शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

‘कॅन्सर’ रूग्ण वाऱ्यावर !

By admin | Updated: February 4, 2015 00:40 IST

उस्मानाबाद : तंबाखूमुळे होणारा कर्करोग असो अथवा महिलांच्या विविधांगांना होणारा कर्करोग असो या कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणारी सुविधा जिल्हा रूग्णालयात

उस्मानाबाद : तंबाखूमुळे होणारा कर्करोग असो अथवा महिलांच्या विविधांगांना होणारा कर्करोग असो या कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणारी सुविधा जिल्हा रूग्णालयात उपलब्ध नाही़ केवळ शिबिरे घेवून ‘दक्षता’ घ्या, असे सांगण्यावरच समाधान मानण्यात येत आहे़देशात तंबाखू, सिगारेटमुळे होणाऱ्या कर्करोगाने ८ ते ९ लाख नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे सांगण्यात येते़ तर दररोज २२०० जणांचा मृत्यू होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्या येते़ तंबाखूमधील निकोटीन, टर, कार्बन मोनॉक्साईड या विषकारक रसायनामुळे तोंड, घसा, फुफूस, स्वरयंत्र, अन्ननलिका, नपुसंकता, महिलांमध्ये वंध्यत्व आदी प्रकार घडतात़ तसेच पुरूषांना तोंडाची पोकळी, फुफूस, अन्ननलिका, पोटातील कॅन्सर होवू शकतो़ तर महिलांना गर्भाशय, स्तन व तोंडाची पोकळीतील कॅन्सर तंबाखू सेवनाने जडतो़ कर्करोग हा १०० हून अधिक रोगांचा एक गट असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येते़ या कर्करोगाचे वेळीच निदान झाले तर तो औषधोपचाराने, शस्त्रक्रियांनी बराही होतो़ वेळेत निदन करण्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर प्रसंगी संबंधित रूग्णाचा मृत्यू होतो़ जीवघेण्या कर्करोगाविषयी प्रशासनाकडून प्रतीवर्षी कर्करोग दिनानिमित्त शिबीर घेवून मार्गदर्शन करण्यात येते़ एखाद्याला तपासणी करायची म्हटले की, खासगी रूग्णालय गाठावे लागत आहे़ तेथेही आवश्यक ते उपचार मिळत नसल्याने सोलापूर, लातूर किंवा बार्शी येथील रूग्णालयात रूग्णांना जावे लागत आहे़ जिल्हा रूग्णालयात एखाद्याला कर्करोग झाल्याचेही निदान होवू शकत नाही़ कर्करोग तपासणीसाठी लागणारी यंत्रणाही जिल्हा रूग्णालयात नाही़ त्यामुळे रूग्णांना खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जावून त्यांच्या सल्ल्यानुसार परजिल्ह्याकडे धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी) जिल्हा रूग्णालयासह जिल्ह्यातील इतर रूग्णालयातही कर्करोगाचे निदान करणे, शस्त्रक्रिया करणे आदी प्रक्रिया होत नाहीत़ त्यामुळे रूग्णांना कर्करोगाचे निदान करण्यासाठी इतर जिल्ह्याकडे धाव घ्यावी लागत आहे़ परिणामी आर्थिक, मानसिक त्रास या रूग्णांसह नातेवाईकांना सहन करावा लागत आहे़शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (‘एनसीडीसी’) मधूमेह, उच्चरक्तदाबाच्या रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे़ या कार्यक्रमांतर्गतच भविष्यात कर्करोगाची तपासणीही करण्यात येणार आहे़ त्यामुळे कर्करोगाचे निदान वेळेत होणाऱ्या संबंधित नागरिकांना याचा लाभ होणार आहे़जिल्हा रूग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ वसंत बाबरे म्हणाले, जिल्हा रूग्णालयात कर्करोगाची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येते़ प्राथमिक स्तरावरील कर्करोग असलेल्या रूग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात येते़ प्राथमिक स्तराच्या पुढील कर्करोग असेल तर मात्र, सोलापूरकडे रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येते़ मात्र, जिल्हा रूग्णालयाने किती शस्त्रक्रिया केल्या, याची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही, असेही ते म्हणाले़