शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

बिनधास्त जाळला जातोय कचरा!

By admin | Updated: February 3, 2017 00:41 IST

लातूर : वाढत्या प्रदुषणामुळे जीवाची घालमेल होत असतानाच शहरातील काही भागात बिनधास्तपणे कचरा जाळण्यात येत आहे़

लातूर : वाढत्या प्रदुषणामुळे जीवाची घालमेल होत असतानाच शहरातील काही भागात बिनधास्तपणे कचरा जाळण्यात येत आहे़ विशेष म्हणजे, कचरा जाळणाऱ्यांना कायद्याच्या उल्लंघनाची माहिती नाही की? जाणीवपूर्वक कचरा जाळत आहेत, हे अनुत्तरीय आहे़ त्यातच महापालिकेचेही दुर्लक्ष होत असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचा धूर निघत असल्याचे दिसून येत आहे़ परिणामी, प्रदुषणात भर पडत आहे़ शहरातील प्रकाश नगर, खाडगाव रोड, आदर्श कॉलनी, खोरी गल्ली, शामनगर परिसरात बिनधास्तपणे कचरा जाळल्याचे दृश्य ‘लोकमत’च्या कॅमेऱ्याने टिपले आहे़ एकीकडे महापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर, सुंदर शहर निर्माण करण्यावर भर देत असली तरी दुसरीकडे याच महापालिकेचे कचरा उचलण्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे़ स्वच्छतेसाठी महापालिकेच्या वतीने चार झोन तयार करण्यात आले असून त्यातील अ, ब, क या झोनमध्ये प्रत्येकी ९ तर ड मध्ये ८ झोन आहेत़ तसेच प्रत्येक गल्लीबोळातील कचरा उचलण्यासाठी ९३ अ‍ॅपे, ३८ टॅक्टर आणि १२ टिप्पर आहेत़ घंटागाडीद्वारे एकत्रित करण्यात येणारा कचरा प्रत्येक झोनमधील रॅम्पवरुन वरवंटी कचराडेपो येथे टाकण्यात येतो़ गेल्या काही दिवसांपासून काही प्रभागातील गल्लीबोळातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्याच फिरत नसल्याचे दिसून येत आहे़ परिणामी, काही नागरिक विरळ वस्ती असलेल्या रस्त्याच्या बाजूस हा कचरा टाकत आहेत़ तिथे ढीग साचलेले पाहून परिसरातील नागरिक हा कचरा पेटवून देत आहेत़ एवढेच नव्हे तर शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच अन्य गल्लीबोळातील रस्त्यांच्या बाजूस कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसून येत आहेत़ कचऱ्याचे हे ढिगारे वाढत असल्याचे पाहून नजीकचे काही नागरिक ते ढिगारे पेटवून देत आहेत़ विशेष म्हणजे, पहाटेच्या वेळी हा कचरा पेटवून दिला जात आहे़ त्याचा धूर दिवसभर परिसरात निघत असतो़ त्यामुळे शहरातील प्रदुषणात वाढ होत आहे़वास्तविक पाहता, कचरा जाळणे हे कायद्याचे उल्लंघन असून तो गुन्हाही ठरतो़ परंतु, कचरा जाळणारे हे नागरिक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की, त्यांना त्याची माहिती नाही, हे अनुत्तरीय आहे़ विशेष म्हणजे, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे कचरा जाळण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे़