शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

‘कॅन्सर’ रूग्ण वाऱ्यावर !

By admin | Updated: February 4, 2015 00:40 IST

उस्मानाबाद : तंबाखूमुळे होणारा कर्करोग असो अथवा महिलांच्या विविधांगांना होणारा कर्करोग असो या कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणारी सुविधा जिल्हा रूग्णालयात

उस्मानाबाद : तंबाखूमुळे होणारा कर्करोग असो अथवा महिलांच्या विविधांगांना होणारा कर्करोग असो या कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणारी सुविधा जिल्हा रूग्णालयात उपलब्ध नाही़ केवळ शिबिरे घेवून ‘दक्षता’ घ्या, असे सांगण्यावरच समाधान मानण्यात येत आहे़देशात तंबाखू, सिगारेटमुळे होणाऱ्या कर्करोगाने ८ ते ९ लाख नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे सांगण्यात येते़ तर दररोज २२०० जणांचा मृत्यू होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्या येते़ तंबाखूमधील निकोटीन, टर, कार्बन मोनॉक्साईड या विषकारक रसायनामुळे तोंड, घसा, फुफूस, स्वरयंत्र, अन्ननलिका, नपुसंकता, महिलांमध्ये वंध्यत्व आदी प्रकार घडतात़ तसेच पुरूषांना तोंडाची पोकळी, फुफूस, अन्ननलिका, पोटातील कॅन्सर होवू शकतो़ तर महिलांना गर्भाशय, स्तन व तोंडाची पोकळीतील कॅन्सर तंबाखू सेवनाने जडतो़ कर्करोग हा १०० हून अधिक रोगांचा एक गट असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येते़ या कर्करोगाचे वेळीच निदान झाले तर तो औषधोपचाराने, शस्त्रक्रियांनी बराही होतो़ वेळेत निदन करण्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर प्रसंगी संबंधित रूग्णाचा मृत्यू होतो़ जीवघेण्या कर्करोगाविषयी प्रशासनाकडून प्रतीवर्षी कर्करोग दिनानिमित्त शिबीर घेवून मार्गदर्शन करण्यात येते़ एखाद्याला तपासणी करायची म्हटले की, खासगी रूग्णालय गाठावे लागत आहे़ तेथेही आवश्यक ते उपचार मिळत नसल्याने सोलापूर, लातूर किंवा बार्शी येथील रूग्णालयात रूग्णांना जावे लागत आहे़ जिल्हा रूग्णालयात एखाद्याला कर्करोग झाल्याचेही निदान होवू शकत नाही़ कर्करोग तपासणीसाठी लागणारी यंत्रणाही जिल्हा रूग्णालयात नाही़ त्यामुळे रूग्णांना खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जावून त्यांच्या सल्ल्यानुसार परजिल्ह्याकडे धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी) जिल्हा रूग्णालयासह जिल्ह्यातील इतर रूग्णालयातही कर्करोगाचे निदान करणे, शस्त्रक्रिया करणे आदी प्रक्रिया होत नाहीत़ त्यामुळे रूग्णांना कर्करोगाचे निदान करण्यासाठी इतर जिल्ह्याकडे धाव घ्यावी लागत आहे़ परिणामी आर्थिक, मानसिक त्रास या रूग्णांसह नातेवाईकांना सहन करावा लागत आहे़शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (‘एनसीडीसी’) मधूमेह, उच्चरक्तदाबाच्या रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे़ या कार्यक्रमांतर्गतच भविष्यात कर्करोगाची तपासणीही करण्यात येणार आहे़ त्यामुळे कर्करोगाचे निदान वेळेत होणाऱ्या संबंधित नागरिकांना याचा लाभ होणार आहे़जिल्हा रूग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ वसंत बाबरे म्हणाले, जिल्हा रूग्णालयात कर्करोगाची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येते़ प्राथमिक स्तरावरील कर्करोग असलेल्या रूग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात येते़ प्राथमिक स्तराच्या पुढील कर्करोग असेल तर मात्र, सोलापूरकडे रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येते़ मात्र, जिल्हा रूग्णालयाने किती शस्त्रक्रिया केल्या, याची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही, असेही ते म्हणाले़