शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

कावळ्यांनी केले रक्तबंबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 00:39 IST

औरंगाबाद : प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या निष्काळजीणामुळे सांबरांची अवस्था मगरी आणि बगळ्यांपेक्षाही अतिशय वाईट झाली आहे.

औरंगाबाद : प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या निष्काळजीणामुळे सांबरांची अवस्था मगरी आणि बगळ्यांपेक्षाही अतिशय वाईट झाली आहे. कावळ्यांच्या सततच्या टोचण्यांमुळे येथील जवळपास सर्वच सांबर अक्षरश: रक्तबंबाळ झाली आहेत. गेल्या किती तरी महिन्यांपासून रोज शेकडो कावळे टोचण्या मारून सांबरांना जखमी करीत असताना प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी मात्र, त्याकडे पुरते दुर्लक्ष करीत आहेत. मनपाच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात बिबट्यांच्या तीन बछड्यांचा नुकताच मृत्यू झाला. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी गरोदर रेणूची योग्य काळजी न घेतल्यामुळेच तिची मुदतपूर्व प्रसूती झाली. परिणामी अशक्त जन्मलेली तिन्ही पिल्ले जन्मानंतर ३६ तासांतच दगावली. सध्या वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाकडून त्याची चौकशी सुरू आहे. परंतु केवळ बिबट्यांनाच नव्हे तर इतर प्राण्यांनाही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मगरी आणि बगळ्यांचे हौद रिकामे झाले आहेत. त्यात तळाला अगदीच थोडे पाणी असल्यामुळे या प्राण्यांची गैरसोय होत आहे. तर दुसरीकडे सांबरांची अवस्था त्याहीपेक्षा वाईट आहे. याठिकाणी खूप मोठ्या जागेत जवळपास पन्नासहून अधिक सांबरांना ठेवण्यात आलेले आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून यातील बहुसंख्य सांबर हे कावळ्यांच्या टोचण्यांमुळे जखमी झाले आहेत. शेकडो कावळे दिवसभर अंगावर बसून टोचण्या मारत असल्यामुळे अनेक सांबर रक्तबंबाळ झाले आहेत. परंतु एवढे सर्व होऊनही प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कावळ्यांचा त्रास रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.