शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

कावळ्यांनी केले रक्तबंबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 00:39 IST

औरंगाबाद : प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या निष्काळजीणामुळे सांबरांची अवस्था मगरी आणि बगळ्यांपेक्षाही अतिशय वाईट झाली आहे.

औरंगाबाद : प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या निष्काळजीणामुळे सांबरांची अवस्था मगरी आणि बगळ्यांपेक्षाही अतिशय वाईट झाली आहे. कावळ्यांच्या सततच्या टोचण्यांमुळे येथील जवळपास सर्वच सांबर अक्षरश: रक्तबंबाळ झाली आहेत. गेल्या किती तरी महिन्यांपासून रोज शेकडो कावळे टोचण्या मारून सांबरांना जखमी करीत असताना प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी मात्र, त्याकडे पुरते दुर्लक्ष करीत आहेत. मनपाच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात बिबट्यांच्या तीन बछड्यांचा नुकताच मृत्यू झाला. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी गरोदर रेणूची योग्य काळजी न घेतल्यामुळेच तिची मुदतपूर्व प्रसूती झाली. परिणामी अशक्त जन्मलेली तिन्ही पिल्ले जन्मानंतर ३६ तासांतच दगावली. सध्या वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाकडून त्याची चौकशी सुरू आहे. परंतु केवळ बिबट्यांनाच नव्हे तर इतर प्राण्यांनाही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मगरी आणि बगळ्यांचे हौद रिकामे झाले आहेत. त्यात तळाला अगदीच थोडे पाणी असल्यामुळे या प्राण्यांची गैरसोय होत आहे. तर दुसरीकडे सांबरांची अवस्था त्याहीपेक्षा वाईट आहे. याठिकाणी खूप मोठ्या जागेत जवळपास पन्नासहून अधिक सांबरांना ठेवण्यात आलेले आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून यातील बहुसंख्य सांबर हे कावळ्यांच्या टोचण्यांमुळे जखमी झाले आहेत. शेकडो कावळे दिवसभर अंगावर बसून टोचण्या मारत असल्यामुळे अनेक सांबर रक्तबंबाळ झाले आहेत. परंतु एवढे सर्व होऊनही प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कावळ्यांचा त्रास रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.