शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भारतीय राजस्वला समृद्ध परंपरेचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:59 IST

भारतीय राजस्वला (अर्थनीती) समृद्ध परंपरेचा इतिहास लाभलेला आहे. चाणक्य यांच्या माध्यमातून भारतानेच राजस्वची विचारधारा दिली, असे प्रतिपादन आयकर विभागाचे प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारतीय राजस्वला (अर्थनीती) समृद्ध परंपरेचा इतिहास लाभलेला आहे. चाणक्य यांच्या माध्यमातून भारतानेच राजस्वची विचारधारा दिली, असे प्रतिपादन आयकर विभागाचे प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले.सीए उमेश शर्मा यांनी ‘लोकमत’मध्ये लिहिलेल्या ‘करनीती’ स्तंभातील २०० भागांचा समावेश असलेल्या ‘इन्कमटॅक्स आपल्यासाठी’ आणि ‘जीएसटी आपल्यासाठी’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन शिवदयाल श्रीवास्तव आणि स्टेट जीएसटीच्या सह आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते तापडिया नाट्यगृहात झाले. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा अध्यक्षस्थानी होते. आ. प्रशांत बंब, प्रकाशक बाबा भांड, सीए आर. बी. शर्मा, औरंगाबाद सीए शाखेचे अध्यक्ष अल्केश रावका, लेखक उमेश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्रीवास्तव म्हणाले, पुढील पिढ्यांनी आपली ओळख काढायची असेल, तर पुस्तके लिहिली पाहिजेत; मात्र त्या पुस्तकात मांडलेल्या मतांची दैनंदिन जीवनात अंमलबजावणी झाली पाहिजे. उमेश शर्मा यांनी पुस्तकात लिहिलेले आम्ही, ते जेव्हा करदात्यांना आमच्याकडे घेऊन येतील, तेव्हा पडताळून पाहूत, तेव्हा त्यांनी लिहिलेले आणि प्रत्यक्षात त्यांचे वागणे यातून सर्व काही बाहेर येईल, असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. दोनपैकी इन्कमटॅक्स पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा कलर निळा, तर जीएसटीचा लाल ठेवला. यावरूनही त्यांनी चिमटे काढले. त्याला सर्व रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अध्यक्षीय समारोपात राजेंद्र दर्डा म्हणाले, उमेश शर्मा यांनी अगदी सोप्या भाषेत किचकट अर्थनीती उलगडली आहे. ‘लोकमत’ व ‘लोकमत टाइम्स’मध्ये तब्बल चार वर्षांपासून सुरू असलेल्या ‘करनीती’ या स्तंभात २०० लेख प्रकाशित झाले. यातून आर्थिक साक्षरता मोठ्या प्रमाणात झाली. अनेक वेळा लेख वाचताना कृष्ण, अर्जुनाचे संदर्भ होते. यातून समजले की, करदाता हा अर्जुनाच्या भूमिकेत असतो. सर्वसामान्य करदात्याला अनेक प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मार्गदर्शन करणारा श्रीकृष्णही हवा असतो. अशा ऐतिहासिक संदर्भांचा हवाला देऊन सहज, सोप्या शब्दांत उमेश शर्मा यांनी ‘करनीती’ लिहिली असल्याचा गौरवही त्यांनी केला. या वर्षात सरकारने अर्थविषयक तीन मोठे निर्णय घेतले आहेत. त्यात नोटाबंदी, रेरा कायदा आणि जीएसटीचा समावेश आहे. यामुळे अनेकांची अडचण झाली असेल; परंतु यातील जीएसटी हा दीर्घकाळासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे शर्मा यांचे दुसरे पुस्तक ‘जीएसटी आपल्यासाठी’ हे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही दर्डा यांनी स्पष्ट केले. सीए अल्केश रावका यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात प्रकाशक बाबा भांड यांनी ज्ञानाला वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य लेखक आणि प्रकाशक करीत असल्याचे सांगितले. पाहुण्यांचा परिचय प्रतिभा भांड यांनी करून दिला. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार सीए आर. बी. शर्मा यांनी मानले. खचाखच भरलेल्या नाट्यगृहात साहित्य, संस्कृती, राजकीय, सीए, व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यवसायासह अनेक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.साक्षरता वाढविण्याची गरजदेशात साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के, तर राज्यात ८३ टक्के आहे; मात्र आर्थिक साक्षरतेचे प्रमाण केवळ २३ टक्केच आहे. देशाच्या विकासासाठी आर्थिक साक्षरतेचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली.करदात्यांचा पैसा जबाबदारीने वापरावाआ. बंब यांनी करदात्यांच्या पैशाविषयी भाष्य केले. याचा संदर्भ घेत कररूपाने जमा होणारा पैसा राजकारण्यांनी जबाबदारीने वापराला पाहिजे. तो वापरतात का? हा संशोधनाचा विषय असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.