शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फुटपाथवर व्यवसायिकांचे बस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 23:02 IST

वाळूज व पंढरपुरात फुटपाथवरच विविध व्यवसायिकांनी बस्तान मांडले आहे.

वाळूज महानगर : वाळूज व पंढरपुरात फुटपाथवरच विविध व्यवसायिकांनी बस्तान मांडले आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे महामार्गावर रहदारीस अडथळा निर्माण होत असून, वाहतुकीची कोंडी होत आहे. फुटपाथ गायब झाल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून वाहतूक कोंडीतून मार्ग काढत ये-जा करावी लागत आहे.

औरंगाबाद-नगर महामार्गावर असलेल्या वाळूज व पंढरपूर येथे दिवसेंदिवस रस्त्यालगत अतिक्रमण वाढत आहे. पादचाऱ्यांसाठी महामार्गालगत स्थानिक प्रशासनाने फुटपाथ तयार केले. मात्र या फुटपाथचा वापर व्यवसायासाठी केला जात असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. फुटपाथवर हातगाडी चालक भाजीपाला-फळ विक्रेते, हॉटेल, पानटपरी, ज्यूस सेंटर, गॅरेज आदी व्यवसायिकांनी व्यवसाय थाटले आहेत. पादचाऱ्यांना पर्यायी रस्ता नसल्यामुळे जीव धोक्यात घालून महामार्गावरील वाहतूक कोंडीतून मार्ग काढत ये-जा करावी लागत आहे.

यात रस्ता ओलांडताना तसेच ये-जा करताना झालेल्या अपघाताच्या घटनेत अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. तरीही प्रशासनाकडून हे अतिक्रमण हटविले जात नाही. फुटपाथवरील अतिक्रमण पादचाऱ्यांच्या जिवावर बेतत असून वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनले आहे. संबंधित प्रशासनाने फुटपाथवरील अतिक्रमण तात्काळ हटवून रहदारीसाठी रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

अपघाताचा धोका बळावला ..वाढत्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी सारखी वाहतूक कोंडी होत आहे. स्थानिक प्रशासनाकडूनही त्यांच्यावर कारवाई करण्यास चालढकलपणा केला जातो. पण दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ होत असल्याने अपघाताचा धोका अधिक बळावला गेला आहे.

टॅग्स :WalujवाळूजEnchroachmentअतिक्रमण