शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

‘कॅन्सर’ रूग्ण वाऱ्यावर !

By admin | Updated: February 4, 2015 00:40 IST

उस्मानाबाद : तंबाखूमुळे होणारा कर्करोग असो अथवा महिलांच्या विविधांगांना होणारा कर्करोग असो या कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणारी सुविधा जिल्हा रूग्णालयात

उस्मानाबाद : तंबाखूमुळे होणारा कर्करोग असो अथवा महिलांच्या विविधांगांना होणारा कर्करोग असो या कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणारी सुविधा जिल्हा रूग्णालयात उपलब्ध नाही़ केवळ शिबिरे घेवून ‘दक्षता’ घ्या, असे सांगण्यावरच समाधान मानण्यात येत आहे़देशात तंबाखू, सिगारेटमुळे होणाऱ्या कर्करोगाने ८ ते ९ लाख नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे सांगण्यात येते़ तर दररोज २२०० जणांचा मृत्यू होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्या येते़ तंबाखूमधील निकोटीन, टर, कार्बन मोनॉक्साईड या विषकारक रसायनामुळे तोंड, घसा, फुफूस, स्वरयंत्र, अन्ननलिका, नपुसंकता, महिलांमध्ये वंध्यत्व आदी प्रकार घडतात़ तसेच पुरूषांना तोंडाची पोकळी, फुफूस, अन्ननलिका, पोटातील कॅन्सर होवू शकतो़ तर महिलांना गर्भाशय, स्तन व तोंडाची पोकळीतील कॅन्सर तंबाखू सेवनाने जडतो़ कर्करोग हा १०० हून अधिक रोगांचा एक गट असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येते़ या कर्करोगाचे वेळीच निदान झाले तर तो औषधोपचाराने, शस्त्रक्रियांनी बराही होतो़ वेळेत निदन करण्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर प्रसंगी संबंधित रूग्णाचा मृत्यू होतो़ जीवघेण्या कर्करोगाविषयी प्रशासनाकडून प्रतीवर्षी कर्करोग दिनानिमित्त शिबीर घेवून मार्गदर्शन करण्यात येते़ एखाद्याला तपासणी करायची म्हटले की, खासगी रूग्णालय गाठावे लागत आहे़ तेथेही आवश्यक ते उपचार मिळत नसल्याने सोलापूर, लातूर किंवा बार्शी येथील रूग्णालयात रूग्णांना जावे लागत आहे़ जिल्हा रूग्णालयात एखाद्याला कर्करोग झाल्याचेही निदान होवू शकत नाही़ कर्करोग तपासणीसाठी लागणारी यंत्रणाही जिल्हा रूग्णालयात नाही़ त्यामुळे रूग्णांना खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जावून त्यांच्या सल्ल्यानुसार परजिल्ह्याकडे धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी) जिल्हा रूग्णालयासह जिल्ह्यातील इतर रूग्णालयातही कर्करोगाचे निदान करणे, शस्त्रक्रिया करणे आदी प्रक्रिया होत नाहीत़ त्यामुळे रूग्णांना कर्करोगाचे निदान करण्यासाठी इतर जिल्ह्याकडे धाव घ्यावी लागत आहे़ परिणामी आर्थिक, मानसिक त्रास या रूग्णांसह नातेवाईकांना सहन करावा लागत आहे़शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (‘एनसीडीसी’) मधूमेह, उच्चरक्तदाबाच्या रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे़ या कार्यक्रमांतर्गतच भविष्यात कर्करोगाची तपासणीही करण्यात येणार आहे़ त्यामुळे कर्करोगाचे निदान वेळेत होणाऱ्या संबंधित नागरिकांना याचा लाभ होणार आहे़जिल्हा रूग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ वसंत बाबरे म्हणाले, जिल्हा रूग्णालयात कर्करोगाची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येते़ प्राथमिक स्तरावरील कर्करोग असलेल्या रूग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात येते़ प्राथमिक स्तराच्या पुढील कर्करोग असेल तर मात्र, सोलापूरकडे रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येते़ मात्र, जिल्हा रूग्णालयाने किती शस्त्रक्रिया केल्या, याची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही, असेही ते म्हणाले़