शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या माफ झालेल्या परीक्षा शुल्काचा हिशोब जुळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:11 IST

राज्य शासनाने २०१५-१६ यावर्षी मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ४ कोटी ५४ लाख रुपयांची रक्कम शासनाने महाविद्यालयांकडे वर्ग केली आहे. मात्र ही रक्कम संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परत केली नसल्याची तक्रार मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरू, उच्चशिक्षण सहसंचालक यांच्याकडे केली.

ठळक मुद्देविद्यापीठ : उच्चशिक्षण सहसंचालकांचे विद्यापीठ व महाविद्यालयाला पत्र

औरंगाबाद : राज्य शासनाने २०१५-१६ यावर्षी मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ४ कोटी ५४ लाख रुपयांची रक्कम शासनाने महाविद्यालयांकडे वर्ग केली आहे. मात्र ही रक्कम संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परत केली नसल्याची तक्रार मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरू, उच्चशिक्षण सहसंचालक यांच्याकडे केली. याबाबतची माहिती विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सविस्तर माहिती काढण्याचा मुद्दा बुधवारी चर्चेला घेण्यात आला.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बुधवारी झाली. यात ऐनवेळी परीक्षा शुल्क माफीचा मुद्दा ज्येष्ठ सदस्य संजय निंबाळकर यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीचे पैसे महाविद्यालयांना पाठविले असतील तर त्यांनी ते विद्यार्थ्यांमध्ये वाटप केले का नाही? याची माहिती घेण्यात यावी, तसेच ही माहिती आगामी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सविस्तरपणे मांडावी, अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या. याविषयी अधिक माहिती घेतली असता, विद्यापीठ प्रशासनाकडेही परीक्षा शुल्क माफीच्या संदर्भात ठोस आकडेवारी नसल्याचे स्पष्ट झाले. कोणत्या महाविद्यालयांना परीक्षा शुल्काचे किती पैसे पाठविले, याचीही माहिती उपलब्ध नाही. याविषयी मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरू, सहसंचालकांना निवेदन देण्यात आले आहे. यात ४ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी महाविद्यालयांना वितरित करण्यात आल्याचा दावाही केला आहे. मात्र, याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. यावर्षी दुष्काळामुळे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तरीही नुकत्याच झालेल्या परीक्षांमध्ये परीक्षा शुल्काची वसुली करण्यात आलेली आहे. या परीक्षा शुल्काचे पैसेही महाविद्यालयांना मिळणार आहेत. यामुळे यावर्षीही पुन्हा मागील पैशांप्रमाणेच घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.परीक्षा शुल्काचे पैसे महाविद्यालयांना पाठविण्यात आले असून, त्याचे वितरण करण्यात आले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यानंतर तात्काळ महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ज्या महाविद्यालयांना परीक्षा शुल्काचे पैसे मिळाले आहेत, मात्र त्यांनी संबंधित लाभार्थ्यांना वाटप केले नसतील, तर उचित कार्यवाही करण्यात येईल.- डॉ. सतीश देशपांडे, सहसंचालक, उच्चशिक्षण विभाग

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र