शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय राजस्वला समृद्ध परंपरेचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:59 IST

भारतीय राजस्वला (अर्थनीती) समृद्ध परंपरेचा इतिहास लाभलेला आहे. चाणक्य यांच्या माध्यमातून भारतानेच राजस्वची विचारधारा दिली, असे प्रतिपादन आयकर विभागाचे प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारतीय राजस्वला (अर्थनीती) समृद्ध परंपरेचा इतिहास लाभलेला आहे. चाणक्य यांच्या माध्यमातून भारतानेच राजस्वची विचारधारा दिली, असे प्रतिपादन आयकर विभागाचे प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले.सीए उमेश शर्मा यांनी ‘लोकमत’मध्ये लिहिलेल्या ‘करनीती’ स्तंभातील २०० भागांचा समावेश असलेल्या ‘इन्कमटॅक्स आपल्यासाठी’ आणि ‘जीएसटी आपल्यासाठी’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन शिवदयाल श्रीवास्तव आणि स्टेट जीएसटीच्या सह आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते तापडिया नाट्यगृहात झाले. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा अध्यक्षस्थानी होते. आ. प्रशांत बंब, प्रकाशक बाबा भांड, सीए आर. बी. शर्मा, औरंगाबाद सीए शाखेचे अध्यक्ष अल्केश रावका, लेखक उमेश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्रीवास्तव म्हणाले, पुढील पिढ्यांनी आपली ओळख काढायची असेल, तर पुस्तके लिहिली पाहिजेत; मात्र त्या पुस्तकात मांडलेल्या मतांची दैनंदिन जीवनात अंमलबजावणी झाली पाहिजे. उमेश शर्मा यांनी पुस्तकात लिहिलेले आम्ही, ते जेव्हा करदात्यांना आमच्याकडे घेऊन येतील, तेव्हा पडताळून पाहूत, तेव्हा त्यांनी लिहिलेले आणि प्रत्यक्षात त्यांचे वागणे यातून सर्व काही बाहेर येईल, असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. दोनपैकी इन्कमटॅक्स पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा कलर निळा, तर जीएसटीचा लाल ठेवला. यावरूनही त्यांनी चिमटे काढले. त्याला सर्व रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अध्यक्षीय समारोपात राजेंद्र दर्डा म्हणाले, उमेश शर्मा यांनी अगदी सोप्या भाषेत किचकट अर्थनीती उलगडली आहे. ‘लोकमत’ व ‘लोकमत टाइम्स’मध्ये तब्बल चार वर्षांपासून सुरू असलेल्या ‘करनीती’ या स्तंभात २०० लेख प्रकाशित झाले. यातून आर्थिक साक्षरता मोठ्या प्रमाणात झाली. अनेक वेळा लेख वाचताना कृष्ण, अर्जुनाचे संदर्भ होते. यातून समजले की, करदाता हा अर्जुनाच्या भूमिकेत असतो. सर्वसामान्य करदात्याला अनेक प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मार्गदर्शन करणारा श्रीकृष्णही हवा असतो. अशा ऐतिहासिक संदर्भांचा हवाला देऊन सहज, सोप्या शब्दांत उमेश शर्मा यांनी ‘करनीती’ लिहिली असल्याचा गौरवही त्यांनी केला. या वर्षात सरकारने अर्थविषयक तीन मोठे निर्णय घेतले आहेत. त्यात नोटाबंदी, रेरा कायदा आणि जीएसटीचा समावेश आहे. यामुळे अनेकांची अडचण झाली असेल; परंतु यातील जीएसटी हा दीर्घकाळासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे शर्मा यांचे दुसरे पुस्तक ‘जीएसटी आपल्यासाठी’ हे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही दर्डा यांनी स्पष्ट केले. सीए अल्केश रावका यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात प्रकाशक बाबा भांड यांनी ज्ञानाला वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य लेखक आणि प्रकाशक करीत असल्याचे सांगितले. पाहुण्यांचा परिचय प्रतिभा भांड यांनी करून दिला. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार सीए आर. बी. शर्मा यांनी मानले. खचाखच भरलेल्या नाट्यगृहात साहित्य, संस्कृती, राजकीय, सीए, व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यवसायासह अनेक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.साक्षरता वाढविण्याची गरजदेशात साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के, तर राज्यात ८३ टक्के आहे; मात्र आर्थिक साक्षरतेचे प्रमाण केवळ २३ टक्केच आहे. देशाच्या विकासासाठी आर्थिक साक्षरतेचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली.करदात्यांचा पैसा जबाबदारीने वापरावाआ. बंब यांनी करदात्यांच्या पैशाविषयी भाष्य केले. याचा संदर्भ घेत कररूपाने जमा होणारा पैसा राजकारण्यांनी जबाबदारीने वापराला पाहिजे. तो वापरतात का? हा संशोधनाचा विषय असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.