शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

पायात घुंगरू बांधले, आता नाचावे तर लागेलच..!

By admin | Updated: August 26, 2015 23:53 IST

गजानन वानखडे , जालना पायात घुंगरु बांधले आहेत, आता नाचावे तर लागेलच, असे उद्गार पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार कवी

गजानन वानखडे , जालनापायात घुंगरु बांधले आहेत, आता नाचावे तर लागेलच, असे उद्गार पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार कवी विठ्ठल वाघ यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.कवीवर्य विठ्ठल वाघ यांनी कवी जयराम खेडेकर यांच्या उर्मीच्या कार्यालयास सोमवारी भेट दिली. साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष व्हावे, अशी मित्रमंडळीनी आग्रह केल्यानेच आपण अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वाघ म्हणाले. यापूर्वी नाशिक येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माझे मित्र दिवंगत केशव मेश्राम यांच्यासाठी माघार घेतली होती. परंतु ज्या क्षेत्रात आपण एवढ्या वर्षांपासून काम करत आहोत. त्यात काही करण्यासाठी आपण का मागे राहावे, असेही मला वाटते. एक व्यासपीठ मिळवून नव्या पिढीशी त्या निमित्ताने संवाद साधता येणार असल्याने आपल्याला आनंद आहे. ना नफा ना तोटा तत्वावर आपले विचार वाचकांपर्यंत पोहोचविण्यास उत्सूक असल्याचे वाघ म्हणाले.पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दाभोलकर, पानसरेंची हत्या होते. त्यामुळे एकाअर्थी धर्म विवेकाचा मारेकरी ठरतो. अंधश्रध्देचा निर्माता ठरत आहेत. त्यामुळे नव्या पिढीने अशा अंधश्रध्देपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणतात सोन्याची असते व्दारका पोथ्या पुराने सांगत असतात. ऐकणाऱ्याच्या घरात मात्र लाकडाचेही खांब नसतात.पुराणातली वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही. वरूणाचा धावा करून धरती कधी विझत नाही. कथा कीर्र्तनातून कदा अमृताची ओतता साय.घोटभर पाण्यासाठी वणवण भटके माझी माय. अमृताचे खरे नाही. सत्य फक्त पाणी आहे. एवढे ज्याला कळले. तोच वैदात्याहून ज्ञानी आहे.असे मत व्यक्त केले. वाघ यांनी युवकांसाठी प्रेरणादायी कवीता म्हटली. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळावर काम करत असताना लोकबोलीचे जतन व्हावे, या हेतूने तीन कोष तयार केले. एक वऱ्हाड मराठी बोलीचा शब्दकोष, यात वीस हजार शब्द आहेत, दुसरे मराठी म्हणीचा शब्दकोश १४ हजार म्हणी, वऱ्हाडी बोलीचा वाक्प्रचार कोष, असे तयार केले आहेत. फुले, शाहू आंबेडकर, संत तुकाराम, संत चोखामेळा आदी मंडळीनी जे आपल्या साहित्यातून सतत इतरांना जगण्याची उमेद दिली. त्यांच्यासारखे कार्य करण्याची गरज आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी लेखक कविंनी आपली लेखनी झिजवावी. अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलन परदेशात होतात याबद्दल वाघ म्हणतात की, जर जगभर मराठी जात असेल तर त्याला काय हरकत आहे. पण त्याची फलनिष्पत्ती काय. कोणतेही संमेलन घेण्याचा एक विचार असतो. तो साध्य होतो काय, तो विचार पुढे जात आहे काय, याची तपासणी होणे गरजेचे आहे. जगभरात मराठी पोहचविण्याचे काम विश्व मराठी साहित्य संमेलन करत आहे. परंतु ते कौटुंबिक साहित्य होऊ नये ही अपेक्षा आहे.