शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात प्रशासन ढेपाळले

By admin | Updated: June 19, 2014 00:52 IST

विजय गायकवाड , वैजापूर वैजापूर शहरातील एकूण २८ विविध शासकीय कार्यालयांपैकी २२ शासकीय कार्यालयांचे प्रमुख मुख्यालयी राहत नसल्याची बाब समोर आली आहे.

विजय गायकवाड , वैजापूरवैजापूर शहरातील एकूण २८ विविध शासकीय कार्यालयांपैकी २२ शासकीय कार्यालयांचे प्रमुख मुख्यालयी राहत नसल्याची बाब समोर आली आहे. २८ पैकी फक्त सहाच कार्यालय प्रमुख मुख्यालयी राहतात. अन्य शासकीय कार्यालय प्रमुख दांड्या मारताना दिसून येतात. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील शासकीय कार्यालयांचा कारभार असाच रामभरोसे सुरू आहे. वैजापूर शहरात एकूण २८ विविध शासकीय कार्यालये आहेत. यामध्ये उपविभागीय अधिकारी, तहसील, पोलीस ठाणे, पंचायत समिती, नगर परिषद, लागवड अधिकारी, उपविभागीय कृ षी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन चिकित्सालय, उपजिल्हा रुग्णालय, बांधकाम उपविभाग, नांदूर-मधमेश्वर कालवा विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, जिल्हा परिषद सिंचन, जिल्हा परिषद बांधकाम, तालुका वजन-मापे निरीक्षक, उपअधीक्षक भूमी अभिलेख, दुकाने व संस्था निरीक्षक , दुय्यम निबंधक, लघु पाटबंधारे स्थानिक स्तर, महावितरण कंपनी क्र. १ व २, दूरसंचार विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, तालुका आरोग्य अधिकारी व पंचायत समिती शिक्षण विभाग या कार्यालयांचा समावेश आहे. या २८ पैकी उपविभागीय अधिकारी, तहसील, पोलीस ठाणे, पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी असे एकूण सहाच कार्यालय प्रमुख मुख्यालयी राहतात. उर्वरित २२ कार्यालयांचे प्रमुख अमावास्या- पौर्णिमेला येऊन शहरातील कार्यालयात हजेरी लावतात. वास्तविक पाहता सर्वच कार्यालय प्रमुखांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. तसे शासन परिपत्रकच निर्गमित करण्यात आले आहे. या सर्व अधिकाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळतो; परंतु अधिकारी शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून चुना लावीत आहेत. शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांचे प्रमुख आठवडी बाजाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी हजेरी लावताना दिसून येतात. आठवड्यातील उर्वरित दिवसांत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मर्जीनुसार कामकाज चालते. त्यामुळे अन्य दिवशी बहुतांश वेळा अधिकाऱ्यांच्या कार्यालयास दांड्याच असतात. अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी हे सर्वच अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वैजापूर येथील शासकीय कार्यालयांचा कारभार ‘आओ जाओ घर तुम्हारा’ यानुसार सुरू आहे. त्यांच्यावर ना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक आहे ना स्थानिक लोकप्रतिनिधींचा. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे तालुक्यातील नागरिक नाहकपणे वेठीस धरले जात आहेत.आठवडी बाजाराच्या दिवशीच हजेरीवैजापूर शहरात बहुतांश कार्यालय प्रमुखांना आठवडी बाजाराच्या दिवशी हजर राहून काम करण्याची सवय झाली आहे. आठवडी बाजाराच्या निमित्ताने नागरिक शासकीय कामांसाठी येत असले तरी या दिवशी नागरिकांचा लोंढा जास्त प्रमाणात येत असल्याने कामांचा निपटारा न होता जास्तीत जास्त कामे प्रलंबित राहतात. कामाचा निपटारा करण्यासाठी कार्यालय प्रमुखांनी आठवडाभर सातत्याने कार्यालयात हजर राहणे गरजेचे आहे; परंतु या ‘आठवडी’ अधिकाऱ्यांच्या मनमानी व गलथान कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर कामे प्रलंबित राहतात. त्यांच्या या कारभारावर लगाम घालणे गरजेचे आहे.