शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

पायात घुंगरू बांधले, आता नाचावे तर लागेलच..!

By admin | Updated: August 26, 2015 23:53 IST

गजानन वानखडे , जालना पायात घुंगरु बांधले आहेत, आता नाचावे तर लागेलच, असे उद्गार पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार कवी

गजानन वानखडे , जालनापायात घुंगरु बांधले आहेत, आता नाचावे तर लागेलच, असे उद्गार पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार कवी विठ्ठल वाघ यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.कवीवर्य विठ्ठल वाघ यांनी कवी जयराम खेडेकर यांच्या उर्मीच्या कार्यालयास सोमवारी भेट दिली. साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष व्हावे, अशी मित्रमंडळीनी आग्रह केल्यानेच आपण अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वाघ म्हणाले. यापूर्वी नाशिक येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माझे मित्र दिवंगत केशव मेश्राम यांच्यासाठी माघार घेतली होती. परंतु ज्या क्षेत्रात आपण एवढ्या वर्षांपासून काम करत आहोत. त्यात काही करण्यासाठी आपण का मागे राहावे, असेही मला वाटते. एक व्यासपीठ मिळवून नव्या पिढीशी त्या निमित्ताने संवाद साधता येणार असल्याने आपल्याला आनंद आहे. ना नफा ना तोटा तत्वावर आपले विचार वाचकांपर्यंत पोहोचविण्यास उत्सूक असल्याचे वाघ म्हणाले.पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दाभोलकर, पानसरेंची हत्या होते. त्यामुळे एकाअर्थी धर्म विवेकाचा मारेकरी ठरतो. अंधश्रध्देचा निर्माता ठरत आहेत. त्यामुळे नव्या पिढीने अशा अंधश्रध्देपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणतात सोन्याची असते व्दारका पोथ्या पुराने सांगत असतात. ऐकणाऱ्याच्या घरात मात्र लाकडाचेही खांब नसतात.पुराणातली वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही. वरूणाचा धावा करून धरती कधी विझत नाही. कथा कीर्र्तनातून कदा अमृताची ओतता साय.घोटभर पाण्यासाठी वणवण भटके माझी माय. अमृताचे खरे नाही. सत्य फक्त पाणी आहे. एवढे ज्याला कळले. तोच वैदात्याहून ज्ञानी आहे.असे मत व्यक्त केले. वाघ यांनी युवकांसाठी प्रेरणादायी कवीता म्हटली. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळावर काम करत असताना लोकबोलीचे जतन व्हावे, या हेतूने तीन कोष तयार केले. एक वऱ्हाड मराठी बोलीचा शब्दकोष, यात वीस हजार शब्द आहेत, दुसरे मराठी म्हणीचा शब्दकोश १४ हजार म्हणी, वऱ्हाडी बोलीचा वाक्प्रचार कोष, असे तयार केले आहेत. फुले, शाहू आंबेडकर, संत तुकाराम, संत चोखामेळा आदी मंडळीनी जे आपल्या साहित्यातून सतत इतरांना जगण्याची उमेद दिली. त्यांच्यासारखे कार्य करण्याची गरज आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी लेखक कविंनी आपली लेखनी झिजवावी. अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलन परदेशात होतात याबद्दल वाघ म्हणतात की, जर जगभर मराठी जात असेल तर त्याला काय हरकत आहे. पण त्याची फलनिष्पत्ती काय. कोणतेही संमेलन घेण्याचा एक विचार असतो. तो साध्य होतो काय, तो विचार पुढे जात आहे काय, याची तपासणी होणे गरजेचे आहे. जगभरात मराठी पोहचविण्याचे काम विश्व मराठी साहित्य संमेलन करत आहे. परंतु ते कौटुंबिक साहित्य होऊ नये ही अपेक्षा आहे.