शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

उडीद-मूग खरेदी; कृषी अधीक्षकांना घेराओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाफेडतर्फे शेतकºयांना उडीद-मूग खरेदीचे संदेश पाठविण्यात आले. मात्र शेतकºयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाफेडतर्फे शेतकºयांना उडीद-मूग खरेदीचे संदेश पाठविण्यात आले. मात्र शेतकºयांचा माल पीक कापणी प्रयोग संकलन नोंदवही गोषवाºयाप्रमाणे आणेवारीनुसार खरेदी केला जात आहे. आणेवारीपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांची अडचण नाही. मात्र त्यापेक्षा थोडे उत्पन्न झालेल्यांचा मालच परत केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी कृषी अधीक्षकांना घेराओ घालून याबाबत जाब विचारण्यात आला.हिंगोली येथील नाफेड केंद्रावर २५ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतकºयांनी आणेवारीप्रमाणे उडीद-मूग खरेदीस विरोध केला. पिकाचे सरासरी उत्पन्न ३६९.३७ हेक्टरप्रमाणे दाखवून नाफेडकडून खरेदी केले जात होते. त्यामुळे शेतमाल विक्रीस शेतकºयांनी विरोध केला. यंदा उडीद-मूग पिकाचे उत्पन्न जास्त झाल्याने उर्वरित मालाचे काय करायचे? असा प्रश्न शेतकºयांनी केला. यात काही क्विंटल ते दीड क्विंटलपेक्षा मोठी तफावत नाही. शिवाय आणेवारी ही सरासरीच काढली जाते. काही शेतकºयांनी शेजारच्याचही माल आणून वेळ व पैशांची बचत करण्याचा केलेला प्रयत्न अंगलट आला. अशांचा माल परत केला जात होता. याबाबत मराठा शिवसैनिक सेनेचे अध्यक्ष विनायक भिसे यांच्याकडे काही शेतकºयांनी गाºहाणे मांडले. त्यांनी नाफेडअंतर्गत शेतकºयांकडून येणाºया सर्वच उडीद-मुगाची खरेदी करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. तसेच याबाबत कृषी अधीक्षक व्ही. डी. लोखंडे यांच्याशी चर्चा केली. नाफेडचे निकष चुकीचे असल्याचे सांगून रोष व्यक्त केला. तसेच यार्डातून माल कोठेही न हालविण्याचा पावित्रा घेतला. आणेवारीप्रमाणे होणारी खरेदी शेतकºयांना मान्य नाही. शिवाय उर्वरित मालाचा प्रश्नही निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यावर प्रशासकीय अधिकाºयांनी तोडगा काढण्याची मागणी शेतकºयांतून केली जात होती.शेतकºयांच्या प्रतिक्रीयाशेतकरी राजू क्षीरसागर म्हणाले, सध्या आणेवारी प्रमाणे उडीद-मुगाची खरेदी केली जात आहे. परंतु शेतकºयांनी उर्वरित माल कोठे घेऊन जावा. शिवाय बाहेरील खरेदीही बंद आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन शेतकºयांची समस्या सोडवावी.जयपूर येथील फुलाजी गाडे म्हणाले, नाफेडतर्फे शेतकºयांना संदेशाद्वारे उडीद-मूग घेऊन येण्यास सांगितले. परंतु खरेदी कशी करणार. याबाबत काही म्हटलेच नव्हते. तर परसराम तांबिले म्हणाले, अर्धा माल येथे विकला तर उरलेला कोठे विकावा. बाहेरही दर पाडले जात आहेत. यावर शासनाने उपाय-योजना काढावी अशी मागणी केली.सूर्यभान जगताप म्हणाले की, नाफेडने केवळ शेतमाल घेऊन येण्यास सांगितले. मात्र प्रत्यक्षात उडीद-मुग आणेवारी प्रमाणेच खरेदी करणार याबाबत मात्र काहीही सांगितले नाही.