शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

पाणीपुरवठ्याला केले ‘बायपास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:39 IST

कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने शहरात ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. मागील तीन दशकांपासून या टाक्यांचा वापरही सुरू होता. आता अचानक महापालिकेने चक्क पाण्याच्या टाक्यांचा वापर बंद करून थेट नागरिकांना पाणी देण्याची भन्नाट युक्ती शोधून काढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने शहरात ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. मागील तीन दशकांपासून या टाक्यांचा वापरही सुरू होता. आता अचानक महापालिकेने चक्क पाण्याच्या टाक्यांचा वापर बंद करून थेट नागरिकांना पाणी देण्याची भन्नाट युक्ती शोधून काढली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रेशरने पाणी मिळणे बंद झाले आहे. ठिकठिकाणी व्हॉल्व्ह टाकून नागरिकांना पाणी देण्याची योजना आणण्यात आली आहे.शहरातील १५ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिका जायकवाडीहून शहरात पाणी आणते. फारोळा येथे जलशुद्धीकरणात पाणी शुद्ध करण्यात येते. त्यानंतर नक्षत्रवाडी येथे महाकाय पाण्याची टाकी (एमबीआर) बांधली. मागील तीन दशकांपासून या टाकीचा वापर सुरू होता. या टाकीतून शहर आणि सिडको-हडकोला पाणी देण्याची व्यवस्था होती. नक्षत्रवाडी येथील उंच टेकडीवर ही टाकी बांधलेली आहे. आज ही पाण्याची टाकी बांधायची म्हटले तर किमान ५० ते ६० कोटी रुपये खर्च येईल. महापालिकेने मागील दीड वर्षापासून या टाकीचा वापर बंद करून नक्षत्रवाडीहून थेट शहरात पाणी आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाण्याचे प्रेशर कमी झाले आहे. ज्या तज्ज्ञांनी ही टाकी बांधली त्यांना पाणीपुरवठ्यातील काहीच कळत नव्हते का...? असा प्रश्न बायपास पद्धतीमुळे उपस्थित होत आहे. महापालिकेने आज या पाण्याच्या टाकीचा वापर बंद केला आहे. उद्या पुन्हा त्यात पाणी टाकल्यास टाकीला तडे जातील. कोट्यवधींची मालमत्ता धुळीस मिळेल याची चिंताच कोणाला नाही.ज्युबिलपार्क पाण्याच्या टाकीवरून विद्यापीठ, पहाडसिंगपुरा आदी वसाहतींना पाणी देण्यात येते. यासाठी विद्यपीठ आणि पहाडसिंगपुºयात पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. या टाक्यांचा वापर बंद करून महाापलिकेने थेट बायपास पद्धतीने पाणी देणे सुरू केले आहे. ठिकठिकाणी लाईन पंक्चर करून व्हॉल्व्ह बसविण्यात येत आहेत. सध्या बेगमपुरा भागात बायपास करण्यासाठी काम सुरू आहे. मकबºयाच्या पाठीमागेही अशाच पद्धतीने बायपास करण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी महापालिकेने बायपासने पाणी देणे सुरू केले. या प्रक्रियेला लोकप्रतिनिधीही विरोध करायला तयार नाहीत.