शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

पोटनिवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

लातूर : लातूर मनपाच्या प्रभाग क्रमांक १३ अ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा दणाणून पराभव झाला

लातूर : लातूर मनपाच्या प्रभाग क्रमांक १३ अ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा दणाणून पराभव झाला असून, बसपापुरस्कृत व भाजपाच्या पाठिंब्याने डॉ़ विजय अजनीकर १५६ मतांनी विजयी झाले आहेत़ डॉ़ अजनीकर यांना एकूण १४४२ मते पडली आहेत़ तर काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल कांबळे हे १२८६ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत़ अन्य दोन अपक्ष उमेदवारांची तर अनामत रक्कमही जप्त झाली आहे़ तर औसा पालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून, चाँदबी पटेल या विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला गड कायम राखण्यात यशस्वी झाला आहे.गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ अ मधून अ‍ॅड़व्यंकट बेद्रे हे विजयी झाले होते़; परंतु त्यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरविले़ त्यामुळे ही पोटनिवडणूक लागली होती़ यात भाजप उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने काँग्रेस बरोबर अपक्षांची लढत झाली़ त्यात बसपापुरस्कृत व भाजपा पाठिंब्यावर डॉ़विजय अजनीकर यांनी बाजी मारली असून त्यांना ३१२३ मतांपैकी १४४२ मते पडली आहेत़ त्या खालोखाल काँग्रेस उमेदवार कांबळे यांना १२८६ मते मिळाली असून अपक्ष व शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या विठ्ठल भोसले यांना २९५ तर शिवप्रसाद श्रृंगारे या अपक्ष उमेदवारास ७६ मते पडली आहेत़ तर २४ मतदारांनी नकारार्थी मतदान केले आहे़ भोसले व शृंगारे यांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे़ गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ़विजय अजनीकर यांनी बसपाच्या तिकिटावर या प्रभागातून निवडणूक लढवली होती़ त्यांना ९५० मते मिळाली होती़ या निवडणूकीत त्यांनी बसपापुरस्कृत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि भाजपानेही पाठिंबा दिला़ त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊन ते विजयी झाले़काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राज्यमंत्री अमित देशमुख यांनी शेवटच्या क्षणी या प्रभागात ६ ते ८ कॉर्नर बैठका घेऊन एक जाहीर सभा घेतली होती़ परंतु, मतदारांनी कौल अपक्ष उमेदवार डॉ़विजय अजनीकर यांच्या बाजूने दिला असून, महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे संख्याबळ ५० वर जाण्याऐवजी ४९ वरच राहिले आहे़ (प्रतिनिधी)औसा पालिकेत राष्ट्रवादीचा गड कायमऔसा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चाँदबी आखलाख पटेल या १६५१ मते घेवून विजयी झाल्या आहेत़ त्यांनी नजीकच्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार रजीयाबी नजीरसाब शेख यांचा पराभव केला असून, त्यांनी राष्ट्रवादीचा हा गड कायम ठेवला आहे़ राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुरय्या मुक्तार कुरेशी यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक लागली होती़ या निवडणुकीत रजीयाबी शेख यांना ६८४, तहसीन असलम पठाण २९९, मेहराजबी शेख १२६ तर मंगलबाई बेवनाळे यांना १४ मते पडली़ ५४ मतदारांनी नकारार्थी मतदान केले असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी दत्ता भारस्कर यांनी दिली़सत्ताधारी काँग्रेसचे अर्धशतक हुकले..! लातूर मनपा प्रभाग क्र. १३ अ ची पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाने जिंकली असती, तर मनपा सभागृहात काँग्रेसची सदस्य संख्या ५० वर गेली असती. परंतु, पराभव झाल्याने त्यांचे सभागृहातील अर्धशतक हुकले आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांकडून सुरुवातीला प्रचार कमी झाला. राज्यमंत्री अमित देशमुख यांनी बैठका आणि सभा घेतल्यानंतरच पक्ष कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला लागले होते. तोपर्यंत बसपा पुरस्कृत उमेदवार डॉ. विजय अजनीकर यांनी प्रभाग पिंजून काढून मतदारांपर्यंत पोहोचले होते.