शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

पायात घुंगरू बांधले, आता नाचावे तर लागेलच..!

By admin | Updated: August 26, 2015 23:53 IST

गजानन वानखडे , जालना पायात घुंगरु बांधले आहेत, आता नाचावे तर लागेलच, असे उद्गार पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार कवी

गजानन वानखडे , जालनापायात घुंगरु बांधले आहेत, आता नाचावे तर लागेलच, असे उद्गार पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार कवी विठ्ठल वाघ यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.कवीवर्य विठ्ठल वाघ यांनी कवी जयराम खेडेकर यांच्या उर्मीच्या कार्यालयास सोमवारी भेट दिली. साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष व्हावे, अशी मित्रमंडळीनी आग्रह केल्यानेच आपण अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वाघ म्हणाले. यापूर्वी नाशिक येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माझे मित्र दिवंगत केशव मेश्राम यांच्यासाठी माघार घेतली होती. परंतु ज्या क्षेत्रात आपण एवढ्या वर्षांपासून काम करत आहोत. त्यात काही करण्यासाठी आपण का मागे राहावे, असेही मला वाटते. एक व्यासपीठ मिळवून नव्या पिढीशी त्या निमित्ताने संवाद साधता येणार असल्याने आपल्याला आनंद आहे. ना नफा ना तोटा तत्वावर आपले विचार वाचकांपर्यंत पोहोचविण्यास उत्सूक असल्याचे वाघ म्हणाले.पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दाभोलकर, पानसरेंची हत्या होते. त्यामुळे एकाअर्थी धर्म विवेकाचा मारेकरी ठरतो. अंधश्रध्देचा निर्माता ठरत आहेत. त्यामुळे नव्या पिढीने अशा अंधश्रध्देपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणतात सोन्याची असते व्दारका पोथ्या पुराने सांगत असतात. ऐकणाऱ्याच्या घरात मात्र लाकडाचेही खांब नसतात.पुराणातली वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही. वरूणाचा धावा करून धरती कधी विझत नाही. कथा कीर्र्तनातून कदा अमृताची ओतता साय.घोटभर पाण्यासाठी वणवण भटके माझी माय. अमृताचे खरे नाही. सत्य फक्त पाणी आहे. एवढे ज्याला कळले. तोच वैदात्याहून ज्ञानी आहे.असे मत व्यक्त केले. वाघ यांनी युवकांसाठी प्रेरणादायी कवीता म्हटली. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळावर काम करत असताना लोकबोलीचे जतन व्हावे, या हेतूने तीन कोष तयार केले. एक वऱ्हाड मराठी बोलीचा शब्दकोष, यात वीस हजार शब्द आहेत, दुसरे मराठी म्हणीचा शब्दकोश १४ हजार म्हणी, वऱ्हाडी बोलीचा वाक्प्रचार कोष, असे तयार केले आहेत. फुले, शाहू आंबेडकर, संत तुकाराम, संत चोखामेळा आदी मंडळीनी जे आपल्या साहित्यातून सतत इतरांना जगण्याची उमेद दिली. त्यांच्यासारखे कार्य करण्याची गरज आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी लेखक कविंनी आपली लेखनी झिजवावी. अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलन परदेशात होतात याबद्दल वाघ म्हणतात की, जर जगभर मराठी जात असेल तर त्याला काय हरकत आहे. पण त्याची फलनिष्पत्ती काय. कोणतेही संमेलन घेण्याचा एक विचार असतो. तो साध्य होतो काय, तो विचार पुढे जात आहे काय, याची तपासणी होणे गरजेचे आहे. जगभरात मराठी पोहचविण्याचे काम विश्व मराठी साहित्य संमेलन करत आहे. परंतु ते कौटुंबिक साहित्य होऊ नये ही अपेक्षा आहे.