शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

नाफेड, राज्य शासनाकडून तीन लाख क्विंटल तूर खरेदी

By admin | Updated: May 29, 2017 00:25 IST

लातूर : शहरासह जिल्ह्यात औसा, रेणापूर, चाकूर, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर आदी ठिकाणी आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : शहरासह जिल्ह्यात औसा, रेणापूर, चाकूर, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर आदी ठिकाणी आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून या केंद्रावरुन गेल्या आठ दिवसात ३४ हजार ८१० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. नाफेड आणि राज्य सरकारकडून आतापर्यंत एकूण २ लाख ९८ हजार ८७५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात नव्या तीन खरेदी केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील एकूण नऊ केंद्रावर तुरीची खरेदी सुरु आहे.लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शिल्लक तुरीची आवक होत आहे. विशेष म्हणजे तूर खरेदीदरम्यान झालेल्या गोंधळामुळे आता प्रशासनाने तूर खरेदी करण्यासाठी विविध अटी घातल्या आहेत. तूर खरेदी करण्यासाठी सातबारा, पीकपेरा, आधार आणि बँक खात्याची झेरॉक्सची प्रत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करावी लागणार आहे़ या कागदपत्रांची तहसीलदारांकडून पडताळणी केल्यानंतर शेतकऱ्यांना टोकण दिले जाणार आहे. या टोकणच्या आधारे शेतकऱ्यांची तूर केंद्रावर खरेदी सध्याला सुरू आहे़ प्रशासनाने लादलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे़ उदगीर येथील तूर खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची तूर खरेदी झाल्याच्या संशयावरुन येथील केंद्र बंद करण्यात आले होते. दरम्यान, उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांची तूर जळकोटच्या केंद्रावर खरेदी करण्यात आली़ मुदत संपल्यानंतर सर्वच केंद्र बंद करण्यात आली़परिणामी, शेतकऱ्यांच्या शिल्लक तुरीचा प्रश्न गंभीर बनला. यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आंदोलन केले होते. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली. यानंतर लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती, रेणापूर, औसा, अहमदपूर, चाकूर आणि शिरुर अनंतपाळ येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले़ लातूरच्या केंद्रावर निलंगा, देवणी आणि उदगीर तालुक्यातील तुरीची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने येथील यंत्रणा कोलमडली. तूर घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उदगीर, निलंगा, देवणी येथे तीन केंद्र सुरु केले आहे.