शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

वैजापुरात प्रशासन ढेपाळले

By admin | Updated: June 19, 2014 00:52 IST

विजय गायकवाड , वैजापूर वैजापूर शहरातील एकूण २८ विविध शासकीय कार्यालयांपैकी २२ शासकीय कार्यालयांचे प्रमुख मुख्यालयी राहत नसल्याची बाब समोर आली आहे.

विजय गायकवाड , वैजापूरवैजापूर शहरातील एकूण २८ विविध शासकीय कार्यालयांपैकी २२ शासकीय कार्यालयांचे प्रमुख मुख्यालयी राहत नसल्याची बाब समोर आली आहे. २८ पैकी फक्त सहाच कार्यालय प्रमुख मुख्यालयी राहतात. अन्य शासकीय कार्यालय प्रमुख दांड्या मारताना दिसून येतात. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील शासकीय कार्यालयांचा कारभार असाच रामभरोसे सुरू आहे. वैजापूर शहरात एकूण २८ विविध शासकीय कार्यालये आहेत. यामध्ये उपविभागीय अधिकारी, तहसील, पोलीस ठाणे, पंचायत समिती, नगर परिषद, लागवड अधिकारी, उपविभागीय कृ षी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन चिकित्सालय, उपजिल्हा रुग्णालय, बांधकाम उपविभाग, नांदूर-मधमेश्वर कालवा विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, जिल्हा परिषद सिंचन, जिल्हा परिषद बांधकाम, तालुका वजन-मापे निरीक्षक, उपअधीक्षक भूमी अभिलेख, दुकाने व संस्था निरीक्षक , दुय्यम निबंधक, लघु पाटबंधारे स्थानिक स्तर, महावितरण कंपनी क्र. १ व २, दूरसंचार विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, तालुका आरोग्य अधिकारी व पंचायत समिती शिक्षण विभाग या कार्यालयांचा समावेश आहे. या २८ पैकी उपविभागीय अधिकारी, तहसील, पोलीस ठाणे, पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी असे एकूण सहाच कार्यालय प्रमुख मुख्यालयी राहतात. उर्वरित २२ कार्यालयांचे प्रमुख अमावास्या- पौर्णिमेला येऊन शहरातील कार्यालयात हजेरी लावतात. वास्तविक पाहता सर्वच कार्यालय प्रमुखांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. तसे शासन परिपत्रकच निर्गमित करण्यात आले आहे. या सर्व अधिकाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळतो; परंतु अधिकारी शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून चुना लावीत आहेत. शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांचे प्रमुख आठवडी बाजाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी हजेरी लावताना दिसून येतात. आठवड्यातील उर्वरित दिवसांत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मर्जीनुसार कामकाज चालते. त्यामुळे अन्य दिवशी बहुतांश वेळा अधिकाऱ्यांच्या कार्यालयास दांड्याच असतात. अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी हे सर्वच अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वैजापूर येथील शासकीय कार्यालयांचा कारभार ‘आओ जाओ घर तुम्हारा’ यानुसार सुरू आहे. त्यांच्यावर ना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक आहे ना स्थानिक लोकप्रतिनिधींचा. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे तालुक्यातील नागरिक नाहकपणे वेठीस धरले जात आहेत.आठवडी बाजाराच्या दिवशीच हजेरीवैजापूर शहरात बहुतांश कार्यालय प्रमुखांना आठवडी बाजाराच्या दिवशी हजर राहून काम करण्याची सवय झाली आहे. आठवडी बाजाराच्या निमित्ताने नागरिक शासकीय कामांसाठी येत असले तरी या दिवशी नागरिकांचा लोंढा जास्त प्रमाणात येत असल्याने कामांचा निपटारा न होता जास्तीत जास्त कामे प्रलंबित राहतात. कामाचा निपटारा करण्यासाठी कार्यालय प्रमुखांनी आठवडाभर सातत्याने कार्यालयात हजर राहणे गरजेचे आहे; परंतु या ‘आठवडी’ अधिकाऱ्यांच्या मनमानी व गलथान कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर कामे प्रलंबित राहतात. त्यांच्या या कारभारावर लगाम घालणे गरजेचे आहे.