राण्यांची गैरसोय होत आहे. तर दुसरीकडे सांबरांची अवस्था त्याहीपेक्षा वाईट आहे. याठिकाणी खूप मोठ्या जागेत जवळपास पन्नासहून अधिक सांबरांना ठेवण्यात आलेले आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून यातील बहुसंख्य सांबर हे कावळ्यांच्या टोचण्यांमुळे जखमी झाले आहेत. शेकडो कावळे दिवसभर अंगावर बसून टोचण्या मारत असल्यामुळे अनेक सांबर रक्तबंबाळ झाले आहेत. परंतु एवढे सर्व होऊनही प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कावळ्यांचा त्रास रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.